शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आषाढी, मोहर्रमला छत्रपती संभाजीनगरात निर्जळी; जलवाहिनी फुटल्याने २६ तास पाणीपुरवठा बंद

By मुजीब देवणीकर | Updated: July 18, 2024 14:14 IST

ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला.

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणारी १२०० मिमीची जलवाहिनी मंगळवारी सकाळी ८ वाजता ढोरकीन येथे फुटली. जलवाहिनीची दोन वेळेस दुरुस्ती, त्यानंतर जायकवाडीच्या विद्युत पॅनलमधील बिघाड दूर करण्यासाठी मनपाला तब्बल २६ तास लागले. शहरात एक थेंबही पाणी न आल्याने जलकुंभ कोरडे पडले. ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. अनेक नागरिकांना वापरण्यासाठी खासगी टँकर, पिण्यासाठी जार आणावे लागले. शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सद्य:स्थितीत तीन जलवाहिन्या आहेत. सर्वांत मोठी जलवाहिनी म्हणजे १२०० मिमी व्यासाची होय. याच जलवाहिनीने मंगळवारी सकाळी ढोरकीन गावाजवळ दगा दिला. दुपारी अडीच वाजेपर्यंत मनपाने दुरुस्तीचे काम पूर्णही केले होते. तपासणीत काही प्रमाणात गळती राहिल्याचे लक्षात आले. मग परत दुरुस्तीला सुरुवात करावी लागली. ज्या ठिकाणी दुरुस्ती करायची होती, तेथील जलवाहिनीचा पत्रा बराच नाजूक झालेला होता. मध्यरात्री दोन वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. पंप सुरू करण्यास जायकवाडीत सांगण्यात आले. तेथील विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. दुरुस्तीची कामे यांत्रिकी विभागाने केली. सकाळी १०:३० वाजता जायकवाडीतील उपसा पंप सुरू करण्यात आले. दुपारी एक वाजेनंतर शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. शहराचा पाणीपुरवठा जवळपास २६ तास बंद होता.

आषाढी आणि मोहर्रमबुधवारी शहरात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांनी उपवास ठेवले होते. त्याचप्रमाणे मुस्लिम बहुल भागात मोहर्रमनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ऐन सणासुदीच्या दिवशी नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. खासगी टँकर आणि पाण्याचे जार मागवून तहान भागवावी लागली.

दुपारनंतर टप्पे सुरूशहरात पाणी येण्यास सुरुवात झाल्यावर दुपारी ३ ते ४ वाजेनंतर शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे सुरू करण्यात आले. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही, त्यांना बुधवारी प्राधान्याने पाणी देण्यात आले. बुधवारी ज्या वसाहतींना पाणी देण्याचा दिवस होता, त्यांना गुरुवारी पाणी मिळेल, असे मनपाकडून सांगण्यात आले.

काही वसाहतींना कमी दाबाने पाणी१२०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद असताना जुन्या शहराची ७०० मिमी आणि नव्याने टाकलेली ९०० मिमीची जलवाहिनी सुरू होती. या दोन्ही जलवाहिन्यांद्वारे शहरात ३० ते ३५ एमएलडी पाणी येत होते. काही वसाहतींना अत्यंत कमी दाबाने पाणी देण्याचा प्रयत्न केल्याचे मनपाकडून कळविण्यात आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी