शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

'अभ्यासक्रम ४० टक्के ऑनलाईन, तर ६० टक्के ऑफलाईन'; संमिश्र शिक्षण पद्धत राबविण्याचा ‘यूजीसी’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 19:57 IST

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘यूजीसी’ने घेतला असून त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत.

ठळक मुद्देग्रामीण विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा जास्त धोका

औरंगाबाद : उच्च शिक्षणामध्ये यापुढील काळात विद्यापीठे व महाविद्यालयांनी ४० टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन, तर ६० टक्के अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने शिकविण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) घेतला असून विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘यूजीसी’ने घेतला असून त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. या संमिश्र शिक्षण पद्धतीमध्ये ऑनलाईन व फेस टू फेस अध्यापन पद्धत राबविण्याची तरतूद करण्यात आली. ही तरतूद शिक्षकांना संभ्रमात टाकणारी आहे, असे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणतात, या पद्धतीनुसार शिक्षकांनी दोन दिवस घरी बसून आणि चार दिवस कॉलेजमध्ये जाऊन शिकवायचे का, हे स्पष्ट होत नाही. आम्ही ऑनलाईन तासिका घेतो तेव्हा बहुतांशी विद्यार्थी या तासिकांमध्ये सहभागी होत नाहीत. ऑनलाईन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी करण्यास संधी आहे. त्यामुळे हे धोरण प्रभावी ठरणारे नाही. दुसरीकडे, वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे यांनी मात्र, या धोरणामुळे सर्वांना शिक्षण मिळेल. शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. अभ्यासक्रम, प्रात्याक्षिके व परीक्षा ऑनलाईन घेतल्यास कोणी कोठूनही परीक्षा देऊ शकेल व शिक्षणही घेऊ शकेल.

दुसरीकडे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी मात्र ‘यूजीसी’चे हे धोरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मारक ठरेल, अशी भूमिका मांडली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या तेव्हा ८० टक्के विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेला पसंती दर्शवली. या शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञान हा घटक महत्त्वाचा मानला आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे आधुनिक साधनांची वाणवा आहे. त्यामुळे पारंपरिक अभ्यासक्रमाचे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ऑनलाईन अध्यापन व परीक्षेपासून वंचित राहतील. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हे धोरण उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

विद्यार्थी संघटना काय म्हणतात...‘यूजीसी’ने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांचे लसीकरण झाल्यानंतर त्यांना वर्गात बसून शिकता येईल. दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव कधी संपुष्टात येईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे ४० टक्के ऑनलाइन व ६० टक्के ऑफलाइन पद्धतीनेच शिकवले गेले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.- निकेतन कोठारी, अभाविप

गुरुकुल शिक्षण पद्धतीला संपविण्याचा प्रयत्नप्रत्येकाला ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही. या शिक्षण पद्धतीमुळे आपल्याकडील प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धत संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य देशात ऑनलाइन शिक्षण पद्धती प्रभावी ठरली आहे. कारण, त्यांना तिकडे तेवढी साधने उपलब्ध आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे आपल्याकडील गरीब, वंचित विद्यार्थ्यांच्या हातून शिक्षण हिसकावून घेण्यासारखे आहे.- प्रकाश इंगळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद