शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

अंबर म्हणजे अमूल्य हिरा; जाणून घ्या औरंगाबादचे शिल्पकार गुलाम चापू ऊर्फ मलिक अंबरची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 20:21 IST

आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

ठळक मुद्देनहर-ए- अंबरीद्वारे शहरात पाणी आणलेशेतसारा वसुली, तोडरमल पद्धती केली सुरू

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : इथिओपियाच्या कंबाटा प्रांतात जन्मलेला चापू हा कृष्णवर्णीय. त्याचे कुटुंब मूर्तिपूजक. आता आपण ज्या शहराला हरारे म्हणून ओळखतो, ते अन्कंबाटा हा डोंगराळ परिसर. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीशी नाते सांगणारा. त्या डोंगराळ भागाला अबसिनिया या प्रदेशातील लोकांना हबशी म्हटले जाते. चापूची गुलाम म्हणून विक्री होत-होत तो अहमदनगरात पोहोचला. युद्धनीती व चातुर्याच्या जोरावर राज्यकारभार हाती घेत त्याने तत्कालीन औरंगाबाद वसविले. आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

डोंगरदऱ्यात  राहणारे हबशी लोक अंगपिंडाने काटकच. तो काळ गुलाम विकण्याचा. चापूच्या कुटुंबाने त्याची विक्री केली. येमेनहून तो बगदादला आणला गेला. तेथील बाजारात बगदादचा दलाल मीर कासीमने त्याला विकत घेतले. चापू अंगाने काटक  आणि बुद्धीनेही चुणचुणीत असल्याचे हेरून कासीमने त्याला शिकवणे सुरू केले. त्याला इस्लाम बनविले आणि नाव ठेवले अंबर. अंबर म्हणजे अरबी भाषेत अमूल्य हिरा. वाळवंटात कालव्याने खेळणारे पाणी चापू पाहत होता.  शिकत होता. युद्धकला व अरबी भाषेतही तो निपुण झाला. पैलू पाडलेला हा हिरा कासीमने भारतातील अहमदनगरच्या निजामाला विकला. निझामाचा पंतप्रधान चंगेजखानने त्याला विकत घेतले. चंगेजखानही हबशी होता. अष्टपैलू अंबरने लवकरच चंगेजखानच्या हृदयात आपले स्थान मिळविले व त्याचा तो मानसपुत्र ठरला. चंगेजखानच्या निधनानंतर अंबरची गुलामी गेली व तो स्वतंत्र सैन्य उभारून सेनापती झाला.

तत्कालीन दख्खनमध्ये अहमदनगरचा निजाम, विजापूरचा अदिलशहा आणि उत्तरेत मुगल होते. सत्तासंघर्ष पेटलेला होता. यात अंबर उतरला. त्याच्या सैन्य दलात अरबी व हबशी शिपाई होते.  त्याने इथियोपियातील युद्धकला शिकवून सैन्यास निष्णात केले होते. आता दरारा व लौकिकही होऊन तो मलिक अंबर नावाने ओळखला जात होता. नगरच्या चांदबीबीच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहपासून निजामशाही वाचविण्यासाठी मलिक अंबरला निमंत्रण गेले. त्याने अकबराच्या सैन्याला पळवून लावले. अल्पवयीन सुलतानाला गादीवर बसवून मलिक अंबरने सत्ता हाती घेतली. त्याने पुढे खडकी हे सुनियोजित शहर वसविले. त्यात निजामशाहीची राजधानी हलविली. नहर- ए- अंबरी ही योजना आखून नहरीने शहरात पाणी आणले. शेतसारा वसुली तोडरमल पद्धतीने सुरू केली. रस्ते बांधले. अनेक इमारती उभारल्या. त्याने उभारलेली बाबा शाह मुसाफिर यांच्यासाठीची पाणचक्की आजही कार्यरत आहे. मलिक अंबरच्या सर्वात विश्वासू सरदारात मालोजी आणि विठोजी होते. या भोसले बंधूंकडे वेरूळची जहागिरी होती. 

या महान प्रशासक व युद्धकुशल सेनापतीची १४ मे रोजी पुण्यतिथी आहे. पैठण येथे जन्मलेले शेख चांद यांनी १९३० मध्ये संशोधन करून मलिक अंबर हे  १६२ पानांचे उर्दू भाषेतील पुस्तक  लिहिले आहे. यासाठी त्यांनी मोठे संशोधनही केले. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण दिल्लीचे  सय्यद माजेद जनाह यांनी २०१९ मध्ये केले. त्यात त्यांनी शेख चांद यांनी केलेले संशोधन जोडले असून, आता हे पुस्तक २०८ पानांचे झाले आहे. औरंगाबादेतील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी हे त्यांचे देशातील वितरक आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादhistoryइतिहासMarathwadaमराठवाडा