शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंबर म्हणजे अमूल्य हिरा; जाणून घ्या औरंगाबादचे शिल्पकार गुलाम चापू ऊर्फ मलिक अंबरची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 20:21 IST

आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

ठळक मुद्देनहर-ए- अंबरीद्वारे शहरात पाणी आणलेशेतसारा वसुली, तोडरमल पद्धती केली सुरू

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : इथिओपियाच्या कंबाटा प्रांतात जन्मलेला चापू हा कृष्णवर्णीय. त्याचे कुटुंब मूर्तिपूजक. आता आपण ज्या शहराला हरारे म्हणून ओळखतो, ते अन्कंबाटा हा डोंगराळ परिसर. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीशी नाते सांगणारा. त्या डोंगराळ भागाला अबसिनिया या प्रदेशातील लोकांना हबशी म्हटले जाते. चापूची गुलाम म्हणून विक्री होत-होत तो अहमदनगरात पोहोचला. युद्धनीती व चातुर्याच्या जोरावर राज्यकारभार हाती घेत त्याने तत्कालीन औरंगाबाद वसविले. आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

डोंगरदऱ्यात  राहणारे हबशी लोक अंगपिंडाने काटकच. तो काळ गुलाम विकण्याचा. चापूच्या कुटुंबाने त्याची विक्री केली. येमेनहून तो बगदादला आणला गेला. तेथील बाजारात बगदादचा दलाल मीर कासीमने त्याला विकत घेतले. चापू अंगाने काटक  आणि बुद्धीनेही चुणचुणीत असल्याचे हेरून कासीमने त्याला शिकवणे सुरू केले. त्याला इस्लाम बनविले आणि नाव ठेवले अंबर. अंबर म्हणजे अरबी भाषेत अमूल्य हिरा. वाळवंटात कालव्याने खेळणारे पाणी चापू पाहत होता.  शिकत होता. युद्धकला व अरबी भाषेतही तो निपुण झाला. पैलू पाडलेला हा हिरा कासीमने भारतातील अहमदनगरच्या निजामाला विकला. निझामाचा पंतप्रधान चंगेजखानने त्याला विकत घेतले. चंगेजखानही हबशी होता. अष्टपैलू अंबरने लवकरच चंगेजखानच्या हृदयात आपले स्थान मिळविले व त्याचा तो मानसपुत्र ठरला. चंगेजखानच्या निधनानंतर अंबरची गुलामी गेली व तो स्वतंत्र सैन्य उभारून सेनापती झाला.

तत्कालीन दख्खनमध्ये अहमदनगरचा निजाम, विजापूरचा अदिलशहा आणि उत्तरेत मुगल होते. सत्तासंघर्ष पेटलेला होता. यात अंबर उतरला. त्याच्या सैन्य दलात अरबी व हबशी शिपाई होते.  त्याने इथियोपियातील युद्धकला शिकवून सैन्यास निष्णात केले होते. आता दरारा व लौकिकही होऊन तो मलिक अंबर नावाने ओळखला जात होता. नगरच्या चांदबीबीच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहपासून निजामशाही वाचविण्यासाठी मलिक अंबरला निमंत्रण गेले. त्याने अकबराच्या सैन्याला पळवून लावले. अल्पवयीन सुलतानाला गादीवर बसवून मलिक अंबरने सत्ता हाती घेतली. त्याने पुढे खडकी हे सुनियोजित शहर वसविले. त्यात निजामशाहीची राजधानी हलविली. नहर- ए- अंबरी ही योजना आखून नहरीने शहरात पाणी आणले. शेतसारा वसुली तोडरमल पद्धतीने सुरू केली. रस्ते बांधले. अनेक इमारती उभारल्या. त्याने उभारलेली बाबा शाह मुसाफिर यांच्यासाठीची पाणचक्की आजही कार्यरत आहे. मलिक अंबरच्या सर्वात विश्वासू सरदारात मालोजी आणि विठोजी होते. या भोसले बंधूंकडे वेरूळची जहागिरी होती. 

या महान प्रशासक व युद्धकुशल सेनापतीची १४ मे रोजी पुण्यतिथी आहे. पैठण येथे जन्मलेले शेख चांद यांनी १९३० मध्ये संशोधन करून मलिक अंबर हे  १६२ पानांचे उर्दू भाषेतील पुस्तक  लिहिले आहे. यासाठी त्यांनी मोठे संशोधनही केले. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण दिल्लीचे  सय्यद माजेद जनाह यांनी २०१९ मध्ये केले. त्यात त्यांनी शेख चांद यांनी केलेले संशोधन जोडले असून, आता हे पुस्तक २०८ पानांचे झाले आहे. औरंगाबादेतील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी हे त्यांचे देशातील वितरक आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादhistoryइतिहासMarathwadaमराठवाडा