शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रास्ता रोको प्रकरणी ४० आंदोलकांना दंडाची शिक्षा

By admin | Updated: July 22, 2014 00:16 IST

लातूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर तालुक्यातील करकट्टा येथे २००१ साली ऊस दरासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते़

लातूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर तालुक्यातील करकट्टा येथे २००१ साली ऊस दरासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते़ दरम्यान, मुरुड पोलिसांत गुन्हा दाखल होऊन जिल्हा न्यायालयात खटला दाखल झाला होता. न्यायालयात सुनावणी होऊन सोमवारी जिल्हा न्यायालयाने ४० आंदोलकांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड अथवा दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.
२००१ साली शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सत्तार पटेल, अण्णासाहेब पाटील, रशीद पठाण, जयराम पाटील, गोरोबा मोदी, हणमंत भिसे, काकासाहेब नावपुरे, बंडू माळी, अशोक भुजबळ, तानाजी ढोबळे यांच्यासह ४० शेतकऱ्यांनी उसाला चांगला भाव मिळावा, यासाठी करकट्टा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते़ याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात गैरकायद्याची मंडळी जमवून रास्ता रोखणे, दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते़
या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उपरोक्त ४० आंदोलकांवर गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण केल्याचा ठपका ठेवून प्रत्येकी २ हजार ५०० रूपये दंड किंवा १५ दिवसांचा तुरूंगवासाची शिक्षा सुनावली़
दरम्यान, सायंकाळी ५ वाजता ४० शेतकऱ्यांचा १ लाख रूपये दंडाची रक्कम न्यायालयात जमा केल्यावर संबंधित आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड़ विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)
प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ४० कार्यकर्त्यांना न्यायालयाने प्रत्येकी अडीच हजार किंवा १५ दिवसांचा तुरूंगवास अशी शिक्षा सुनावली़ दंड भरल्याशिवाय सुटका नसल्याचे आदेश बजावण्यात आले होते़ दुपारी ३ वाजता न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तब्बल २ तास कार्यकर्ते न्यायालयातच थांबले होते़ सायंकाळी ५ वाजता ४० जणांचा १ लाख रूपये रोख दंड भरल्यानंतर त्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात आली़
आंदोलकांवर गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण केला़ तसेच रहदारीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवून मुरुड पोलिसात २००१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल होऊन सोमवारी त्याची अंतिम सुनावणी झाली आणि न्यायालयाने आंदोलकांना प्रत्येकी अडीच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवसांचा कारावास, अशी शिक्षा सुनावली. मात्र आंदोलकांनी दंड भरून सुटका करून घेतली.