शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासमोर पाणीसंकट! धरणांतील पाणीसाठा ४१ टक्क्यांवर, कुठे किती पाणी शिल्लक?
2
Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप
3
Murshidabad Violence : "सर्व जळून खाक, काहीही शिल्लक नाही; अनेक कुटुंबांनी घर सोडून पळून जाण्याचा घेतला निर्णय"
4
'फर्जंद' नसता तर 'छावा' आलाच नसता! अजय पूरकर स्पष्टच बोलले, म्हणाले- "दिग्पालने सुरुवात केली नसती तर..."
5
वो बुलाती है मगर जाने का नही..! नजरेनं 'ती' करते घायाळ; आतापर्यंत ५० जण फसले, पोलीस हैराण
6
कमालच झाली राव! लॉकडाऊनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये जबरदस्त इम्यूनिटी, पडतात कमी आजारी
7
Agristack farmer registration: तुम्ही ॲग्रीस्टॅक योजनेचा शेतकरी ओळख क्रमांक घेतला का?
8
२०२१ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे दर ७० डॉलरच्या खाली, पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार?
9
तुमची पत्नी २० वर्षात बनवू शकते कोट्यधीश; खात्यात असतील १.३३ कोटी, विना रिस्क असा मिळेल सुपर रिटर्न
10
जमीन व्यवहार प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना पुन्हा समन्स; ईडी कार्यालयात पोहोचले
11
मध्य प्रदेश परिवहनची बस आणि टीप्पर यांच्यात भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू, १६ जखमी, ४ गंभीर
12
भयंकर! विवाहित महिलेसोबत युट्यूबर नको त्या अवस्थेत दिसला; तोच पतीचा शेवटचा दिवस ठरला
13
ना कार्ड, ना पिन, ना फोन... फक्त सेन्सरवर हात स्कॅन करुन पेमेंट, चीनची अफलातून टेक्नॉलॉजी
14
विवाहित असल्यास विसरभोळेपणा वाढतोय; पण आयुष्य वाढते, घटतो हृदयविकाराचा धोका
15
Sambhaji Bhide Guruji: संभाजी भिडे गुरुजी यांच्या पायाचा कुत्र्याने घेतला चावा, सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु
16
महायुतीत भाषणावरून नाराजीनाट्य? कार्यक्रमपत्रिका बदलली; शिंदे, पवारांना संधीच नाही
17
सोशल मीडियावर केली अशी चूक तर अमेरिकेत मिळणार नाही प्रवेश, ट्रम्प यांचा नवा आदेश 
18
SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, बँकेनं कर्जाचे व्याजदर केले कमी; EMI चा भार हलका होणार, पाहा नवे दर
19
मला भरत जाधवचा भाऊ म्हणायचे! सिद्धू म्हणाला- "त्यांच्यामुळे मला सिनेमासाठी १ लाख रुपये..."
20
तिघे वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील, खडखड होणारच; चंद्रकांत पाटलांनी नाराजीचा चेंडू भिरकावला

कुख्यात आरोपी इम्रान मेहदीला ‘अंडासेल’मधून त्वरित इतर सेलमध्ये हलविण्याचे खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2022 19:24 IST

सलीम कुरेशीसह पाच जणांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार तथा सुपारी किलर इम्रान शेख नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहदी याला ‘मकोका’च्या दोन खटल्यात शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहरातील गाजलेल्या विविध खून खटल्यांतील कुख्यात आरोपी इम्रान शेख नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहदी याला त्वरित ‘अंडासेल’मधून इतर सेलमध्ये हलवावे, असे निर्देश न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. संदीपकुमार मोरे यांनी शुक्रवारी तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आज, शनिवारी) हर्सूल कारागृहात जाऊन मेहदीचा जबाब नोंदवावा. अंडासेलचे निरीक्षण करावे, फोटोग्राफरला सोबत घेऊन, अंडासेलचे फोटो काढून त्याचा अहवाल सोमवारी (दि. ३१) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर आणि एक तज्ज्ञ अशा तीन डॉक्टरांचे पथक नेमावे. त्या पथकाने आज, शनिवारी अंडासेलची पाहणी आणि मेहदीची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल सोमवारी न्यायालयास सादर करावा, असे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत. मेहदीला अंडासेलमध्ये ठेवल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडत असल्याने त्याला तेथून हलवावे यासाठी त्याच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

काय आहे याचिकासलीम कुरेशीसह पाच जणांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार तथा सुपारी किलर इम्रान शेख नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहदी याला ‘मकोका’च्या दोन खटल्यात शिक्षा ठोठाविण्यात आली आहे. वस्तुत: ‘प्रिजनर्स ॲक्ट’नुसार कैद्याला अंडासेलमध्ये केवळ १४ दिवसच ठेवण्याची तरतूद आहे. असे असताना या शिक्षेदरम्यान त्याला तब्बल २ वर्षे ४ महिने अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्याला तेथून हलवावे, ॲड. रूपेश जैस्वाल यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. मेहदीला २०१८ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा ठोठावली होती. मेहदीला अंडासेलमध्ये ठेवल्याबाबत त्याने १५ सप्टेंबर २०२१ रोजी कारागृह अधीक्षकांना अर्ज करून, त्याचे मानसिक संतुलन बिघडले असून, अंडासेलमधून त्वरित बाहेर काढण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्याच्या पत्नीने आधी कारागृह अधीक्षकांना अर्ज केला. त्यावरदेखील कारवाई झाली नाही. म्हणून तिने खंडपीठात याचिका दाखल केली. आर्थिक अडचणीमुळे तिने विधि सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करुन वकील देण्याची विनंती केली. त्यावर प्राधिकरणाने ॲड. रूपेश जैस्वाल यांची नियुक्ती केली आहे. याचिकेच्या सुनावणीवेळी ॲड. जैस्वाल यांनी वरील सर्व बाबींसह १९८७ च्या सुनील बत्रा खटल्यात सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायमूर्तींच्या पीठाने दिलेल्या निकालाचा संदर्भ दिला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ