शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

यु.म. पठाण ते नरेंद्र चपळगावकर, मराठवाड्याच्या वाट्याला सातव्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:43 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला

औरंगाबाद : वर्धा येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनापाठोपाठ सतत दुसऱ्यांदा म्हणजेच ९६ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मराठवाड्याला मिळाला आहे. अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाला मराठवाड्याने आतापर्यंत सहा अध्यक्ष दिले असून न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर हे सातवे अध्यक्ष ठरले आहेत.

कोरोना महामारीनंतर दोन वर्षांच्या खंडानंतर ९४ वे साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडले होते. त्यानंतर केवळ चार महिन्यांनंतर ९५ वे साहित्य संमेलन उदगीर येथील उदगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ ते २४ एप्रिलदरम्यान पार पडले. जालन्याचे भूमिपुत्र भारत सासणे अध्यक्षपदी होते, तर आता ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान औरंगाबादचे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना मिळाला आहे.

यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेले मराठवाड्यातील सारस्वत- डॉ. यु.म. पठाण (औरंगाबाद) हे पुण्यात १९९० मध्ये झालेल्या ६३ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (नांदेड) हे चिपळूणला २०१३ मध्ये झालेल्या ८६ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.- प्रा. फ.मुं. शिंदे (औरंगाबाद) यांनी २०१४ मध्ये सासवडे येथे झालेल्या ८७ व्या संमेलनाचे अध्यक्ष भूषविले आहे.- डॉ. श्रीपाल सबनीस (लातूर) यांनी पिंपरीत २०१६ मध्ये झालेल्या ८९ व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख (उस्मानाबाद) हे २०१८ मध्ये बडोद्याला झालेल्या ९१ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

मराठवाड्यात झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व अध्यक्षमराठवाड्यात आतापर्यंत सहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. ३९ वे साहित्य संमेलन १९५७ मध्ये औरंगाबादेत झाले होते व अध्यक्षपदी अनंत कानेकर होते. त्यानंतर मराठवाड्याच्या वाट्याला थेट १९८३ मध्ये ५७ वे साहित्य संमेलन आले. अंबाजोगाईत झालेल्या त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी व्यंकटेश मांडगूळकर हे होते. १९९५ मध्ये परभणीत ६८ वे साहित्य संमेलन कवी नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षपदी पार पडले. १९९५ नंतर लगेच तीन वर्षांनी १९९८ ला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान परळी वैजनाथला मिळाला. या ७१ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी द.मा. मिरासदार होते. त्यानंतर २००४ मध्ये औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयास ७७ वे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा सन्मान मिळाला. रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. २०२०मध्ये ९३ वे साहित्य संमेलन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबादेत संपन्न झाले.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळliteratureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद