शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

फडणवीस सरकारच्या आणखी एका योजनेवर संक्रांत; मराठवाडा वॉटर ग्रीडच्या निविदा थांबविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:41 IST

मराठवाड्याच्या टप्प्यात वॉटर ग्रीडचे जे काम होणार आहे, त्याच्या निविदा सुमारे ४५०० कोटींच्या आसपास आहेत.

ठळक मुद्देबीड, जालना येथील कामांची सुरुवात अधांतरी शासनाच्या धोरणाकडे लक्ष 

औरंगाबाद : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेची पुन्हा तपासणी करून योग्यता सिद्ध करण्यासाठी जलतज्ज्ञांचा अभिप्राय मागविण्याचे वक्तव्य केल्यामुळे ग्रीडच्या कामासाठी जालना आणि बीड जिल्ह्याच्या मंजूर झालेल्या निविदांची पुढील प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.  

बीड आणि जालना जिल्ह्यांतील कामांसाठी जीवन प्राधिकरणाने निविदा मागवून कामाला सुरुवात करण्यास पाऊल उचलले होते; परंतु आता योजनेच्या योग्यता तपासणीमुळे प्राधिकरणाने सध्या ‘जैसे थे’ची भूमिका घेतली आहे. मागील वर्षभर योजनेसाठी करण्यात आलेला सर्व्हे, त्यासाठी २२ कोटींचा केलेला खर्च तसेच निविदा प्रक्रियेसाठी केलेली मेहनत यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. जलसंधारण आयुक्तालयातून वॉटर ग्रीडसाठी काही महत्त्वाचे इनपुट देण्यात आले होते. इस्रायल एजन्सीमार्फत योजनेचे काम पुढे जाणार होते. एमजेपीला तांत्रिक संस्था म्हणून सोबत घेण्यात आले आहे. जायकवाडी धरणावर असलेल्या धरणक्षेत्रांपासून वॉटर ग्रीड राबविण्याचा विचार मध्यंतरी पुढे आला; परंतु निर्णय झाला नाही. 

४५०० कोटींच्या आसपास निविदामराठवाड्याच्या टप्प्यात वॉटर ग्रीडचे जे काम होणार आहे, त्याच्या निविदा सुमारे ४५०० कोटींच्या आसपास आहेत. त्या सर्व निविदांच्या प्रक्रिया सचिव पातळीवर आहेत. ती सर्व प्रक्रिया उच्च पातळीवर असल्यामुळे विभागीय पातळीवर त्याची कुठलीही माहिती सध्या तरी नाही. जालन्यातील १७५ गावांसाठीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली, तसेच बीडच्या निविदांबाबत अजून काहीही सुरुवात झाली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. शासनाच्या धोरणामुळे सर्व प्रक्रिया रेंगाळेल, अशी भीती सूत्रांनी व्यक्त केली. 

सरकारच्या धोरणावर योजनेचे भवितव्य हा सगळा शासनपातळीवरील विषय आहे. ४ फेबु्रवारीपर्यंत निविदांच्या बाबतीत मुदतवाढ दिलेली आहे. उच्च अधिकार समितीची एक बैठक दोन दिवसांपूर्वी झाली आहे; परंतु सध्या आम्ही सगळे काही थांबविले आहे. पुढे काय धोरण ठरते, हे माहिती नाही. शासनाकडे योजनेच्या योग्यतेबाबत तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ आहेत. पाण्याचा अनुशेष आहे, त्यावर काही उपाय शोधावाच लागेल. मागील आणि विद्यमान सरकारचे धोरण काय आहे, त्यावर योजना पुढे जाईल. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता आर.एस. लोलपाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

वॉटर ग्रीड मराठवाड्यासाठी वरदानचमरावाड्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी वॉटर ग्रीड योजना व्यवहार्य नसल्याचा मुद्दा पुढे करून ही योजना रद्द करण्याच्या सरकारच्या हालचाली खेदजनक आहेत, आम्ही ही योजना करतोना देशातीलच नव्हे तर परदेशातील तज्ज्ञांकडून अभ्यास करून नंतरच ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला होता; परंतु अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखल्याचा आरोप करून ती व्यवहार्य नसल्याचे सांगितले. त्यात तथ्य नसल्याचा दावा आ. तथा  माजी पाणीुपरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित पत्र परिषदेत केला. 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाBabanrao Looneykarबबनराव लोणीकरState Governmentराज्य सरकार