शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे ७३ दिवस उरले; मराठवाड्यातील प्रमुख धरणे भरणार का? मुसळधार पावसाची प्रतीक्षा

By बापू सोळुंके | Updated: July 17, 2024 19:53 IST

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज

छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी मराठवाड्यातील नदी, नाल्यांना पूर आलेला नाही. परिणामी, या वर्षी मराठवाड्यातील बहुतेक सर्वच लहान-मोठ्या धरणांनी तळ गाठलेला आहे. सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात केवळ ४ टक्के जलसाठा उरला आहे, तर ११ मोठ्या प्रकल्पांपैकी ४ धरणे कोरडी आहेत. मध्यम प्रकल्पांतही केवळ १४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. राहिलेल्या ७३ दिवसांत हे प्रकल्प कसे भरतील, याची चिंता प्रशासन आणि शेतकऱ्यांना सतावत आहे.

गतवर्षीप्रमाणे यंदाही वरुणराजा मराठवाड्यावर नाराज असल्याने दीड महिन्यात मुसळधार पावसाअभावी नदी-नाल्यांना पूर आलेला नाही. नद्यांना पूर न आल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात केवळ ८९ द.ल.घ.मी. अर्थात ४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. तर सिद्धेश्वर (हिंगोली), मांजरा आणि माजलगाव (बीड) तसेच सीना कोळेगाव (धाराशिव) हे प्रकल्प कोरडे आहेत. केवळ येलदरी प्रकल्पात २८ टक्के, उर्ध्व पेनगंगामध्ये ३० टक्के, निम्न तेरणा १६ टक्के तर निम्न मनार प्रकल्पात २६ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी ओसंडून वाहणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात ४४ तर निम्न दुधना प्रकल्पात ४ टक्के पाणी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. मराठवाड्यात जून ते ऑगस्टपर्यंतच मौसमी पाऊस पडतो. सप्टेंबर महिन्यात परतीचा पाऊस पडत असतो. यामुळे आता चांगल्या पावसाचे केवळ ७३ दिवस उरले आहेत. या कालावधीत मुसळधार पावसाची प्रकल्पांना प्रतीक्षा आहे.

मध्यम प्रकल्पाचीही दयनीय अवस्थामोठ्या प्रकल्पांप्रमाणेच मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ आणि जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांमध्ये केवळ सरासरी ३ टक्के जलसाठा आहे. बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ९ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पांत ११ टक्के पाणीसाठा आहे. धाराशिव जिल्ह्यातील १७ प्रकल्पांत ६, नांदेड जिल्ह्यातील ९ धरणांत १७ व परभणी जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ७ टक्के जलसाठा उरल्याचे जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनी सांगितले.

मागील दोन वर्षांच्या तुलनेत अत्यल्प साठामध्यम प्रकल्पाच्या मागील दोन वर्षांतील एकूण प्रकल्पांच्या सरासरी जलसाठ्याच्या तुलनेत हा जलसाठा अत्यल्प आहे. २०२२ मध्ये मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पात सरासरी ३१ टक्के पाणीसाठा होता. तर गतवर्षी २०२३ मध्ये १७ टक्के होता. या वर्षी केवळ ८ टक्के आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसWaterपाणी