शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा

By बापू सोळुंके | Updated: July 17, 2024 19:53 IST

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी मराठवाड्यातील नदी, नाल्यांना पूर आलेला नाही. परिणामी, या वर्षी मराठवाड्यातील बहुतेक सर्वच लहान-मोठ्या धरणांनी तळ गाठलेला आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ४ टक्के जलसाठा उरला आहे, तर ११ मोठ्या प्रकल्पांपैकी ४ धरणे कोरडी आहेत. मध्यम प्रकल्पांतही केवळ १४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. राहिलेल्या ७३ दिवसांत हे प्रकल्प कसे भरतील, याची चिंता प्रशासन आणि शेतकऱ्यांना सतावत आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज असल्याने दीड महिन्यात मुसळधार पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर आलेला नाही. नद्यांना पूर न आल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात केवळ ८९ द.ल.घ.मी. अर्थात ४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर सिद्धेश्वर (हिंगोली), मांजरा आणि माजलगाव (बीड) तसेच सीना कोळेगाव (धाराशिव) हे प्रकल्प कोरडे आहेत. केवळ येलदरी प्रकल्पात २८ टक्के, उर्ध्व पेनगंगामध्ये ३० टक्के, निम्न तेरणा १६ टक्के तर निम्न मनार प्रकल्पात २६ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ओसंडून वाहणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात ४४ तर निम्न दुधना प्रकल्पात ४ टक्के पाणी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मराठवाड्यात जून ते ऑगस्टपर्यंतच मौसमी पाऊस पडतो. सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस पडत असतो. यामुळे आता चांगल्या पावसाचे केवळ ७३ दिवस उरले आहेत. या कालावधीत मुसळधार पावसाची प्रकल्पांना प्रतीक्षा आहे.

मध्यम प्रकल्पाचीही दयनीय अवस्थामोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ आणि जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांमध्ये केवळ सरासरी ३ टक्के जलसाठा आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ९ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा आहे. धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत ६, नांदेड जिल्ह्यातील ९ धरणांत १७ व परभणी जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ७ टक्के जलसाठा उरल्याचे जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी सांगितले.

मागील दोन वर्षांच्या तुलनेत अत्यल्प साठामध्यम प्रकल्पाच्या मागील दोन वर्षांतील एकूण प्रकल्पांच्या सरासरी जलसाठ्याच्या तुलनेत हा जलसाठा अत्यल्प आहे. २०२२ मध्ये मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पात सरासरी ३१ टक्के पाणीसाठा होता. तर गतवर्षी २०२३ मध्ये १७ टक्के होता. या वर्षी केवळ ८ टक्के आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसWaterपाणी