शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

कचऱ्यानंतर आता औरंगाबादकरांचा पाण्यासाठी छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:58 IST

शहरातील १५ लाख नागरिकांना मागील ५८ दिवसांपासून कचरा प्रश्न छळत आहे. चौकाचौकांत कच-याचे डोंगर कमी व्हायला तयार नाहीत. दुर्गंधी नागरिकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. औरंगपु-यातील नागरिक तर शहर सोडून जावे का...? असा प्रश्न महापालिकेला करीत आहेत.

ठळक मुद्देमहापालिका : पाण्याची मागणी वाढली; नियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना मागील ५८ दिवसांपासून कचरा प्रश्न छळत आहे. चौकाचौकांत कच-याचे डोंगर कमी व्हायला तयार नाहीत. दुर्गंधी नागरिकांचा पिच्छा सोडायला तयार नाही. औरंगपु-यातील नागरिक तर शहर सोडून जावे का...? असा प्रश्न महापालिकेला करीत आहेत. कचराकोंडी फोडण्यात पालिकेला सपशेल अपयश आलेले आहे. त्यातच आता पाणी प्रश्न नागरिकांना छळणार हे निश्चित. पाणी द्या पाणी म्हणून उद्या महापालिकेवर नागरिकांची शिष्टमंडळे, धरणे, निदर्शने आणि मोर्चे धडकल्यावर नवल वाटायला नको.१६ फेबु्रवारीपासून नारेगाव येथे कचरा टाकण्याची प्रक्रिया बंद आहे. खंडपीठ, सर्वोच्च न्यायालयातही महापालिकेला कचरा प्रश्नात समाधानकारक असा दिलासा मिळाला नाही. कचºयावर प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर उरला आहे. त्यावरही त्वरित निर्णय घेण्यास पालिका तयार नाही. निविदा प्रक्रियेने यंत्र खरेदी, मग जागांचा शोध सुरू होईल. चिकलठाण्यातील केंद्रीय कचरा प्रकल्पाची तर अजून निविदाही निघाली नाही. आणखी दोन ते तीन महिने औरंगाबादकरांना कचºयातच दिवस काढावे लागणार हे अटळ आहे. कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने मागील महिन्यात आयुक्तांचीही उचलबांगडी केली. पालिकेला प्रभारी आयुक्त देण्यात आले. त्यानंतरही कचरा प्रश्नात किंचितही प्रगती झालेली नाही.एकीकडे नागरिक कचरा समस्येने आधीच त्रस्त असताना आता पाणी प्रश्नाने अधिक बेजार करून ठेवले आहे. तापमान अजून ३८ अंश सेल्सिअसपर्यंत असताना दुपारी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. तापमानाने ४० शी ओलांडल्यावर तर पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू होणार आहे. सध्या मनपाकडून होत असलेला पाणीपुरवठा अत्यंत असमाधानकारक आहे. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये जवळपास ८०० पेक्षा अधिक पाणीपुरवठ्याचे टप्पे करून ठेवण्यात आले आहेत. एखाद्या लाईनला चार तास, तर दुसºयाला लाईनला अर्धा तास पाणी देण्याची किमया पाणीपुरवठा विभागाचे लाईनमन करतात. या लाईनमनवर महापालिकेचा कुठलाच अंकुश नाही. लाईनमन महाशय कोणत्या वेळी आणि किती पाणी द्यायचे हे ठरवितात. काही वसाहतींमध्ये तर पाणी जास्त मिळावे म्हणून लाईनमन कर्मचाºयांना वेगवेगळी आमिषे दाखविण्यात येतात. या आमिषांना हे कर्मचारी बळी पडतात.म्हणे चार दिवसांआड पाणी देणार...मनपा प्रशासनाने पाणी प्रश्नावर एक तातडीची बैठक घेऊन शहरातील प्रत्येक वसाहतीला चार दिवसांआड पाणी द्या, असे आदेश दिले. या आदेशाची किंचितही अंमलबजावणी सुरू झालेली नाही. ज्या वसाहतींना सहाव्या दिवशी पाणी मिळत आहे, त्या भागातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत होता. या आनंदावर पाणी फेरण्याचे कामही मनपा प्रशासनच करीत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादGarbage Disposal Issueकचरा प्रश्नWaterपाणी