शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

‘जायकवाडी’च्या प्रतिबंधित क्षेत्रात चर खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:49 PM

बळीराजा चिंतेत : उभी पिके वाचविण्यासाठीची धडपड व्यर्थ

पैठण : जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रात पोकलेन लावून पाण्यासाठी चर खोदणाºया मुलानी वाडगाव येथील तीन शेतकऱ्यांना जायकवाडी प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलिसांनी समज देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.जायकवाडी प्रशासनाच्या या कारवाईने शेतकरी अस्वस्थ झाले असून शेतात उभे असलेल्या पिकांना वाचवायचे कसे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.जायकवाडीचा जलसाठा कमी होत असल्याने शेतीसाठी घेतलेल्या विद्युत मोटारीपासून पाणी बरेच दूर गेल्याने विद्युत पंप बंद पडले आहेत. शेतकºयांनी पिकांना पाणी द्यावे म्हणून जायकवाडीच्या जलफुगवटा क्षेत्रात चर खोदण्याचे काम सुरू केले होते. जायकवाडीचे बॅक वॉटर क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात कुठलेही काम करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे या शेतकºयांना जायकवाडी प्रशासनाने कळवून चर खोदण्याचे काम बंद केले आहे.जायकवाडी धरणाची पाणीपातळी सध्या जोत्याखाली गेली आहे. यामुळे बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकºयांनी लावलेल्या मोटारी कोरड्या पडल्या आहेत. शेतातील पिकांना पाणी देता यावे म्हणून शेतकºयांनी जायकवाडीच्या जलसाठ्यातून मोटारीपर्यंत पाणी यावे, म्हणून लोकवर्गणी करून मुलानी वाडगाव परिसरात यांत्रिक मशिनरी लावून चर खोदण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, याबाबत जायकवाडी प्रशासनास खबर मिळताच कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी संबंधित शेतकºयांना चर खोदण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असा अर्ज बिडकीन पोलिस ठाण्यात दिला होता. या अजार्नुसार सय्यद अफसर सय्यद अब्दुल, राजू हरिभाऊ मिसाळ व रामकिसन शिवाजी शेळके यांना पोलिसांनी समज देऊन जायकवाडीच्या बॅक वॉटर क्षेत्रामध्ये सुरू असलेले काम बंद केले आहे.कोट....शेतकरी म्हणतात... पाणी परवाना घेतलाआम्ही शासनाचा रितसर पाणी परवाना भरला आहे. धरणातील पाणी कमी झाल्याने आम्ही व इतर गावातील लोकांनी मिळून लोकवर्गणीतून जायकवाडी धरण जलफुगवटा क्षेत्रात पोकलेन लावून माती काढत होतो. असे केले नाही तर आमची पिके जळून जातील, मग आम्ही पाणी पाणी परवानगी घेऊन आमचा काय उपयोग आहे, अशी प्रतिक्रिया या शेतकºयांनी दिली.जायकवाडी प्रशासनाची कारवाईगोदावरीच्या उर्ध्व खोºयातून जायकवाडी धरणासाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर सदरील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावेळी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जायकवाडी धरणात पाण्याची गळती जास्त असून अवैध उपसा कनेक्शन जास्त असल्याचे म्हटले होते. जायकवाडी प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात अवैध कनेक्शन रोखण्यासाठी तत्पर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार महावितरण, महसूल, पोलीस व जायकवाडी प्रशासन यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने इसारवाडी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी २४ अवैध विद्युत पंपाचे कनेक्शन तोडून जप्तीची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईत अवैध कनेक्शनद्वारे इस्ट वेस्ट सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्याने दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी या कंपनीस नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली. कंपनीने कारवाईनंतर पाणी उचलण्यासाठी रितसर अर्ज केला असल्याचे सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.जायकवाडीच्या बुडीत क्षेत्रात पथक तैनातजायकवाडीच्या बुडीत क्षेत्रात येणाºया परिसरात गस्ती पथक तैनात करण्यात आले असून या पथकाद्वारे संपूर्ण क्षेत्रात नजर ठेवली जाणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. जायकवाडी धरणाचा परिसरातील शेतकºयांनी पाणी परवाना घेतलेला असून पाणी उचलण्याचा त्यांना अधिकार आहे. राज्य वन्यजीव मंडळाकडे याबाबत शेतकºयांच्या वतीने अर्ज करून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे दत्ता गोर्डे, बप्पा शेळके, तुषार शिसोदे यांनी सांगितले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात