शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:17 IST

आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे

सिल्लोड/ भराडी: रावसाहेब दानवे यांना हिंदुत्व आता दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात महिलांवर लाठी हल्ला झाला त्यावेळी ते कुठे गेले होते. आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे. अब्दुल सत्तार व मी जुने मित्र आहोत अन् आम्ही मैत्री निभावणार. दोघे सोबत काम करून मतदार संघाचा विकास करू. भोकरदनची मनमानी मोडित काढू, असा इशारा खासदार कल्याण काळे यांनी भराडी येथील सभेतून माजी खासदार रावसाहेब दानवे यांना दिला.

गुरुवारी दुपारी १२ वाजता  सिल्लोड  तालुक्यातील धानोरा येथील पूर्णा  नदीवर भुरडी नदी, वांगी बुद्रुक येथील गाव नाला तर उपळी व मांडगाव येथील अंजना नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर १२ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपयांच्या एकूण ५ पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन खा. डॉ. कल्याणराव काळे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार होते. यावेळी सत्तार म्हणाले, सिल्लोड तालुक्यातील आणखी काही गावांसाठी ५० कोटींच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील विकासासाठी आम्ही दोघे निधी कमी पडू देणार नाही. खा. कल्याणराव काळे यांच्या  पुढाकाराने अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे,  बाजार समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, युवानेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सुधाकर पाटील, प्रवीण मीरकर, राजू गौर, निजाम पठाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, व्हाईस चेअरमन अनिस पठाण, रमेश साळवे, दामूअण्णा गव्हाणे, सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, गणेश गरुड यांची उपस्थिती होती.

भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढूतर खासदार काळे म्हणाले, आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे सिल्लोड मतदारसंघात झाली. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना काळे म्हणाले, दानवे यांना पराभव जास्तच जिव्हारी लागला. मला आणि आ. अब्दुल सत्तार यांना सोबत पाहून भोकरदनच्या भुवया उंचावतात. अब्दुल सत्तार यांनी पाच वर्षात १० हजार सिंचन विहिरींना मान्यता दिली. भोकरदनमध्ये एकही विहीर मंजूर नाही. शासनाच्या लाभाच्या योजना भोकरदन, जाफराबाद मधील लोकांना मिळत नाहीत. जालन्यात हम बोलेसो कायदा होता, पण आता तसे होणार नाही. त्यांची हुकूमशाही मोडीत काढू, असा इशारा खासदार काळे यांनी दिला. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेKalyan kaleडॉ. कल्याण काळेAbdul Sattarअब्दुल सत्तारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर