शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सत्तार अन् मी जुने मित्र, भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढू; खासदार काळेंचा दानवेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:17 IST

आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे: कल्याण काळे

सिल्लोड/ भराडी: रावसाहेब दानवे यांना हिंदुत्व आता दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात महिलांवर लाठी हल्ला झाला त्यावेळी ते कुठे गेले होते. आम्हाला बघून घ्यायची भाषा काय करता, जनतेनेच त्यांना बघून घेतले आहे. अब्दुल सत्तार व मी जुने मित्र आहोत अन् आम्ही मैत्री निभावणार. दोघे सोबत काम करून मतदार संघाचा विकास करू. भोकरदनची मनमानी मोडित काढू, असा इशारा खासदार कल्याण काळे यांनी भराडी येथील सभेतून माजी खासदार रावसाहेब दानवे यांना दिला.

गुरुवारी दुपारी १२ वाजता  सिल्लोड  तालुक्यातील धानोरा येथील पूर्णा  नदीवर भुरडी नदी, वांगी बुद्रुक येथील गाव नाला तर उपळी व मांडगाव येथील अंजना नदीवर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत मंजूर १२ कोटी ५५ लाख ८१ हजार रुपयांच्या एकूण ५ पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन खा. डॉ. कल्याणराव काळे यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार होते. यावेळी सत्तार म्हणाले, सिल्लोड तालुक्यातील आणखी काही गावांसाठी ५० कोटींच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तालुक्यातील विकासासाठी आम्ही दोघे निधी कमी पडू देणार नाही. खा. कल्याणराव काळे यांच्या  पुढाकाराने अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही सत्तार यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे,  बाजार समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, युवानेते माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, सुधाकर पाटील, प्रवीण मीरकर, राजू गौर, निजाम पठाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष भास्कर घायवट, व्हाईस चेअरमन अनिस पठाण, रमेश साळवे, दामूअण्णा गव्हाणे, सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, गणेश गरुड यांची उपस्थिती होती.

भोकरदनची हुकुमशाही मोडीत काढूतर खासदार काळे म्हणाले, आ. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे सिल्लोड मतदारसंघात झाली. ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. त्यांची लोकप्रियता फार मोठी आहे. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना काळे म्हणाले, दानवे यांना पराभव जास्तच जिव्हारी लागला. मला आणि आ. अब्दुल सत्तार यांना सोबत पाहून भोकरदनच्या भुवया उंचावतात. अब्दुल सत्तार यांनी पाच वर्षात १० हजार सिंचन विहिरींना मान्यता दिली. भोकरदनमध्ये एकही विहीर मंजूर नाही. शासनाच्या लाभाच्या योजना भोकरदन, जाफराबाद मधील लोकांना मिळत नाहीत. जालन्यात हम बोलेसो कायदा होता, पण आता तसे होणार नाही. त्यांची हुकूमशाही मोडीत काढू, असा इशारा खासदार काळे यांनी दिला. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेKalyan kaleडॉ. कल्याण काळेAbdul Sattarअब्दुल सत्तारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर