शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

आषाढी, मोहर्रमला छत्रपती संभाजीनगरात निर्जळी; जलवाहिनी फुटल्याने २६ तास पाणीपुरवठा बंद

By मुजीब देवणीकर | Updated: July 18, 2024 14:14 IST

ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणारी १२०० मिमीची जलवाहिनी मंगळवारी सकाळी ८ वाजता ढोरकीन येथे फुटली. जलवाहिनीची दोन वेळेस दुरुस्ती, त्यानंतर जायकवाडीच्या विद्युत पॅनलमधील बिघाड दूर करण्यासाठी मनपाला तब्बल २६ तास लागले. शहरात एक थेंबही पाणी न आल्याने जलकुंभ कोरडे पडले. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. अनेक नागरिकांना वापरण्यासाठी खासगी टँकर, पिण्यासाठी जार आणावे लागले. शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य:स्थितीत तीन जलवाहिन्या आहेत. सर्वांत मोठी जलवाहिनी म्हणजे १२०० मिमी व्यासाची होय. याच जलवाहिनीने मंगळवारी सकाळी ढोरकीन गावाजवळ दगा दिला. दुपारी अडीच वाजेपर्यंत मनपाने दुरुस्तीचे काम पूर्णही केले होते. तपासणीत काही प्रमाणात गळती राहिल्याचे लक्षात आले. मग परत दुरुस्तीला सुरुवात करावी लागली. ज्या ठिकाणी दुरुस्ती करायची होती, तेथील जलवाहिनीचा पत्रा बराच नाजूक झालेला होता. मध्यरात्री दोन वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. पंप सुरू करण्यास जायकवाडीत सांगण्यात आले. तेथील विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. दुरुस्तीची कामे यांत्रिकी विभागाने केली. सकाळी १०:३० वाजता जायकवाडीतील उपसा पंप सुरू करण्यात आले. दुपारी एक वाजेनंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. शहराचा पाणीपुरवठा जवळपास २६ तास बंद होता.

आषाढी आणि मोहर्रमबुधवारी शहरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी उपवास ठेवले होते. त्याचप्रमाणे मुस्लिम बहुल भागात मोहर्रमनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. खासगी टँकर आणि पाण्याचे जार मागवून तहान भागवावी लागली.

दुपारनंतर टप्पे सुरूशहरात पाणी येण्यास सुरुवात झाल्यावर दुपारी ३ ते ४ वाजेनंतर शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू करण्यात आले. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्यांना बुधवारी प्राधान्याने पाणी देण्यात आले. बुधवारी ज्या वसाहतींना पाणी देण्याचा दिवस होता, त्यांना गुरुवारी पाणी मिळेल, असे मनपाकडून सांगण्यात आले.

काही वसाहतींना कमी दाबाने पाणी१२०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद असताना जुन्या शहराची ७०० मिमी आणि नव्याने टाकलेली ९०० मिमीची जलवाहिनी सुरू होती. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे शहरात ३० ते ३५ एमएलडी पाणी येत होते. काही वसाहतींना अत्यंत कमी दाबाने पाणी देण्याचा प्रयत्न केल्याचे मनपाकडून कळविण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी