शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

यु.म. पठाण ते नरेंद्र चपळगावकर, मराठवाड्याच्या वाट्याला सातव्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:43 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला

औरंगाबाद : वर्धा येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनापाठोपाठ सतत दुसऱ्यांदा म्हणजेच ९६ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मराठवाड्याला मिळाला आहे. अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाला मराठवाड्याने आतापर्यंत सहा अध्यक्ष दिले असून न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर हे सातवे अध्यक्ष ठरले आहेत.

कोरोना महामारीनंतर दोन वर्षांच्या खंडानंतर ९४ वे साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडले होते. त्यानंतर केवळ चार महिन्यांनंतर ९५ वे साहित्य संमेलन उदगीर येथील उदगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ ते २४ एप्रिलदरम्यान पार पडले. जालन्याचे भूमिपुत्र भारत सासणे अध्यक्षपदी होते, तर आता ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान औरंगाबादचे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना मिळाला आहे.

यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेले मराठवाड्यातील सारस्वत- डॉ. यु.म. पठाण (औरंगाबाद) हे पुण्यात १९९० मध्ये झालेल्या ६३ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (नांदेड) हे चिपळूणला २०१३ मध्ये झालेल्या ८६ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.- प्रा. फ.मुं. शिंदे (औरंगाबाद) यांनी २०१४ मध्ये सासवडे येथे झालेल्या ८७ व्या संमेलनाचे अध्यक्ष भूषविले आहे.- डॉ. श्रीपाल सबनीस (लातूर) यांनी पिंपरीत २०१६ मध्ये झालेल्या ८९ व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख (उस्मानाबाद) हे २०१८ मध्ये बडोद्याला झालेल्या ९१ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

मराठवाड्यात झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व अध्यक्षमराठवाड्यात आतापर्यंत सहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. ३९ वे साहित्य संमेलन १९५७ मध्ये औरंगाबादेत झाले होते व अध्यक्षपदी अनंत कानेकर होते. त्यानंतर मराठवाड्याच्या वाट्याला थेट १९८३ मध्ये ५७ वे साहित्य संमेलन आले. अंबाजोगाईत झालेल्या त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी व्यंकटेश मांडगूळकर हे होते. १९९५ मध्ये परभणीत ६८ वे साहित्य संमेलन कवी नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षपदी पार पडले. १९९५ नंतर लगेच तीन वर्षांनी १९९८ ला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान परळी वैजनाथला मिळाला. या ७१ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी द.मा. मिरासदार होते. त्यानंतर २००४ मध्ये औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयास ७७ वे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा सन्मान मिळाला. रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. २०२०मध्ये ९३ वे साहित्य संमेलन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबादेत संपन्न झाले.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळliteratureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद