शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही सोयगाव तालुक्यातील २२ गावांना लालपरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 3:38 PM

अद्याप बस पोहोचली नसल्याने ग्रामस्थांचे हाल

ठळक मुद्देवृद्ध, महिला व रुग्णांचे हाल

सोयगाव (औरंगाबाद ) : देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा नेहमी केला जातो. मात्र, देशात अजूनही अशी अनेक खेडी आहेत जिथे पायाभूत सुविधाही सरकारला पोहोचविता आलेल्या नाहीत. याचेच एक उदाहरण म्हणजे सोयगाव तालुक्यातील २२ गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही महामंडळाची बस पोहोचू शकली नाही. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागत आहे. 

महाराष्ट्र हे  देशात प्रगतिपथावर असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्यातच अशी परिस्थिती असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. माजी केंद्रीय मंत्री कै. बाबूरावजी काळे यांनी आदिवासीबहुल सोयगावला तालुका करण्याच्या मागणीसोबतच येथे बस आगार उभारण्याचीही मागणी लावून धरली होती. यानंतर मागणीने जोर धरून सोयगावला तालुक्याचा दर्जा मिळाला. तर वीस वर्षांपूर्वी येथे बस आगारही झाले. मात्र, अद्यापही तालुक्यातील २२ गावांमध्ये महामंडळाची बस पोहोचू शकली नाही. त्यामुळे अनेकांना पायी किंवा खाजगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागतो. यात तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गोंदेगावलाही तालुका आगाराची बससेवा मिळालेली नाही. तसेच सावळदबारा भागातील ८ खेड्यांमध्ये बससेवा पोहोचली नाही. बनोटी परिसरातील अनेक गावांची हीच अवस्था आहे. त्यामुळे या गावांमध्ये बससेवेसह प्राथमिक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

वृद्ध, महिला व रुग्णांचे हाल२२ गावांमध्ये बस जात नसल्याने याचा सर्वाधिक फटका वृद्ध, महिला व रुग्णांना सहन करावा लागतो. वृद्धांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा पायपीट करावी लागते. खाजगी वाहनधारकांकडूनही प्रवाशांची लूट होत असते.  

तालुक्यातील प्रमुख गावांना एसटीचे दर्शनच नाहीतालुक्यातील काळदरी, वरठाण, पळाशी, वाडी, माळेगाव, पिंप्री, दस्तापूर, रावेरी, चारूतांडा, उपलखेडा ही तालुक्यातील प्रमुख १० गावे असून, या गावांत अद्यापही महामंडळाची बस फिरकलीच नाही. येथील ग्रामस्थांना तब्बल आठ ते दहा कि़मी. प्रवास करून बस गाठावी लागते. यामुळे या गावांतील विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी पायपीट करूनच शाळा गाठावी लागते.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटल