शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

वर्षभरात औरंगाबादमध्ये झाले २४ खून तर ६१२ जण जखमी; हाणामारीच्या ५०० घटनात समोर आली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 11:48 AM

शहराच्या विस्तारीकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्षभराच्या कालावधीत शहरात तब्बल २४ जणांचे खून झाले आणि हाणामारीच्या शेकडो घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली.

ठळक मुद्दे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अकरा महिन्यांच्या कालावधीत हाणामारीच्या ५०० हून अधिक घटना घडल्या. किरकोळ कारणावरून तब्बल २४ खून शहरात झाले. या घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहराच्या विस्तारीकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. असे असले तरी वर्षभराच्या कालावधीत शहरात तब्बल २४ जणांचे खून झाले आणि हाणामारीच्या शेकडो घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. 

याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहराच्या तिन्ही बाजूने वाळूज, चिकलठाणा आणि रेल्वेस्टेशन या एमआयडीसी आहे. यासोबत शेंद्रा पंचतारांकित वसाहत आणि नव्याने येऊ घातलेला दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे शहराच्या लोकसंख्येत भर पडणार आहे. उद्योग-व्यवसायानिमित्त देश-विदेशातील लोक औरंगाबादेत येत असतात. औद्योगिकरणासोबतच शहरातील गुन्हेगारी मागील पाच वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. असे असले तरी गतवर्षीच्या तुलनेत खून आणि हाणामारीसारख्या घटना घटल्याचा दावा शहर पोलिसांनी केला.

कट रचून आणि सुपारी देऊन हत्या करण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने शासकीय पदावरील एका महिला अधिकार्‍याने बँक अधिकारी असलेल्या पतीची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी शहरात घडली. अशा मोजक्या घटना सोडल्या, तर किरकोळ कारणावरून तब्बल २४ खून शहरात झाले. 

हाणामारीच्या घटना मात्र रोज घडत आहेत.  वाहनाला कट का मारला, रागाने पाहणे, नळाच्या पाण्यावरून शेजार्‍यांतील भांडण, गुंडागर्दी करून हाणामारी होण्याचे प्रकार मात्र वाढले आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अकरा महिन्यांच्या कालावधीत हाणामारीच्या ५०० हून अधिक घटना घडल्या. या घटनांमध्ये ६१२ जण जखमी झाल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

अनेक प्रकरणांत तडजोड

याविषयी सूत्रांकडून समजले की, शहरात रोज सहा ते सात हाणामारीच्या घटना घडतात. या हाणामारीत जखमी झालेले उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात आणि तेथून पुढे तडजोडीला सुरुवात होते.  प्रकरण पोलिसांत गेले तर कोर्ट-कचेरीच्या चकरा माराव्या लागतील, पुन्हा पोलीस रेकॉर्ड तयार होऊन तरुणांच्या नोकरीसाठी ते अडसर ठरू शकते, ही बाब लक्षात घेऊन प्रकरण आपसात तडजोडीने मिटविले जाते. बर्‍याचदा पोलीसही अशावेळी मदत करतात.