शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांचेच लक्ष मुंबईकडे लागून

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेना आणि भाजपात सुरू झालेल्या खेचाखेचीमुळे या चारही पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

औरंगाबाद : विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच शिवसेना आणि भाजपात सुरू झालेल्या खेचाखेचीमुळे या चारही पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. आघाडी आणि युती होणार की नाही, याकडे आता कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून दावे- प्रतिदावे सुरू आहेत. हीच परिस्थिती शिवसेना आणि भाजपामध्ये आहे. दोन दिवसांपासून तर शिवसेना आणि भाजपाच्या संबंधात खूपच तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, तसेच शिवसेना भाजपासह इतर पक्षांची महायुती होणार हे लोकसभा निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. मात्र, आता निवडणुका जाहीर होऊन सहा दिवस झाले तरी अद्यापही जागावाटपावरून संघर्ष असल्याने आणि तो अधिकाधिक तीव्र होत असल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे. शिवसेना आणि भाजपासह महायुतीची घोषणा उद्या सायंकाळपर्यंत होणे अपेक्षित आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचा निर्णय दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याने हा निर्णय होण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे तयारी नसलेल्या इच्छुक उमेदवारांमध्येही चलबिचल आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेपेक्षा भाजपाला अधिक जागा मिळाल्यामुळे शिवसेनेबरोबर सातत्याने औरंगाबाद महापालिकेत फरफटत जाणाऱ्या भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेच्या बरोबरीनेच विधानसभेसाठी जागा मिळायला हव्यात असे वाटते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मात्र, भाजपा खूपच डोक्यावर चढत असल्याची भावना असून, त्यांना ११७ पेक्षा जास्त जागा देता कामा नये, असे वाटते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जागावाटपाचा तिढा काहीही करून सुटावा व आघाडी व्हावी, असे वाटत आहे. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नंदकुमार घोडेले यांनी यासंदर्भात सांगितले की, जागावाटपावरून काही वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसत असले तरी शिवसेना आणि भाजपासह महायुती होईल हे निश्चित. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजित देशमुख म्हणाले की, महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी व्हायला पाहिजे आणि आघाडी होईल, असा विश्वास आहे. लवकरात लवकर आघाडी व्हावी, असे वाटते.