शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातील २,१४८ गुन्हे होणार रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी २१ मार्च ते जूनअखेरपर्यंत देशभर लॉकडाऊन होता. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दोन तास ...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गतवर्षी २१ मार्च ते जूनअखेरपर्यंत देशभर लॉकडाऊन होता. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने केवळ दोन तास सुरू ठेवण्याची मुभा होती. विनापरवानगी घराबाहेर पडणे, विहित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवणे, विनापरवानगी कार, दुचाकीने प्रवास करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, विनामास्क घराबाहेर पडणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे कलम १८८ नुसार गुन्हा ठरविण्यात आले होते. मार्च ते डिसेंबरअखेरपर्यंत शहरातील १७ पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल हजारो नागरिकांवर २ हजार १४८ गुन्हे नोंदविले होते. या गुन्ह्यांतील आरोपी नागरिकांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी दिली होती. गुन्हे दाखल होताच पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र तयार केले होते. लॉकडाऊन कालावधीत न्यायालये बंद होती, यामुळे पोलिसांना हे दोषारोपपत्र न्यायालयात तातडीने दाखल करता आले नव्हते.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या गुन्हे नोंद झालेल्या नागरिकांना कोर्टात बोलावून त्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून आणखी जेरीस आणणे योग्य नसल्याचे शासनाचे मत बनले. यामुळे शासनाने लॉकडाऊन कालावधीत राज्यातील दाखल ४ लाख गुन्हे परत घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहर पोलिसांनी नोंदविलेल्या २ हजार १४८ गुन्ह्यांचा समावेश आहे. हे गुन्हे आता रद्द होणार असल्यामुळे अशा गुन्ह्यांतील आरोपींना दिलासा मिळाला.