शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एथर एनर्जीची ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी;तर ड्रोन कंपनी येण्यासाठी उद्योग वर्तुळातून प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 12:10 IST

शासनाकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता

औरंगाबाद : इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणाऱ्या एथर एनर्जी या कंपनीने डीएमआयसीअंतर्गत येणाऱ्या ऑरिकमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच एंड्रेस- हाऊजर चीनमधील प्रकल्प भारतात आणण्याची तयारी करीत असून ती गुंतवणूक ऑरिकमध्ये होण्यासह डिफेन्स क्लस्टरच्या अनुषंगाने ड्रोन उत्पादन करणाऱ्या कंपनीची गुंतवणूकदेखील येथेच व्हावी. यासाठी उद्योग वर्तुळातून प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत उद्योग संघटनांच्या मागणीला यश येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुमारे एक ते तीन हजार कोटींच्या दरम्यान गुंतवणुकीची घोषणा शासनस्तरावर होण्याची शक्यता आहे.

कॉस्मो फिल्म्स, पीरामल तसेच एंड्रेस- हाऊजर, एथर कंपनीची ऑरिक सिटीमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲण्ड काॅमर्स (सीएमआयए) शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कंपनीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.

पीरामल फार्मा, कॉस्मो फिल्म्स या कंपन्यांनी ऑरिक येथे मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या प्रकल्पांमुळे बिडकीन येथे गुंतवणूक येत असून पुढील काळात येथे टेक्सटाईल पार्क, फूड पार्क आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय हबच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होण्याच्या शक्यतेवर बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली. २२ नोव्हेंबर रोजी विभागातील उद्योग क्षेत्राविषयी सीएमआयए सोबत सविस्तर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. बैठकीला उद्योग प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकानी, सीएमआयएचे अध्यक्ष नितीन गुप्ता, एथर एनर्जी संचालक व जनसंपर्क अधिकारी मुरली शशीधरन, पिरामल फार्मा सोल्युशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि ग्लोबल हेड प्रोजेक्ट्स मयंक मट्टू, कॉस्मो फिल्मचे अशोक जयपूरिया, नीरज जैन, राजेश गुप्ता, सीएमआयएचे मानद सचिव अर्पीत सावे, अथर्वेशराज नंदावत आदी उपस्थित होते.

औरंगाबाद मराठवाड्याचे ग्राेथ इंजिन-------सीएमआयएचे अध्यक्ष गुप्ता बैठकीत म्हणाले, मराठवाड्याचे ग्रोथ इंजिन म्हणून औरंगाबादकडे बघितले जाते. येथे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा मोठा उद्योग येणे खूप गरजेचे आहे. ऑटोमोबाइल, फार्मा, सीड्स, ईव्ही, इलेक्ट्राॅनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया क्षेत्रातील नामांकित कंपन्या गुंतवणूक करू पाहत आहेत. ऑरिक येथे ड्रोन निर्मिती प्रकल्प तसेच संरक्षण क्लस्टरची स्थापना राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. तसेच फेब्रुवारी आणि मे २०२३ मध्ये औरंगाबादमध्ये होणाऱ्या जी- २० शिखर परिषदचे प्रतिनिधी शहरात येणार आहेत. त्यासाठी शहराच्या सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी शासनाने निधी देण्याची मागणी मानद सचिव सावे यांनी केली. उद्योग वीज सवलत योजनेची पुनर्स्थापना करण्याची मागणी नंदावत यांनी केली.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसाय