शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:17 IST

आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे

सिल्लोड/ भराडी: रावसाहेब दानवे यांना हिंदुत्व आता दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात महिलांवर लाठी हल्ला झाला त्यावेळी ते कुठे गेले होते. आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे. अब्दुल सत्तार व मी जुने मित्र आहोत अन् आम्ही मैत्री निभावणार. दोघे सोबत काम करून मतदार संघाचा विकास करू. भोकरदनची मनमानी मोडित काढू, असा इशारा खासदार कल्याण काळे यांनी भराडी येथील सभेतून माजी खासदार रावसाहेब दानवे यांना दिला.

गुरुवारी दुपारी १२ वाजता  सिल्लोड  तालुक्यातील धानोरा येथील पूर्णा  नदीवर भुरडी नदी, वांगी बुद्रुक येथील गाव नाला तर उपळी व मांडगाव येथील अंजना नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर १२ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपयांच्या एकूण ५ पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन खा. डॉ. कल्याणराव काळे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार होते. यावेळी सत्तार म्हणाले, सिल्लोड तालुक्यातील आणखी काही गावांसाठी ५० कोटींच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील विकासासाठी आम्ही दोघे निधी कमी पडू देणार नाही. खा. कल्याणराव काळे यांच्या  पुढाकाराने अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे,  बाजार समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, युवानेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सुधाकर पाटील, प्रवीण मीरकर, राजू गौर, निजाम पठाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, व्हाईस चेअरमन अनिस पठाण, रमेश साळवे, दामूअण्णा गव्हाणे, सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, गणेश गरुड यांची उपस्थिती होती.

भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढूतर खासदार काळे म्हणाले, आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे सिल्लोड मतदारसंघात झाली. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना काळे म्हणाले, दानवे यांना पराभव जास्तच जिव्हारी लागला. मला आणि आ. अब्दुल सत्तार यांना सोबत पाहून भोकरदनच्या भुवया उंचावतात. अब्दुल सत्तार यांनी पाच वर्षात १० हजार सिंचन विहिरींना मान्यता दिली. भोकरदनमध्ये एकही विहीर मंजूर नाही. शासनाच्या लाभाच्या योजना भोकरदन, जाफराबाद मधील लोकांना मिळत नाहीत. जालन्यात हम बोलेसो कायदा होता, पण आता तसे होणार नाही. त्यांची हुकूमशाही मोडीत काढू, असा इशारा खासदार काळे यांनी दिला. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेKalyan kaleडॉ. कल्याण काळेAbdul Sattarअब्दुल सत्तारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर