शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ‘समांतर’ कंपनीच्या विरोधात कृती समिती उभारणार लोकलढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 12:54 IST

कंपनीची सावकारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी लोकलढा उभारण्याचा निर्धार समांतर जलवाहिनी कृती समितीने केला.

औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीला पुन्हा आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेने जायकवाडीपासून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्याचे काम करावे. कंपनीची सावकारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी लोकलढा उभारण्याचा निर्धार समांतर जलवाहिनी कृती समितीने आज केला.

स.भु. शिक्षण संस्थेच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी समांतर जलवाहिनी कृती समितीची बैठक प्रा. विजय दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. भालचंद्र कांगो, अण्णा खंदारे, प्रदीप पुरंदरे, कलीम अख्तर, सुभाष लोमटे, रमेशभाई खंडागळे, ओम प्रकाश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रा. दिवाण यांनी समांतर जलवाहिनी कंपनीचा मूळ करार, कंपनीकडून वेळोवेळी झालेल्या अनियमितता आदींवर प्रकाश टाकला. दरवर्षी औरंगाबादकरांवर दहा टक्के पाणीपट्टी वाढीचा बोजा कशापद्धतीने टाकण्यात येत होता. ना नफा ना तोटा या तत्त्वावर पाणीपुरवठा योजना मनपाने चालविली पाहिजे. कंपनीकडे जेव्हा पाणीपुरवठा होतो तेव्हा तो पूर्णपणे विस्कळीत झाला होता, अशा परिस्थितीतही मनपाने कंपनीला १४ महिन्यांमध्ये तब्बल २०० कोटी रुपये अदा केले. 

२०११ मध्ये कंपनीसोबत करार होतो, २०१६ मध्ये तो रद्द करण्यात आला. एवढी वर्षे मनपा झोपली होती का...? शहरातील १५ लाख नागरिकांनी वेठीस धरण्याचा हा प्रकार होता. कंपनीसोबत अनेकांचे लागेबांधे होते, असा आरोपही त्यांनी केला. या सर्व परिस्थितीच्या विरोधात आम्ही न्यायालयापर्यंत लढा उभा केला. तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर, ओम प्रकाश बकोरिया यांनी नागरी हित डोळ्यासमोर ठेवून कंपनीच्या हकालपट्टीसाठी ठोस भूमिका घेतली. त्यामुळे मनपाच्या सभागृहात कंपनीसोबत केलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता परत एकदा कंपनीला शहरात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याला विरोध केला तर माझ्या घरावर मोर्चे आणण्याची भाषा करण्यात येत आहे. खा. चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता त्यांनी हा तपशील नमूद करीत मी त्यांच्या घरावर मोर्चे नेईन, असेही दिवाण यांनी सांगितले. एमआयडीसी ९ रुपये दराने पाणी देते. मनपा ४५ रुपये दराने पाणी देत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

शहरात फक्त पाणी आणावेडॉ. भालचंद्र कांगो यांनी नमूद केले की, मनपाने एक कंत्राटदार नेमावा. जायकवाडीहून शहरात पाणी आणावे. पाणीपुरवठा मनपाकडेच ठेवावा. शहरातील १५५ गुंठेवारी वसाहतींना आजही पाणी मिळत नाही. शहरातील ७० टक्के जनतेला पाणी हा प्रश्नच वाटत नाही. यासाठी लोकचळवळ उभी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Parallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण