शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ शेतकरी इच्छुक

By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST

औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.

औरंगाबाद : डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातील ३७१ बागायतदारांनी इच्छा दर्शविली आहे. निर्यातक्षम डाळिंब तयार करण्याची क्षमता असणाऱ्या उत्पादकांचे नाव वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. निर्यातीच्या दराचा फायदा थेट उत्पादकाला मिळावा यासाठी कृषी पणन मंडळ निर्यातदार व उत्पादकांची भेट घडवून आणणार आहे. डाळिंबाची साल जाड असल्याने त्याचे आयुष्यमान इतर फळांच्या मानाने जास्त असते. या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे दूरवरच्या बाजारपेठेत पाठवणे शक्य होते. शीतगृहात शून्य अंश तापमान आणि ९० टक्के आर्द्रता ठेवली असता फळे चार महिन्यांपर्यंत उत्तम तऱ्हेने साठवून ठेवता येतात. मराठवाड्यात १००७५ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब बागा आहेत. त्यातील औरंगाबाद जिल्ह्यात ४४०० हेक्टर क्षेत्रावर बागा उभ्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निर्यातीसाठी नाशिक येथील दलालांशी संपर्क करावालागतो. दलाली द्यावी लागत असल्याने कमी भाव मिळतो. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला असून निर्यातक व डाळिंब उत्पादक यांची थेट भेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केलाआहे. विभागीय कार्यालयाचे उपसरव्यवस्थापक संतोष आळसे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील शेतकरी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन करतात; पण निर्यातीसाठी नावनोंदणी करत नसल्याने निर्यात होत नाही. ज्यांनी नोंदणी केली, त्या शेतकऱ्यांच्या नावाने डाळिंब निर्यातीला पाठवावी लागतात. यासाठी सर्वप्रथम आम्ही उत्पादकांची नोंदणी सुरू केली. नावनोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब कसे तयार करायचे याची इत्थंभूत माहिती देण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. यानंतर निर्यातदार व उत्पादकांची थेट भेट घडवून आणण्यात येणार आहे. जेणेकरून मधल्या दलालांची साखळी कमी होऊन उत्पादकांना चांगला भाव मिळेल.आंबा निर्यात सुविधा केंद्रात डाळिंबालाही परवानगी कृषी पणन मंडळाच्या वतीने जालन्यात केशर आंबा निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. मागील वर्षी या केंद्रातून १६ टन केशर निर्यातीसाठी पाठविण्यात आला होता. हंगामातच या केंद्राचा वापर करण्यात येतो. डाळिंब हे वर्षभर उपलब्ध असते. मराठवाड्यातील डाळिंबांची निर्यात वाढविण्यासाठी आता जालन्यातील आंबा निर्यात सुविधा केंद्राचा वापर करण्यात येणार आहे. या केंद्रात यांत्रिक प्रतवारी, प्रशीतकरणगृह, शीतगृह, रायपनिंग चेंबर व पॅक हाऊसची व्यवस्था आहे. येथे प्रक्रिया करून थेट निर्यातीसाठी डाळिंब पाठविता येणार आहे. याचा फायदा उत्पादकांना होईल.आजपर्यंत ३७१ उत्पादकांनी अर्ज सादर केले आहेत. यात वैजापूर तालुक्यातील २८७, फुलंब्री ३१, सिल्लोेड ३१, खुलताबाद ५, कन्नड ५, पैठण १ अशा ३६३ शेतकऱ्यांचे अर्ज मंडळास प्राप्त झाले आहेत. याशिवाय जालना व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी ४ अशा एकूण ३७१ उत्पादकांनी अर्ज भरले आहेत. या सर्वांची माहिती ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अनार नेट’ या वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे.