शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

प्रशासन चिंतामुक्त! जायकवाडी धरण भरतेय...सिंचन, उद्योग, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 19:31 IST

या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देण्यात येते.

छत्रपती संभाजीनगर : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील लहान, मोठी सर्व धरणे आणि बंधारे काठोकाठ भरल्याने या दोन्ही जिल्ह्यातून जायकवाडी प्रकल्पात रोज पाण्याची आवक होत आहे. आगामी काळातही ही आवक अशीच राहणार आहे. आज जायकवाडी प्रकल्प ८० टक्क्यांच्या पुढे भरला असल्याने वर्षभराचा सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने प्रशासन चिंतामुक्त झाले.

मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून जायकवाडी धरणाकडे पाहिले जाते. या धरणातील पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांना पाणी देण्यात येते. गतवर्षी मराठवाडा आणि जायकवाडी प्रकल्पाचा उर्ध्वभाग असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातही कमी पाऊस झाला होता. परिणामी गतवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी प्रकल्पात ५३ टक्केच जलसाठा जमा झाला होता. यामुळे समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी येथील जनतेला अहमदनगर आणि नाशिकविरोधात आंदोलन करावे लागले होते. न्यायालयातही लढा द्यावा लागला होता. यंदाही मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. यामुळे विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे. अशा परिस्थितीत मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडीत आज ८० टक्क्यांच्या पुढे जलसाठा जमा झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील लहान, मोठी धरणे आणि बंधारे शंभर टक्के भरले आहेत. पुढील संपूर्ण सप्टेंबर महिना पावसाचा आहे. यामुळे या महिन्यात पावसाचा प्रत्येक थेंब नगर, नाशिककरांना जायकवाडी प्रकल्पासाठी सोडावा लागणार आहे. यामुळे आगामी काही दिवसांतच जायकवाडी प्रकल्प शंभर टक्के भरेल, असा अंदाज कडाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी वर्तविला.

रब्बी, उन्हाळी पिकांसाठी ४ आवर्तने सोडणारप्रकल्प भरू लागल्याने आम्ही आजपासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली. यावर्षी रब्बी हंगामासाठी तीन तर उन्हाळी पिकांसाठी ४ आवर्तने अशा एकूण सात आवर्तनातून सुमारे १५०० दलघमी पाणी सिंचनासाठी देणार आहोत. उद्योग आणि पिण्यासाठी २०० दलघमी पाणी देता येणार आहे. वर्षभरात सुमारे ३०० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होईल. छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहराचा पिण्याच्या पाण्याचा तसेच दोन्ही जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

दहा दिवसांत जायकवाडी शंभर टक्क्यांपर्यंत भरेलजायकवाडीच्या उर्ध्व भागातील सर्वच धरणे शंभर टक्के भरल्याने नगर, नाशिककर आता पडणाऱ्या पावसाचा एकही थेंब साठवू शकत नाही. यामुळे आगामी काळात उर्ध्व भागातून जायकवाडीत पाण्याची आवक होतच राहील. पुढील दहा ते बारा दिवसांत जायकवाडी शंभर टक्के भरेल.- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊस