शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मराठवाड्यातील ५२ नगरपरिषदांवर ‘प्रशासकराज’; इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग गळाले

By विकास राऊत | Updated: August 2, 2023 13:33 IST

दोन वर्षांपासून सर्व काही ‘जैसे थे’; जानेवारी २०२५ पासून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तब्बल ५२ नगरपरिषद/नगरपंचायतींवर सुमारे दोन वर्षांपासून ‘प्रशासकराज’ आहे. यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या गुडघ्याचे बाशिंग गळून गेले आहे. निवडणुका केव्हा होणार, याबाबत काहीही शाश्वती सध्या नसल्यामुळे इच्छुकांचे डोळे राजकीय भूमिकेकडे लागलेले आहेत. मार्च-एप्रिल २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कचाट्यात निवडणुका अडकल्यानंतर पुढे सामाजिक आरक्षणाच्या लपेट्यात आल्या. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जे इच्छुक होते, त्यांचेही डोके चक्रावून गेले आहे. कुणाचा झेंडा घ्यावा हाती, या संभ्रमात सध्या कार्यकर्ते आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक म्हणून सध्या आहेत.

मनपा, जि. प.वरही प्रशासक...मराठवाड्यात सध्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व नांदेड-वाघाळा या मनपा असून यावरही प्रशासक आहेत. तसेच आठही जि. प.च्या निवडणुका अद्याप झालेल्या असून मुख्य कार्यकारी अधिकारीच त्यावर प्रशासक म्हणून आहेत. जालना नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर होणार आहे. ज्यावेळी निवडणुका घेण्याचा निर्णय होईल, त्यावेळी जालना मनपा असेल.

प्रशासकराज असलेल्या नगरपरिषदा...औरंगाबाद जिल्हा : कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्रीजालना : जालना, अंबड, भोकरदन, परतूरपरभणी : गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठहिंगोली : वसमत, हिंगोली, कळमनुरीबीड : बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी-वैद्यनाथ, गेवराई, धारूरनांदेड : अर्धापूर, माहूर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, किनवटधाराशिव : धाराशिव, भूम, कळंब, मुरूम, नळदूर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूरलातूर : उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा,

कोरोनानंतर नेमके काय?कोरोनाच्या दोन्ही लाटांनंतर निवडणुका होतील, अशी शक्यता होती. परंतु सामाजिक आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निवडणुका लांबत गेल्या. त्यानंतर जून २०२२ मध्ये राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे निवडणुकांचा मुद्दा मागे पडला. यावर्षी निवडणुका होतील, असा अंदाज असतानाच पुन्हा जुलै २०२३ मध्ये दुसरा राजकीय भूकंप झाला. या राजकीय भूकंपाच्या धक्क्यातून मतदारांवर कसा परिणाम झाला असेल, हे निवडणुका झाल्यावरच कळेल.

अशी चर्चा२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकीत स्था. स्व. संस्थांमध्ये उमेदवारी देण्याचे इच्छुकांना आश्वासित करून त्यांना निवडणुकीत कामाला लावले जाईल. दोन्ही निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांची पुढील पाच वर्षांपर्यंत काही गरज नसेल, स्था. स्व. संस्थेत मर्जीतल्यांना उमेदवारी देऊन धुराळा उडवून टाकायचा. त्यामुळे जानेवारी २०२५ पासून पुढे या सगळ्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चर्चा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिकाMarathwadaमराठवाडा