शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

औरंगाबादमध्ये ‘समांतर’ कंपनीच्या विरोधात कृती समिती उभारणार लोकलढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:54 IST

कंपनीची सावकारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी लोकलढा उभारण्याचा निर्धार समांतर जलवाहिनी कृती समितीने केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला पुन्हा आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेने जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्याचे काम करावे. कंपनीची सावकारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी लोकलढा उभारण्याचा निर्धार समांतर जलवाहिनी कृती समितीने आज केला.

स.भु. शिक्षण संस्थेच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी समांतर जलवाहिनी कृती समितीची बैठक प्रा. विजय दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, अण्णा खंदारे, प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, सुभाष लोमटे, रमेशभाई खंडागळे, ओम प्रकाश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रा. दिवाण यांनी समांतर जलवाहिनी कंपनीचा मूळ करार, कंपनीकडून वेळोवेळी झालेल्या अनियमितता आदींवर प्रकाश टाकला. दरवर्षी औरंगाबादकरांवर दहा टक्के पाणीपट्टी वाढीचा बोजा कशापद्धतीने टाकण्यात येत होता. ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाणीपुरवठा योजना मनपाने चालविली पाहिजे. कंपनीकडे जेव्हा पाणीपुरवठा होतो तेव्हा तो पूर्णपणे विस्कळीत झाला होता, अशा परिस्थितीतही मनपाने कंपनीला १४ महिन्यांमध्ये तब्बल २०० कोटी रुपये अदा केले. 

२०११ मध्ये कंपनीसोबत करार होतो, २०१६ मध्ये तो रद्द करण्यात आला. एवढी वर्षे मनपा झोपली होती का...? शहरातील १५ लाख नागरिकांनी वेठीस धरण्याचा हा प्रकार होता. कंपनीसोबत अनेकांचे लागेबांधे होते, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व परिस्थितीच्या विरोधात आम्ही न्यायालयापर्यंत लढा उभा केला. तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर, ओम प्रकाश बकोरिया यांनी नागरी हित डोळ्यासमोर ठेवून कंपनीच्या हकालपट्टीसाठी ठोस भूमिका घेतली. त्यामुळे मनपाच्या सभागृहात कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता परत एकदा कंपनीला शहरात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध केला तर माझ्या घरावर मोर्चे आणण्याची भाषा करण्यात येत आहे. खा. चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता त्यांनी हा तपशील नमूद करीत मी त्यांच्या घरावर मोर्चे नेईन, असेही दिवाण यांनी सांगितले. एमआयडीसी ९ रुपये दराने पाणी देते. मनपा ४५ रुपये दराने पाणी देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शहरात फक्त पाणी आणावेडॉ. भालचंद्र कांगो यांनी नमूद केले की, मनपाने एक कंत्राटदार नेमावा. जायकवाडीहून शहरात पाणी आणावे. पाणीपुरवठा मनपाकडेच ठेवावा. शहरातील १५५ गुंठेवारी वसाहतींना आजही पाणी मिळत नाही. शहरातील ७० टक्के जनतेला पाणी हा प्रश्नच वाटत नाही. यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण