शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

यु.म. पठाण ते नरेंद्र चपळगावकर, मराठवाड्याच्या वाट्याला सातव्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 13:43 IST

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला

औरंगाबाद : वर्धा येथे झालेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनापाठोपाठ सतत दुसऱ्यांदा म्हणजेच ९६ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मराठवाड्याला मिळाला आहे. अखिल भारतीय मराठीसाहित्य संमेलनाला मराठवाड्याने आतापर्यंत सहा अध्यक्ष दिले असून न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावर हे सातवे अध्यक्ष ठरले आहेत.

कोरोना महामारीनंतर दोन वर्षांच्या खंडानंतर ९४ वे साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडले होते. त्यानंतर केवळ चार महिन्यांनंतर ९५ वे साहित्य संमेलन उदगीर येथील उदगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात २२ ते २४ एप्रिलदरम्यान पार पडले. जालन्याचे भूमिपुत्र भारत सासणे अध्यक्षपदी होते, तर आता ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान औरंगाबादचे माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना मिळाला आहे.

यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेले मराठवाड्यातील सारस्वत- डॉ. यु.म. पठाण (औरंगाबाद) हे पुण्यात १९९० मध्ये झालेल्या ६३ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (नांदेड) हे चिपळूणला २०१३ मध्ये झालेल्या ८६ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.- प्रा. फ.मुं. शिंदे (औरंगाबाद) यांनी २०१४ मध्ये सासवडे येथे झालेल्या ८७ व्या संमेलनाचे अध्यक्ष भूषविले आहे.- डॉ. श्रीपाल सबनीस (लातूर) यांनी पिंपरीत २०१६ मध्ये झालेल्या ८९ व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले.- डॉ. लक्ष्मीकांत देशमुख (उस्मानाबाद) हे २०१८ मध्ये बडोद्याला झालेल्या ९१ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते.

मराठवाड्यात झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व अध्यक्षमराठवाड्यात आतापर्यंत सहा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली आहेत. ३९ वे साहित्य संमेलन १९५७ मध्ये औरंगाबादेत झाले होते व अध्यक्षपदी अनंत कानेकर होते. त्यानंतर मराठवाड्याच्या वाट्याला थेट १९८३ मध्ये ५७ वे साहित्य संमेलन आले. अंबाजोगाईत झालेल्या त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी व्यंकटेश मांडगूळकर हे होते. १९९५ मध्ये परभणीत ६८ वे साहित्य संमेलन कवी नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षपदी पार पडले. १९९५ नंतर लगेच तीन वर्षांनी १९९८ ला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा बहुमान परळी वैजनाथला मिळाला. या ७१ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी द.मा. मिरासदार होते. त्यानंतर २००४ मध्ये औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयास ७७ वे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा सन्मान मिळाला. रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. २०२०मध्ये ९३ वे साहित्य संमेलन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबादेत संपन्न झाले.

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळliteratureसाहित्यmarathiमराठीAurangabadऔरंगाबाद