शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अंबर म्हणजे अमूल्य हिरा; जाणून घ्या औरंगाबादचे शिल्पकार गुलाम चापू ऊर्फ मलिक अंबरची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 20:21 IST

आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

ठळक मुद्देनहर-ए- अंबरीद्वारे शहरात पाणी आणलेशेतसारा वसुली, तोडरमल पद्धती केली सुरू

- शांतीलाल गायकवाड  

औरंगाबाद : इथिओपियाच्या कंबाटा प्रांतात जन्मलेला चापू हा कृष्णवर्णीय. त्याचे कुटुंब मूर्तिपूजक. आता आपण ज्या शहराला हरारे म्हणून ओळखतो, ते अन्कंबाटा हा डोंगराळ परिसर. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीशी नाते सांगणारा. त्या डोंगराळ भागाला अबसिनिया या प्रदेशातील लोकांना हबशी म्हटले जाते. चापूची गुलाम म्हणून विक्री होत-होत तो अहमदनगरात पोहोचला. युद्धनीती व चातुर्याच्या जोरावर राज्यकारभार हाती घेत त्याने तत्कालीन औरंगाबाद वसविले. आज या चापू ऊर्फ निजामाचा पंतप्रधान मलिक अंबरची ३९६ वी पुण्यतिथी. यानिमित्त मलिक अंबरच्या जीवनचरित्राचा हा ओझरता परिचय. 

डोंगरदऱ्यात  राहणारे हबशी लोक अंगपिंडाने काटकच. तो काळ गुलाम विकण्याचा. चापूच्या कुटुंबाने त्याची विक्री केली. येमेनहून तो बगदादला आणला गेला. तेथील बाजारात बगदादचा दलाल मीर कासीमने त्याला विकत घेतले. चापू अंगाने काटक  आणि बुद्धीनेही चुणचुणीत असल्याचे हेरून कासीमने त्याला शिकवणे सुरू केले. त्याला इस्लाम बनविले आणि नाव ठेवले अंबर. अंबर म्हणजे अरबी भाषेत अमूल्य हिरा. वाळवंटात कालव्याने खेळणारे पाणी चापू पाहत होता.  शिकत होता. युद्धकला व अरबी भाषेतही तो निपुण झाला. पैलू पाडलेला हा हिरा कासीमने भारतातील अहमदनगरच्या निजामाला विकला. निझामाचा पंतप्रधान चंगेजखानने त्याला विकत घेतले. चंगेजखानही हबशी होता. अष्टपैलू अंबरने लवकरच चंगेजखानच्या हृदयात आपले स्थान मिळविले व त्याचा तो मानसपुत्र ठरला. चंगेजखानच्या निधनानंतर अंबरची गुलामी गेली व तो स्वतंत्र सैन्य उभारून सेनापती झाला.

तत्कालीन दख्खनमध्ये अहमदनगरचा निजाम, विजापूरचा अदिलशहा आणि उत्तरेत मुगल होते. सत्तासंघर्ष पेटलेला होता. यात अंबर उतरला. त्याच्या सैन्य दलात अरबी व हबशी शिपाई होते.  त्याने इथियोपियातील युद्धकला शिकवून सैन्यास निष्णात केले होते. आता दरारा व लौकिकही होऊन तो मलिक अंबर नावाने ओळखला जात होता. नगरच्या चांदबीबीच्या मृत्यूनंतर अकबर बादशाहपासून निजामशाही वाचविण्यासाठी मलिक अंबरला निमंत्रण गेले. त्याने अकबराच्या सैन्याला पळवून लावले. अल्पवयीन सुलतानाला गादीवर बसवून मलिक अंबरने सत्ता हाती घेतली. त्याने पुढे खडकी हे सुनियोजित शहर वसविले. त्यात निजामशाहीची राजधानी हलविली. नहर- ए- अंबरी ही योजना आखून नहरीने शहरात पाणी आणले. शेतसारा वसुली तोडरमल पद्धतीने सुरू केली. रस्ते बांधले. अनेक इमारती उभारल्या. त्याने उभारलेली बाबा शाह मुसाफिर यांच्यासाठीची पाणचक्की आजही कार्यरत आहे. मलिक अंबरच्या सर्वात विश्वासू सरदारात मालोजी आणि विठोजी होते. या भोसले बंधूंकडे वेरूळची जहागिरी होती. 

या महान प्रशासक व युद्धकुशल सेनापतीची १४ मे रोजी पुण्यतिथी आहे. पैठण येथे जन्मलेले शेख चांद यांनी १९३० मध्ये संशोधन करून मलिक अंबर हे  १६२ पानांचे उर्दू भाषेतील पुस्तक  लिहिले आहे. यासाठी त्यांनी मोठे संशोधनही केले. या पुस्तकाचे पुनर्मुद्रण दिल्लीचे  सय्यद माजेद जनाह यांनी २०१९ मध्ये केले. त्यात त्यांनी शेख चांद यांनी केलेले संशोधन जोडले असून, आता हे पुस्तक २०८ पानांचे झाले आहे. औरंगाबादेतील मिर्झा अब्दुल कय्युम नदवी हे त्यांचे देशातील वितरक आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादhistoryइतिहासMarathwadaमराठवाडा