शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

२००६ पैठण पूर: २० व्यापारी अडकले; मदतीसाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावांना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:41 IST

‘आम्ही दुकानांवर अडकलो, वाचणे कठीण, हा शेवटचा कॉल समजा’; सहा तास पाण्याने वेढलेले, व्यापाऱ्यांनी सांगितली २००६ मधील आपबिती

- राहुल जगदाळे 

छत्रपती संभाजीनगर : आम्ही बसस्थानक व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावर आम्ही २० जण अडकलो होतो. त्याचवेळी धरणातून आणखी विसर्ग वाढवून तीन लाखांवर करण्यात येणार असल्याचे कळाले. आता आमचे काही खरे नाही, वाचणे कठीण आहे, हा आमचा शेवटचा कॉल समजा, असे मित्रांना कळवूनही टाकले होते, अशी २००६ मधील आपबिती आणि सहा तासांचा थरार पैठणच्या व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना कथन केली.

पैठण शहर व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया यांनी २००६ मधील परिस्थितीला उजाळा दिला. ते म्हणाले, जायकवाडीतून अडीच लाख विसर्ग करणार असल्याचे प्रशासनाने सकाळी अचानक सांगितले. कोणालाच किती पाणी येईल, याचा अंदाज नव्हता. आमच्या वडिलांनी १९९१ मध्ये महापुरातही शहरात जास्त पाणी शिरले नव्हते. त्यामुळे दुकाने पाण्याखाली जातील, याची अपेक्षाच नव्हती. केवळ तीन फूट पाणी येईल, असे वाटले होते. परंतु, आमची दुकानेच पाण्याखाली गेली होती. त्यामुळे बसस्थानक व्यापारी संकुलाच्या दुसऱ्या मजल्यावरील नातेवाईक, मित्रांच्या दुकानांत शक्य तेवढे साहित्य, माल हलवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. आम्ही संकुलावर अडकलो. दुपारनंतर जायकवाडीतून ३ लाख विसर्ग करणार असल्याचे कळाले. त्यामुळे स्वाभाविक भीती वाटली. त्याचवेळी आमच्यापैकी काहींकडे असलेल्या मोबाइलवरून नातेवाईक, मित्रांना कॉल करू लागलो. आता आम्ही काही परतत नाही. हा आमचा शेवटचा कॉल समजा, असे सांगूनही टाकले होते, असे लोहिया म्हणाले.

मदतीसाठी थेट विलासरावांना फोनबसस्थानक व्यापारी संकुलावर २० व्यापारी अडकले आहेत, त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यासाठी थेट तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी फोन केला. देशमुख यांनी व्यवस्था करतो, असे सांगितले. परंतु, सुदैवाने विसर्ग वाढविला गेला नव्हता शिवाय, कहार समाजाच्या होड्यांच्या मदतीने प्रशासनाने आम्हाला सोडवले. हा सहा तासांचा थरार आजही अंगावर शहारा आणतो, असे लोहिया म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : 2006 Paithan Flood: 20 Traders Stranded, CM Deshmukh Called for Help

Web Summary : In 2006, 20 Paithan traders were trapped by a sudden flood. Believing death was near, they called relatives. Ex-Minister Patel contacted CM Deshmukh for helicopter rescue. Fortunately, discharge stabilized, and local boats rescued them after a harrowing six hours.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfloodपूरRainपाऊसriverनदी