शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मराठवाड्यातील ५२ नगरपरिषदांवर ‘प्रशासकराज’; इच्छुकांच्या गुडघ्याचे बाशिंग गळाले

By विकास राऊत | Updated: August 2, 2023 13:33 IST

दोन वर्षांपासून सर्व काही ‘जैसे थे’; जानेवारी २०२५ पासून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तब्बल ५२ नगरपरिषद/नगरपंचायतींवर सुमारे दोन वर्षांपासून ‘प्रशासकराज’ आहे. यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या गुडघ्याचे बाशिंग गळून गेले आहे. निवडणुका केव्हा होणार, याबाबत काहीही शाश्वती सध्या नसल्यामुळे इच्छुकांचे डोळे राजकीय भूमिकेकडे लागलेले आहेत. मार्च-एप्रिल २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कचाट्यात निवडणुका अडकल्यानंतर पुढे सामाजिक आरक्षणाच्या लपेट्यात आल्या. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जे इच्छुक होते, त्यांचेही डोके चक्रावून गेले आहे. कुणाचा झेंडा घ्यावा हाती, या संभ्रमात सध्या कार्यकर्ते आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक म्हणून सध्या आहेत.

मनपा, जि. प.वरही प्रशासक...मराठवाड्यात सध्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व नांदेड-वाघाळा या मनपा असून यावरही प्रशासक आहेत. तसेच आठही जि. प.च्या निवडणुका अद्याप झालेल्या असून मुख्य कार्यकारी अधिकारीच त्यावर प्रशासक म्हणून आहेत. जालना नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर होणार आहे. ज्यावेळी निवडणुका घेण्याचा निर्णय होईल, त्यावेळी जालना मनपा असेल.

प्रशासकराज असलेल्या नगरपरिषदा...औरंगाबाद जिल्हा : कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्रीजालना : जालना, अंबड, भोकरदन, परतूरपरभणी : गंगाखेड, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, सोनपेठहिंगोली : वसमत, हिंगोली, कळमनुरीबीड : बीड, अंबाजोगाई, माजलगाव, परळी-वैद्यनाथ, गेवराई, धारूरनांदेड : अर्धापूर, माहूर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, हदगाव, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, किनवटधाराशिव : धाराशिव, भूम, कळंब, मुरूम, नळदूर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूरलातूर : उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा,

कोरोनानंतर नेमके काय?कोरोनाच्या दोन्ही लाटांनंतर निवडणुका होतील, अशी शक्यता होती. परंतु सामाजिक आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निवडणुका लांबत गेल्या. त्यानंतर जून २०२२ मध्ये राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे निवडणुकांचा मुद्दा मागे पडला. यावर्षी निवडणुका होतील, असा अंदाज असतानाच पुन्हा जुलै २०२३ मध्ये दुसरा राजकीय भूकंप झाला. या राजकीय भूकंपाच्या धक्क्यातून मतदारांवर कसा परिणाम झाला असेल, हे निवडणुका झाल्यावरच कळेल.

अशी चर्चा२०२४ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका होतील. या दोन्ही निवडणुकीत स्था. स्व. संस्थांमध्ये उमेदवारी देण्याचे इच्छुकांना आश्वासित करून त्यांना निवडणुकीत कामाला लावले जाईल. दोन्ही निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांची पुढील पाच वर्षांपर्यंत काही गरज नसेल, स्था. स्व. संस्थेत मर्जीतल्यांना उमेदवारी देऊन धुराळा उडवून टाकायचा. त्यामुळे जानेवारी २०२५ पासून पुढे या सगळ्या निवडणुकांना मुहूर्त लागण्याची चर्चा आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणMuncipal Corporationनगर पालिकाMarathwadaमराठवाडा