शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

जायकवाडीत पोहोचेल ६ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 10:55 PM

नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. ‘जायकवाडी’साठी ८.९९ म्हणजे जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड्डे आणि अन्य कारणांनी ६ टीएमसी पाणीच पोहोचण्याचा अंदाज आहे. तब्बल ३ टीएमसी पाण्याच्या नुकसानीची भीती आहे.

ठळक मुद्दे ३ टीएमसीचे नुकसान : कोरडे नदीपात्र, वाळू उपशाच्या खड्ड्यांमुळे पाण्यात घट होण्याचा अंदाज

औरंगाबाद : नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी तब्बल १५ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर गुरुवारी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावले. ‘जायकवाडी’साठी ८.९९ म्हणजे जवळपास ९ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. प्रत्यक्षात कोरडे नदीपात्र, वाळू उपशाचे खड्डे आणि अन्य कारणांनी ६ टीएमसी पाणीच पोहोचण्याचा अंदाज आहे. तब्बल ३ टीएमसी पाण्याच्या नुकसानीची भीती आहे.निळवंडे धरणातून गुरुवारी सकाळी प्रारंभी ४,२५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पाण्याचा विसर्ग दुपारी वाढविला. येथून ७ हजार ५०५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, तर मुळा धरणातून ८ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. दारणा धरणातून ११ हजार १५८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. गंगापूर धरणातून ३ हजार ५२४, तर मुकणे धरणातून १ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पालखेड धरण समूहातून जायकवाडीसाठी ०.६० टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.आज दुपारपर्यंत येणार पाणीजायकवाडीत २४ ते २६ तासांत १४० कि.मी.चा प्रवास करून सर्वात आधी मुळा धरणातील पाणी पोहोचण्याचा अंदाज आहे, तर सर्वात शेवटी २२५ कि.मी.चा प्रवास करून जवळपास ३८ तासांत गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित असल्याचे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे जायकवाडीत मुळा धरणाचे पाणी शुक्रवारी दुपारपर्यंत पोहोचेल. त्यानंतर सायंकाळपर्यंत उर्वरित धरणांचे पाणी पोहोचेल, अशी शक्यता आहे.पाणी चोरीची भीतीजायकवाडी धरणात पाणी पोहोचण्यापूर्वी नगर, नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतरीत्या खेचले जाते. त्यामुळे नदीलगतच्या भागांमध्ये पोलीस प्रशासनाच्या मदतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोटारींद्वारे पाणी चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद ठेवून खबरदारी घेण्यात येत आहे; परंतु डिझेल मोटारींद्वारे पाणी शेततळे, विहिरीत वळविण्याच्या प्रयत्नांमुळे जायकवाडीत येणाऱ्या पाण्यात मोठी घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.पाण्याचे चित्रीकरणवरच्या धरणांतून पाणी सोडण्यापूर्वी आणि प्रवास सुरू झाल्यानंतर चित्रीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक धरणावर चार जणांचे पथक देखरेख करण्याचे काम करीत आहे. यामध्ये पाण्याची पातळी, पाण्याचा होणारा विसर्ग यांच्या नोंदी घेण्याचे काम केले जात आहे. ऊर्ध्व भागातील धरणांपासून ते पैठण धरणापर्यंत विविध ठिकाणी पाणी मोजण्यात येणार आहे. मराठवाड्याला हक्काचे पूर्ण पाणी सोडले जाईल, यावर पाटबंधारे विभागाकडून करडी नजर ठेवली जात आहे.जायकवाडीत २९.६२ टक्के पाणीसाठागतवर्षी शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणात गुरुवारी २९.६२ टक्के पाणीसाठा होता. वरच्या धरणांतून येणाºया पाण्यामुळे किमान काही प्रमाणात जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल.तीन कारणांनी पाण्याचे नुकसानजायकवाडीसाठी सोडलेल्या पाण्यापैकी काही पाण्याचे तीन कारणांनी नुकसान होऊ शकते. यात नदीपात्रातील जमिनीत पाणी मुरते. ऊन आणि हवेचादेखील परिणाम होतो. मोटारी लावून पाणी चोरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हे सगळे धरून किमान ६.१० टीएमसी पाणी जायकवाडीत येईल, अशी आशा आहे, असे जलतज्ज्ञ शंकर नागरे म्हणाले.६ टीएमसी अपेक्षितयंदा पावसाळा लवकरच संपला आहे. दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने नदीचे पात्र बºयाच ठिकाणी कोरडे झाले आहे. वाळूच्या उपशामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात. या सगळ्या कारणांमुळे किमान ५ ते ६ टीएमसी पाणी जायकवाडीत येणे अपेक्षित आहे.-अजय कोहिरकर, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

टॅग्स :WaterपाणीDamधरण