शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पैठण रोडवर ३ ठिकाणी जलवाहिन्यांचे स्थलांतर; छत्रपती संभाजीनगरात २ दिवस निर्जळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 14:20 IST

जलवाहिन्या स्थलांतरित करण्यात येणार असल्याने शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. तीन ठिकाणी जलवाहिन्यांचा अडथळा येत असून, त्यासाठी महापालिका प्रशासन ४८ तासांचा शटडाऊन मंगळवारपासून घेत आहे. जलवाहिन्या स्थलांतरित करण्यात येणार असल्याने शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

नॅशनल हायवेकडून मागील काही दिवसांपासून जलवाहिन्या स्थलांतरित करण्याची मागणी मनपाकडे करण्यात येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शटडाऊन घेतले तर नागरिकांकडून ओरड होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यातच दिवाळीच्या तोंडावरही जलवाहिन्या स्थलांतरित केल्या तरी नागरिकांची नाराजी अटळ होती. त्यामुळे आता महापालिकेने शटडाऊनसाठी ग्रीन सिग्नल दिला. पैठण रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेवराई तांडा, कौडगाव-ताहेरपूर आणि ढोरकीन येथे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करण्याची विनंती केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी ९:०० वाजता हे काम सुरू होणार आहे. बुधवारी रात्रीपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. एकूण सहा ठिकाणी जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन द्यावे लागणार आहे. बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळी शहरात पाणी येण्यास सुरुवात होईल. मनपाला जलवाहिनी चाचणी घेणे, जलवाहिनी पूर्णपणे भरण्यासाठी १२ ते १८ तासांचा वेळ लागणार आहे.

विजेचे खांबही काढणारवीज वितरण कंपनीनेदेखील १५ तास शटडाऊन देण्याची मागणी केली आहे. या काळात वीज वितरण कंपनीतर्फे रस्त्यात येणारे विजेचे खांब हटविले जाणार आहेत. नवीन खांब बसविले असून, त्यासाठी केबल टाकण्याचे काम करावे लागणार आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्र पूर्णपणे बंद राहील.

७००, ९००चे पाणीही बंदशहराला पाणीपुरवठा करणारी ७०० आणि १२०० मिमी व्यासाची जलवाहिनीसुद्धा बंद राहणार आहे. त्यामुळे दोन दिवस शहरात एक थेंबही पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी