शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

‘आपला मानूस’ एक कौटुंबिक थरारपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:05 IST

मुळातच भारतीय माणूस हा नातेसंबंधांच्या बाहेर जात नाही. आजच्या तरुणाच्या मनात मानवी जीवन आणि कुटुंबविषयक श्रद्धांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उकल करणारा ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परस्पर नातेसंबंधांवर बेतलेली गोष्ट सांगणारा हा एक कौटुंबिक थरारपट असून, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या आपल्या माणसाची आठवण करून देणारा ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुळातच भारतीय माणूस हा नातेसंबंधांच्या बाहेर जात नाही. आजच्या तरुणाच्या मनात मानवी जीवन आणि कुटुंबविषयक श्रद्धांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उकल करणारा ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परस्पर नातेसंबंधांवर बेतलेली गोष्ट सांगणारा हा एक कौटुंबिक थरारपट असून, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या आपल्या माणसाची आठवण करून देणारा ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.वायकॉम १८ मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत ‘आपला मानूस’ हा मराठी चित्रपट दि. ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने नाना यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटासोबतच इतर अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे, निर्माते निखिल साने, अभिनेत्री इरावती हर्षे, मल्हार पाटेकर यांचीही उपस्थिती होती.चित्रपटाच्या नावातील चुकीच्या व्याकरणाविषयी विचारताच नाना म्हणाले की, ब-याचदा प्रमाण भाषेचे बांधून ठेवलेले ठोकताळे न वापरता थेट भावना पोहोचणे आवश्यक ठरते. तसेच अनेकदा बोली भाषेत आपल्या माणसाविषयी बोलताना नकळत ‘माणूस’ ऐवजी ‘मानूस’ येऊन जाते. तेच काहींसे या चित्रपटाच्या बाबतीत आहे. हा माणूस नेमका ‘मानूस’ का आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.राहुल (सुमित राघवन) आणि भक्ती (इरावती) हे शहरी दाम्पत्य आणि त्यांचे वडील यांच्या नात्यातील गुंतागुंत गुुंफत चित्रपटाची कथा सुरू होते. वडिलांच्या अनपेक्षित मृत्यूमुळे मारोती नागरगोजे (नाना पाटेकर) हा वरिष्ठ पोलीस अधिकारी या जोडप्याच्या आयुष्यात येतो आणि त्यामुळे या जोडप्याच्या कुटुंब, जीवन याविषयीच्या संकल्पनाच ढवळून निघतात. हा चित्रपट पाहून तुम्ही तिथेच सोडून जात नाही, तर तो सोबत घेऊन जाता. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या आपल्या मानसाला आवर्जून फोन कराल, असा विश्वास या कलावंतांनी व्यक्त केला.आज आपण इतरांना खूप प्रश्न विचारतो, पण स्वत:ला कधीच प्रश्न विचारत नाही. स्वत:शी बोलत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आणि तरुण जोडप्यांच्या नात्यामध्ये आलेली गुंतागुंत या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे राजवाडे यांनी स्पष्ट केले.भूमिकेविषयी भाष्य करताना इरावती म्हणाल्या की, आजच्या ‘वर्किंग वूमन’चे प्रतिनिधित्व त्या या चित्रपटातून करीत आहेत. करिअरच्या पाय-या चढताना कुठेतरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याचा भक्तीच्या मनातला अपराधीपणा आजच्या वर्किंग वूमनशी साधर्म्य साधणारा असल्याचे त्या म्हणाल्या.अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य नकोच -नाना पाटेकरसिनेमाला जशी ‘सेन्सॉरशिप’ असते तशी राजकीय मंचावरून, समाजमाध्यमांवरून तरुणांची माथी भडकावणा-या मंडळींच्या बोलण्यावरही ‘सेन्सॉरशिप’ असावी, असे ठाम मत नाना पाटेकर यांनी मांडले. अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध दर्शवून ते म्हणाले की, समाजात फूट किंवा अनिष्ट प्रथांचे महिमाकरण केले जात असेल तर त्यावर बंधने आलीच पाहिजे. तरुणांमध्ये घुसमट वाढतेय हे मान्य करताना नानांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार करण्याला विरोध केला. तरुणांना जाती-धर्माच्या मुद्यावर लढवत ठेवणाºया नेत्यांचा समाचार घेताना नाना म्हणाले की, ‘तेढ निर्माण करणाºया नेत्यांच्या मागे जाऊ नका. सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांना एकमेकांची गरज आहे. हिंसाचार कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही.’ यावेळी नानांनी लोकसंख्येचा महास्फोट, हरवत चाललेली नाती, ढासळती कुटुंब व्यवस्था, संवादाचा अभाव, अशा अनेक सामाजिक विषयांवर मोकळ्यापणाने भाष्य केले. शेतक-यांच्या समस्येविषयी बोलताना त्यांनी शहरात होणा-या स्थलांतराबद्दल चिंता व्यक्त केली. ‘नव्या पिढीने थोडा काळ तरी ग्रामीण भागात व्यतीत करावा. लोकसहभागातून अनेक समस्या सुटू शकतात.’ आजपर्यंतच्या प्रवासाचे चिंतन करताना ते म्हणाले की, माझ्या सातबारावर एकही जमीन नाही. मात्र, माणसं खूप आहेत. यापेक्षा मोठी श्रीमंती काय!’