शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

Atal Bihari Vajpayee : ‘हम तो जागे हैं, हम कहाँ सोये हैं’; अटलबिहारी वाजपेयींचा औरंगाबादशी होता विशेष स्नेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 4:02 PM

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले.

औरंगाबाद : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा औरंगाबादशी वेगळा स्नेह होता. जनसंघापासून ते देशाच्या विदेशमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात वाजपेयी अनेक वेळा या ऐतिहासिक शहरात येऊन गेले. वाजपेयींच्या प्रमुख उपस्थितीत बैठका आणि जनसभाही झाल्या. अनेकदा त्यांनी सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम केला. त्यावेळेस रात्रीच्या छोटेखानी मैफलीत ते संसदेमधील किस्से, कविता सर्वांना सांगत असत. शहरातील माजी आ. शालिग्राम बसैये, तसेच सुधीर देशपांडे (आबासाहेब) यांच्या घरीही ते येऊन गेले होते. या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी दयाराम बसैये व आबासाहेब देशपांडे यांनी सांगितल्या आहेत. 

‘ओ भाजपके लाल, तुम अब तो जागो’ दयाराम बसैैये यांनी सांगितले की, स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये आतंकवाद वाढला होता. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी औरंगाबादेत आले होते. आमचे बंधू त्यावेळेस भाजपचे शहराध्यक्ष होते. पंजाबमधील आतंकवादामुळे चिडून मी कविता लिहिली होती आणि आमचे मोठे बंधू शालिग्राम बसैये यांना मी ती कविता अटलजींना दाखविण्याची विनंती केली. सुभेदारी गेस्ट हाऊसवर बंधूंनी अटलजींशी माझी भेट करून दिली. अटलजी म्हणाले की, दयाराम आपने कविता की है बहुत अच्छे, तुम्हने ही कविता की है ना. मी म्हणालो हो. लगेच अटलजीने कविता लिहिलेला कागद माझ्या हातातून घेतला व म्हणाले ‘अब बोलो कविता’. कविता मुखपाठ होती. ‘ओ भाजप के लाल, तुम अब तो जागो’ ही कविता मी म्हटली. लगेच अटलजी म्हणाले की ‘हम तो जागे है, हम कहाँ सोये है’ या हजरजबाबी उत्तराने उपस्थितांमध्ये एकच हास्य पिकले. 

ते म्हणाले, येथे स्वयंसेवकांची संख्या कमी...दयाराम बसैये यांनी सांगितले की, अटलजी जेव्हा विदेशमंत्री होते. त्यावेळेस शहरात कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. सुभेदारी गेस्ट हाऊसवर मुक्काम करून सकाळी चिकलठाणा विमानतळावर ते जाण्यासाठी निघाले. विमान येण्यास वेळ असल्याने त्यांनी लेबर कॉलनी येथील राणाप्रताप प्रभात शाखेत हजेरी लावली. त्यावेळेस तेथील छोटे मैदान नागरिकांनी खचून भरून गेले होते. त्यावेळेस अटलजींचे ऊर्जेने भरलेले बौद्धिक पार पडले. त्यावेळेस उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. ते पाहून अटलजी लगेच म्हणाले की, या ठिकाणी स्वयंसेवकांची संख्या खूप कमी आहे. बिगरस्वयंसेवक जास्त आहेत. कारण, स्वयंसेवक शाखेत कधीच टाळ्या वाजवत नाहीत.

कार्यकर्ते विसरून जातात म्हणून...विदेशमंत्री असताना अटलजी विमानाने सकाळी शहरात आले. नेहमीप्रमाणे त्यांची व्यवस्था सुभेदारी गेस्ट हाऊसवर करण्यात आली होती. दयाराम बसैये म्हणाले की, त्यादिवशी सकाळी अटलजी सुभेदारी गेस्ट हाऊसवर पोहोचल्यावर फ्रेश होऊन आले आणि शालिग्राम बसैये यांना म्हणाले की, मेरा कल का हवाईजहाज का तिकीट किधर है. त्यावेळेस बंधूंनी लगेच तिकीट त्यांच्याकडे सुपूर्द केले. मी म्हटले की, ‘अटलजी असे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, ‘कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आधी व पश्चात नियोजनात असतात. जेव्हा विमानाने जायची वेळ येते तेव्हा तिकीट कोणत्या कार्यकर्त्याकडे दिले हे माहीत नसते. ज्याच्याकडे  असते तोही व्यस्त असतो. आपली अडचण होऊ नये, म्हणून मी आधीच तिकीट मागून घेत असतो. 

बदले नही अटलजी जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, भाजपच्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी शहरात आले होते. त्यावेळेस दयाराम बसैये यांनी हिंदीतून मराठीत अनुवाद केलेले ‘वंदले अटलजी’ हे पुस्तक मोठे बंधू शालिग्राम बसैये यांनी अडवाणींना दिले. त्यांनी दिल्लीमध्ये ते पुस्तक अटलजींकडे सुपूर्द केले. ‘वंदले अटलजी’ हे वाचून लगेच अटलजी अडवाणींना म्हणाले, ‘बदले नही अटलजी, मै तो वही हू, वंदले अटलजी,’ असे म्हणत त्यांनी कोटी केली. त्यावेळेस अडवाणीही मोठ्याने हसले. 

रात्रीच्या वेळी रंगणारी मैफलदयाराम बसैये यांनी सांगितले की, जेव्हा अटलजी औरंगाबादेत येत तेव्हा तेव्हा सुभेदारी गेस्ट हाऊस येथे त्यांचा मुक्काम असे. मग आमचे मोठे बंधू शालिग्राम बसैये, ओमप्रकाश बसैये, लहान बंधू जगन्नाथ बसैये, तसेच शहरातील जनसंघाचे व नंतर भाजपचे कार्यकर्ते असे काही जण यांची रात्री ८.३० वाजेनंतर मैफल रंगत असे. अटलजी म्हणायचे, ‘बसैय्ये बंधू आपने मेरा दूध और च्यवनप्राश लाया क्या.’ गरमागरम दूध पिल्यानंतर व च्यवनप्राश खाल्ल्यानंतर अटलजी संसदेतील तत्कालीन दिग्गज नेत्यांचे भाषण व तेथील गमती-जमती त्यांच्या स्टाईलमध्ये सांगत असत. अखेरीस स्वरचित काही ओळीही ते ऐकवत असत. अटलजींचा असा सहवास आम्हाला काही वेळा लाभला. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू