शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ‘समांतर’ कंपनीच्या विरोधात कृती समिती उभारणार लोकलढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:54 IST

कंपनीची सावकारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी लोकलढा उभारण्याचा निर्धार समांतर जलवाहिनी कृती समितीने केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला पुन्हा आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेने जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्याचे काम करावे. कंपनीची सावकारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी लोकलढा उभारण्याचा निर्धार समांतर जलवाहिनी कृती समितीने आज केला.

स.भु. शिक्षण संस्थेच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी समांतर जलवाहिनी कृती समितीची बैठक प्रा. विजय दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, अण्णा खंदारे, प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, सुभाष लोमटे, रमेशभाई खंडागळे, ओम प्रकाश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रा. दिवाण यांनी समांतर जलवाहिनी कंपनीचा मूळ करार, कंपनीकडून वेळोवेळी झालेल्या अनियमितता आदींवर प्रकाश टाकला. दरवर्षी औरंगाबादकरांवर दहा टक्के पाणीपट्टी वाढीचा बोजा कशापद्धतीने टाकण्यात येत होता. ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाणीपुरवठा योजना मनपाने चालविली पाहिजे. कंपनीकडे जेव्हा पाणीपुरवठा होतो तेव्हा तो पूर्णपणे विस्कळीत झाला होता, अशा परिस्थितीतही मनपाने कंपनीला १४ महिन्यांमध्ये तब्बल २०० कोटी रुपये अदा केले. 

२०११ मध्ये कंपनीसोबत करार होतो, २०१६ मध्ये तो रद्द करण्यात आला. एवढी वर्षे मनपा झोपली होती का...? शहरातील १५ लाख नागरिकांनी वेठीस धरण्याचा हा प्रकार होता. कंपनीसोबत अनेकांचे लागेबांधे होते, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व परिस्थितीच्या विरोधात आम्ही न्यायालयापर्यंत लढा उभा केला. तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर, ओम प्रकाश बकोरिया यांनी नागरी हित डोळ्यासमोर ठेवून कंपनीच्या हकालपट्टीसाठी ठोस भूमिका घेतली. त्यामुळे मनपाच्या सभागृहात कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता परत एकदा कंपनीला शहरात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध केला तर माझ्या घरावर मोर्चे आणण्याची भाषा करण्यात येत आहे. खा. चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता त्यांनी हा तपशील नमूद करीत मी त्यांच्या घरावर मोर्चे नेईन, असेही दिवाण यांनी सांगितले. एमआयडीसी ९ रुपये दराने पाणी देते. मनपा ४५ रुपये दराने पाणी देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शहरात फक्त पाणी आणावेडॉ. भालचंद्र कांगो यांनी नमूद केले की, मनपाने एक कंत्राटदार नेमावा. जायकवाडीहून शहरात पाणी आणावे. पाणीपुरवठा मनपाकडेच ठेवावा. शहरातील १५५ गुंठेवारी वसाहतींना आजही पाणी मिळत नाही. शहरातील ७० टक्के जनतेला पाणी हा प्रश्नच वाटत नाही. यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण