शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

४० गावांना तीव्र झळा...

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

मारूती कदम , उमरगा पावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़

मारूती कदम , उमरगा
पावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ एका गावात टँकर तर २० गावांसाठी ३० अधिग्रहणे करण्यात आली असून, ६० साठवण तलाव कोरडेठाक पडले आहेत़
उमरगा तालुक्याची पावसाची सरासरी ९५० मिमी आहे़ गतवर्षी सरासरपीपैकी ८५० मि़मी़पाऊस झाला होता़ तर तालुक्यात कमी-अधिक ठिकाणी पाऊस झाल्याने काही ठिकाणचे तलाव भरले तर काही ठिकाणचे निम्म्यापर्यंतच भरले होते़ गत सहा वर्षे कमी अधिक प्रमाणात पावसाचे प्रमाण असेच राहिले आहे़ सद्यस्थितीत तालुक्यातील ६० साठवण तलाव कोरडेठाक पडले आहे़ बेनितुरा, कोळसूर, तुरोरी, जकापूर या तलावाही अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे़ उन्हाची तीव्रता कायम असली तरी पावसाची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे़ गत काही दिवसांपासून ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे़ उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरणातही अत्यल्प पाणीसाठा आहे़ त्यामुळे शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ तालुक्यातील चिंचोली (ज़), गुरूवाडी, चिंचकोटा, डिग्गी, कदेर, पळसगाव, बेंळंब तांडा, काटेवाडी, चिरेवाडी, बोरी, गुंजोटी, नारंगवाडी, केसरजवळगा, समुद्राळ, एकोंडी (ज़), मळगी, भगतवाडी आदी गावात तीव्र टंचाई निर्माण झाली आहे़ चिंचोली (ज़) येथे गत दोन महिन्यापासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ तर २० गावांसाठी ३० ठिकाणी विहिरी, कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ तर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेले ३० प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत़ एकूणच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेत आणि पावसाने पाठ फिरविल्याने पाणीटंचाई उग्र रूप धारण करीत आहे़
८९ लाखांचा कृती आराखडा
तालुक्यात निर्माण झालेल्या व संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ८८ लाख, ९२ हजार रूपयांचा कृती आराखडा तयार केला आहे़ सदरील आराखडा मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे़
वन्य प्राणी गावकुसाला
पावसाने ओढ दिल्याने साठवण तलाव, विहिरी, शेततळी आदी ठिकाणचे पाणीसाठे कोरडेठाक पडले आहेत़ वनक्षेत्रातही पिण्याचा पाण्याचा अभाव असल्याने वानर, ससे, मोर, कोल्हे, तरस आदी वन्य प्राणी गावाच्या शिवारातील जलस्त्रोतांवर तहान भागविण्यासाठी येत असल्याचे दिसत आहे़ वनविभागाने वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे़