शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

अंबर म्हणजे अमूल्य हिरा; जाणून घ्या औरंगाबादचे शिल्पकार गुलाम चापू ऊर्फ मलिक अंबरची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 20:21 IST

आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

ठळक मुद्देनहर-ए- अंबरीद्वारे शहरात पाणी आणलेशेतसारा वसुली, तोडरमल पद्धती केली सुरू

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : इथिओपियाच्या कंबाटा प्रांतात जन्मलेला चापू हा कृष्णवर्णीय. त्याचे कुटुंब मूर्तिपूजक. आता आपण ज्या शहराला हरारे म्हणून ओळखतो, ते अन्कंबाटा हा डोंगराळ परिसर. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीशी नाते सांगणारा. त्या डोंगराळ भागाला अबसिनिया या प्रदेशातील लोकांना हबशी म्हटले जाते. चापूची गुलाम म्हणून विक्री होत-होत तो अहमदनगरात पोहोचला. युद्धनीती व चातुर्याच्या जोरावर राज्यकारभार हाती घेत त्याने तत्कालीन औरंगाबाद वसविले. आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

डोंगरदऱ्यात  राहणारे हबशी लोक अंगपिंडाने काटकच. तो काळ गुलाम विकण्याचा. चापूच्या कुटुंबाने त्याची विक्री केली. येमेनहून तो बगदादला आणला गेला. तेथील बाजारात बगदादचा दलाल मीर कासीमने त्याला विकत घेतले. चापू अंगाने काटक  आणि बुद्धीनेही चुणचुणीत असल्याचे हेरून कासीमने त्याला शिकवणे सुरू केले. त्याला इस्लाम बनविले आणि नाव ठेवले अंबर. अंबर म्हणजे अरबी भाषेत अमूल्य हिरा. वाळवंटात कालव्याने खेळणारे पाणी चापू पाहत होता.  शिकत होता. युद्धकला व अरबी भाषेतही तो निपुण झाला. पैलू पाडलेला हा हिरा कासीमने भारतातील अहमदनगरच्या निजामाला विकला. निझामाचा पंतप्रधान चंगेजखानने त्याला विकत घेतले. चंगेजखानही हबशी होता. अष्टपैलू अंबरने लवकरच चंगेजखानच्या हृदयात आपले स्थान मिळविले व त्याचा तो मानसपुत्र ठरला. चंगेजखानच्या निधनानंतर अंबरची गुलामी गेली व तो स्वतंत्र सैन्य उभारून सेनापती झाला.

तत्कालीन दख्खनमध्ये अहमदनगरचा निजाम, विजापूरचा अदिलशहा आणि उत्तरेत मुगल होते. सत्तासंघर्ष पेटलेला होता. यात अंबर उतरला. त्याच्या सैन्य दलात अरबी व हबशी शिपाई होते.  त्याने इथियोपियातील युद्धकला शिकवून सैन्यास निष्णात केले होते. आता दरारा व लौकिकही होऊन तो मलिक अंबर नावाने ओळखला जात होता. नगरच्या चांदबीबीच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहपासून निजामशाही वाचविण्यासाठी मलिक अंबरला निमंत्रण गेले. त्याने अकबराच्या सैन्याला पळवून लावले. अल्पवयीन सुलतानाला गादीवर बसवून मलिक अंबरने सत्ता हाती घेतली. त्याने पुढे खडकी हे सुनियोजित शहर वसविले. त्यात निजामशाहीची राजधानी हलविली. नहर- ए- अंबरी ही योजना आखून नहरीने शहरात पाणी आणले. शेतसारा वसुली तोडरमल पद्धतीने सुरू केली. रस्ते बांधले. अनेक इमारती उभारल्या. त्याने उभारलेली बाबा शाह मुसाफिर यांच्यासाठीची पाणचक्की आजही कार्यरत आहे. मलिक अंबरच्या सर्वात विश्वासू सरदारात मालोजी आणि विठोजी होते. या भोसले बंधूंकडे वेरूळची जहागिरी होती. 

या महान प्रशासक व युद्धकुशल सेनापतीची १४ मे रोजी पुण्यतिथी आहे. पैठण येथे जन्मलेले शेख चांद यांनी १९३० मध्ये संशोधन करून मलिक अंबर हे  १६२ पानांचे उर्दू भाषेतील पुस्तक  लिहिले आहे. यासाठी त्यांनी मोठे संशोधनही केले. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण दिल्लीचे  सय्यद माजेद जनाह यांनी २०१९ मध्ये केले. त्यात त्यांनी शेख चांद यांनी केलेले संशोधन जोडले असून, आता हे पुस्तक २०८ पानांचे झाले आहे. औरंगाबादेतील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी हे त्यांचे देशातील वितरक आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादhistoryइतिहासMarathwadaमराठवाडा