शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

‘आपला मानूस’ एक कौटुंबिक थरारपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:05 IST

मुळातच भारतीय माणूस हा नातेसंबंधांच्या बाहेर जात नाही. आजच्या तरुणाच्या मनात मानवी जीवन आणि कुटुंबविषयक श्रद्धांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उकल करणारा ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परस्पर नातेसंबंधांवर बेतलेली गोष्ट सांगणारा हा एक कौटुंबिक थरारपट असून, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या आपल्या माणसाची आठवण करून देणारा ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुळातच भारतीय माणूस हा नातेसंबंधांच्या बाहेर जात नाही. आजच्या तरुणाच्या मनात मानवी जीवन आणि कुटुंबविषयक श्रद्धांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उकल करणारा ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परस्पर नातेसंबंधांवर बेतलेली गोष्ट सांगणारा हा एक कौटुंबिक थरारपट असून, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमच्या आपल्या माणसाची आठवण करून देणारा ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केला.वायकॉम १८ मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत ‘आपला मानूस’ हा मराठी चित्रपट दि. ९ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने नाना यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटासोबतच इतर अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे, निर्माते निखिल साने, अभिनेत्री इरावती हर्षे, मल्हार पाटेकर यांचीही उपस्थिती होती.चित्रपटाच्या नावातील चुकीच्या व्याकरणाविषयी विचारताच नाना म्हणाले की, ब-याचदा प्रमाण भाषेचे बांधून ठेवलेले ठोकताळे न वापरता थेट भावना पोहोचणे आवश्यक ठरते. तसेच अनेकदा बोली भाषेत आपल्या माणसाविषयी बोलताना नकळत ‘माणूस’ ऐवजी ‘मानूस’ येऊन जाते. तेच काहींसे या चित्रपटाच्या बाबतीत आहे. हा माणूस नेमका ‘मानूस’ का आहे, हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.राहुल (सुमित राघवन) आणि भक्ती (इरावती) हे शहरी दाम्पत्य आणि त्यांचे वडील यांच्या नात्यातील गुंतागुंत गुुंफत चित्रपटाची कथा सुरू होते. वडिलांच्या अनपेक्षित मृत्यूमुळे मारोती नागरगोजे (नाना पाटेकर) हा वरिष्ठ पोलीस अधिकारी या जोडप्याच्या आयुष्यात येतो आणि त्यामुळे या जोडप्याच्या कुटुंब, जीवन याविषयीच्या संकल्पनाच ढवळून निघतात. हा चित्रपट पाहून तुम्ही तिथेच सोडून जात नाही, तर तो सोबत घेऊन जाता. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही तुमच्या आपल्या मानसाला आवर्जून फोन कराल, असा विश्वास या कलावंतांनी व्यक्त केला.आज आपण इतरांना खूप प्रश्न विचारतो, पण स्वत:ला कधीच प्रश्न विचारत नाही. स्वत:शी बोलत नाही. ही सगळ्यात मोठी समस्या आणि तरुण जोडप्यांच्या नात्यामध्ये आलेली गुंतागुंत या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे राजवाडे यांनी स्पष्ट केले.भूमिकेविषयी भाष्य करताना इरावती म्हणाल्या की, आजच्या ‘वर्किंग वूमन’चे प्रतिनिधित्व त्या या चित्रपटातून करीत आहेत. करिअरच्या पाय-या चढताना कुठेतरी कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याचा भक्तीच्या मनातला अपराधीपणा आजच्या वर्किंग वूमनशी साधर्म्य साधणारा असल्याचे त्या म्हणाल्या.अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य नकोच -नाना पाटेकरसिनेमाला जशी ‘सेन्सॉरशिप’ असते तशी राजकीय मंचावरून, समाजमाध्यमांवरून तरुणांची माथी भडकावणा-या मंडळींच्या बोलण्यावरही ‘सेन्सॉरशिप’ असावी, असे ठाम मत नाना पाटेकर यांनी मांडले. अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध दर्शवून ते म्हणाले की, समाजात फूट किंवा अनिष्ट प्रथांचे महिमाकरण केले जात असेल तर त्यावर बंधने आलीच पाहिजे. तरुणांमध्ये घुसमट वाढतेय हे मान्य करताना नानांनी रस्त्यावर उतरून हिंसाचार करण्याला विरोध केला. तरुणांना जाती-धर्माच्या मुद्यावर लढवत ठेवणाºया नेत्यांचा समाचार घेताना नाना म्हणाले की, ‘तेढ निर्माण करणाºया नेत्यांच्या मागे जाऊ नका. सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या लोकांना एकमेकांची गरज आहे. हिंसाचार कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नाही.’ यावेळी नानांनी लोकसंख्येचा महास्फोट, हरवत चाललेली नाती, ढासळती कुटुंब व्यवस्था, संवादाचा अभाव, अशा अनेक सामाजिक विषयांवर मोकळ्यापणाने भाष्य केले. शेतक-यांच्या समस्येविषयी बोलताना त्यांनी शहरात होणा-या स्थलांतराबद्दल चिंता व्यक्त केली. ‘नव्या पिढीने थोडा काळ तरी ग्रामीण भागात व्यतीत करावा. लोकसहभागातून अनेक समस्या सुटू शकतात.’ आजपर्यंतच्या प्रवासाचे चिंतन करताना ते म्हणाले की, माझ्या सातबारावर एकही जमीन नाही. मात्र, माणसं खूप आहेत. यापेक्षा मोठी श्रीमंती काय!’