शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कचऱ्यानंतर आता औरंगाबादकरांचा पाण्यासाठी छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:58 IST

शहरातील १५ लाख नागरिकांना मागील ५८ दिवसांपासून कचरा प्रश्न छळत आहे. चौकाचौकांत कच-याचे डोंगर कमी व्हायला तयार नाहीत. दुर्गंधी नागरिकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. औरंगपु-यातील नागरिक तर शहर सोडून जावे का...? असा प्रश्न महापालिकेला करीत आहेत.

ठळक मुद्देमहापालिका : पाण्याची मागणी वाढली; नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना मागील ५८ दिवसांपासून कचरा प्रश्न छळत आहे. चौकाचौकांत कच-याचे डोंगर कमी व्हायला तयार नाहीत. दुर्गंधी नागरिकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. औरंगपु-यातील नागरिक तर शहर सोडून जावे का...? असा प्रश्न महापालिकेला करीत आहेत. कचराकोंडी फोडण्यात पालिकेला सपशेल अपयश आलेले आहे. त्यातच आता पाणी प्रश्न नागरिकांना छळणार हे निश्चित. पाणी द्या पाणी म्हणून उद्या महापालिकेवर नागरिकांची शिष्टमंडळे, धरणे, निदर्शने आणि मोर्चे धडकल्यावर नवल वाटायला नको.१६ फेबु्रवारीपासून नारेगाव येथे कचरा टाकण्याची प्रक्रिया बंद आहे. खंडपीठ, सर्वोच्च न्यायालयातही महापालिकेला कचरा प्रश्नात समाधानकारक असा दिलासा मिळाला नाही. कचºयावर प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर उरला आहे. त्यावरही त्वरित निर्णय घेण्यास पालिका तयार नाही. निविदा प्रक्रियेने यंत्र खरेदी, मग जागांचा शोध सुरू होईल. चिकलठाण्यातील केंद्रीय कचरा प्रकल्पाची तर अजून निविदाही निघाली नाही. आणखी दोन ते तीन महिने औरंगाबादकरांना कचºयातच दिवस काढावे लागणार हे अटळ आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने मागील महिन्यात आयुक्तांचीही उचलबांगडी केली. पालिकेला प्रभारी आयुक्त देण्यात आले. त्यानंतरही कचरा प्रश्नात किंचितही प्रगती झालेली नाही.एकीकडे नागरिक कचरा समस्येने आधीच त्रस्त असताना आता पाणी प्रश्नाने अधिक बेजार करून ठेवले आहे. तापमान अजून ३८ अंश सेल्सिअसपर्यंत असताना दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तापमानाने ४० शी ओलांडल्यावर तर पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू होणार आहे. सध्या मनपाकडून होत असलेला पाणीपुरवठा अत्यंत असमाधानकारक आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये जवळपास ८०० पेक्षा अधिक पाणीपुरवठ्याचे टप्पे करून ठेवण्यात आले आहेत. एखाद्या लाईनला चार तास, तर दुसºयाला लाईनला अर्धा तास पाणी देण्याची किमया पाणीपुरवठा विभागाचे लाईनमन करतात. या लाईनमनवर महापालिकेचा कुठलाच अंकुश नाही. लाईनमन महाशय कोणत्या वेळी आणि किती पाणी द्यायचे हे ठरवितात. काही वसाहतींमध्ये तर पाणी जास्त मिळावे म्हणून लाईनमन कर्मचाºयांना वेगवेगळी आमिषे दाखविण्यात येतात. या आमिषांना हे कर्मचारी बळी पडतात.म्हणे चार दिवसांआड पाणी देणार...मनपा प्रशासनाने पाणी प्रश्नावर एक तातडीची बैठक घेऊन शहरातील प्रत्येक वसाहतीला चार दिवसांआड पाणी द्या, असे आदेश दिले. या आदेशाची किंचितही अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ज्या वसाहतींना सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे, त्या भागातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत होता. या आनंदावर पाणी फेरण्याचे कामही मनपा प्रशासनच करीत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नWaterपाणी