शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अनसरवाड्यात अधिकाऱ्यांचा राबता !

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

गोविंद इंगळे , निलंगा संसद दत्तक ग्राम योजनेसाठी निलंगा तालुक्यातील अनसरवाडा गावाची निवड खासदारांनी केली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या विभागाचे अधिकारी भेटी देत आहेत.



गोविंद इंगळे , निलंगा
संसद दत्तक ग्राम योजनेसाठी निलंगा तालुक्यातील अनसरवाडा गावाची निवड खासदारांनी केली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या विभागाचे अधिकारी भेटी देत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, गावाचा चेहरामोहरा बदलेल, अशी आशा गावकरी बाळगत आहेत. गाव निवडताना खासदारांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेला कौल पाहिल्याचे दिसते. शिवाय, हे गावही यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या विशेष कामासाठी निवडले होते.
५८२ उंबरठ्यांचे गाव असलेल्या अनसरवाड्यात ३ हजार २२ मतदार असून, राजकारणात हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. भाजयुमोचे जिल्हाध्यक्षपद तसेच पं.स. सदस्य, लातूर जिल्हा दूध डेअरीचे चेअरमन, कृषी विद्यापीठाचे संचालक म्हणून या गावातील कार्यकर्त्यांनी पदे भूषविली असून, सामाजिक सलोखा असलेल्या या गावात विविध जाती-धर्मांचे लोक गुण्या-गोविंदाने नांदतात. विकासाच्या सुविधा म्हणाव्या तेवढ्या नसल्या तरी ग्रामस्थांनी कधी याची ओरड केली नाही. भारत निर्माण योजनेअंतर्गत पाण्याची सुविधा आहे. परंतु, वितरण व्यवस्थित होत नसल्याने पाणीटंचाईचा सामना नेहमीच करावा लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्र, १३३ के.व्ही. उपकेंद्राची मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे. आता संसद दत्तक ग्रामयोजनेत गावाची निवड झाल्यामुळे प्रलंबित मागणी मार्गी लागेल, अशी आशाही गावकऱ्यांना आहे. अनसरवाडा गावाला जोडलेले रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे दळणवळणाची गैरसोय होते. संसद दत्तक ग्रामयोजनेत या गावाची निवड झाल्यामुळे अनसरवाडा ते सिंदखेड दोन कि.मी., माकणी दोन कि.मी., शिवरस्ता पाच कि.मी., गुंजरगा ५ कि.मी., येळनूर ८ कि.मी., खडीकेंद्र २ कि.मी., दर्गा रस्ता व स्मशानभूमीचा रस्ता दुरुस्त होईल, अशी अपेक्षा गावकरी व्यक्त करीत आहेत. गावात व शेतीला अत्यंत कमी दाबाची व कमी वेळ वीज मिळते. त्यामुळे बागायती शेतीचे उत्पन्न घटले आहे. जोडव्यवसाय करण्यास काही वाव नाही. वीज नसल्यामुळे भाजीपाला पिके घेणेही शक्य नाही. परंतु, आता संसद दत्तक ग्रामयोजनेत खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी या गावाला आदर्श गाव बनविण्यासाठी निवड केली आहे. त्यामुळे प्रस्तुत सुविधा मिळतील, अशी आशा ग्रामस्थांमध्ये आहे. ४
अनसरवाडा गावात भटक्या विमुक्त समाज राहतो. डोंबारी समाजाचे दोनशेवर नागरिक आहेत. त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही की, मतदारयादीत नाव. शिक्षणापासून समाज वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या गावाची निवड दत्तक योजनेत केली. पैसा कितीही लागला तरी तो प्राप्त केला जाईल, असे खा.डॉ. सुनील गायकवाड म्हणाले.४
नाल्यांवर सरळीकरण करून ‘शिरपूर पॅटर्न’ राबवून जलसंधारणाची कामे करावीत. सिंचन वाढल्याशिवाय गावाची प्रगती होणार नाही. हलक्या प्रतीच्या जमिनीला पाण्याची सोय झाल्यावर प्रगती साधता येईल.
- अजित माने, भाजयुमो जिल्हाध्यक्ष
अनसरवाडा गावाला जोडणारे रस्ते अत्यंत खराब आहेत. स्मशानभूमीचा रस्ताही खराब आहे. यामुळे गैरसोय होते. या रस्त्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरण केल्यास दळणवळणाची सोय होईल.
-नरसिंग कांबळे, अनसरवाडा
शेतांकडे जाणारे पाणंद रस्ते झाले तर शेतकऱ्यांचा शेतमाल बाहेरगावी व घराकडे आणण्यास सोयीचे होईल. शेतीवरील प्रक्रिया व मार्गदर्शन केंद्र येथे झाल्यास गावाचा विकास होईल.
-अभंग माने, अनसरवाडा
गावात विजेची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. सिंचन विहिरी आहेत, परंतु कमी दाबाची वीज असल्यामुळे बागायती शेती करता येत नाही. त्यासाठी विजेची सोय होणे गरजेचे आहे.
-शिवाजी बडगिरे, अनसरवाडा
एक हजारांपेक्षा जास्त पशुधन गावात आहे. ११०० लिटर्स दूध शहरात जाते. त्यामुळे या गावात पशुवैद्यकीय दवाखाना, युवकांसाठी व्यायामशाळा, मार्गदर्शन केंद्र, पाण्याची सोय व्हावी.
-प्रशांत काळगे, अनसरवाडा
आरोग्य केंद्र, शिक्षणाच्या सुविधा, विजेची समस्या आणि रस्त्यांमुळे गैरसोय अनसरवाडा ग्रामस्थांची होते. या सर्व बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. जेणेकरून आमच्या गावाला चांगले वैभव प्राप्त होईल.
- विजय सूर्यवंशी, अनसरवाडा