प्रतिनियुक्तीवरील ४५ कर्मचारी बसून
By Admin | Updated: August 20, 2015 00:19 IST2015-08-20T00:19:28+5:302015-08-20T00:19:28+5:30
बीड : लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी बीडच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी घेतले होते. मात्र, आता सदरील पाणी पुरवठा योजना

प्रतिनियुक्तीवरील ४५ कर्मचारी बसून
बीड : लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी बीडच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील कर्मचारी घेतले होते. मात्र, आता सदरील पाणी पुरवठा योजना लातूर महानगरपालिकेने चालविण्यास घेतली असल्याने बीडचे कर्मचारी पुन्हा प्रतिनियुक्तीवर जिल्ह्यात आले असल्याने ४५ कर्मचारी कामाविना बसून आहेत. हे कर्मचारी बीड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर घेण्याची मागणी होत आहे.
जलसेवक, पंप आॅपरेटर, जोडारी, कारकून पदावरील ४५ कर्मचारी लातूर शहरातील पाणी पुरवठा योजनेवर प्रतिनियुक्त करण्यात आले होते. धनेगाव योजना बंद पडली तर लातूर शहराची पाणी पुरवठा योजना महानगर पालिकेने स्व:ताच्या ताब्यात घेतली. त्यामुळे बीड येथील एमजीपीचे ४५ कर्मचारी पुन्हा बीड जिल्ह्यात पाठविण्यात आले. या कर्मचाऱ्यांना अंबाजोगाई येथील एमजीपीच्या कार्यालयात प्रतिनियुक्ती दिली आहे. सद्यस्थितीला त्यांच्या हाताला काम नाही. काम असो किंवा नसो वेतन देणे बंधनकारक आहे.
काय आहेत समस्या ?
पाणी पुरवठा योजनेत पाईप लाईन तुटणे, जोडणे, पाणी सोडणे, फिटींग करणे अशी लहान-लहान परंतू महत्वाची कामे केली जातात. ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी योग्यरित्या करतात. त्यांना पंधरा ते वीस वर्षांचा अनुभव असतो. त्यामुळे न.प.च्या बॅक वॉटरच्या कामावर त्यांची नियुक्ती केल्यास लाभ होऊ शकतो. (प्रतिनिधी)
बिंदुसरा धरण आटले असल्यामुळे माजलगाव धरणातून बीड शहरात पाणी पुरवठा केला जात आहे. दोन्ही योजनेवर सध्या ७० कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. बिंदुसरा पाणीपुरवठा योजनेवर पाच ते सात कर्मचारी आहेत. तेथून ते काढता येत नाहीत. या शिवाय माजलगाव बॅक वाटरवर कार्यरत कर्मचारी कंत्राटी असून कामात नैपुण्य नाही. त्यामुळे बीडच्या जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी नगर परिषदेच्या योजनेवर कार्यान्वीत केले तर त्याचा साकारात्मक परिणाम दिसेल.