शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे ४ फुटाने उघडले; ७५ हजार क्यूसेक विसर्गाने गोदावरीला महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 9:06 AM

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता.

पैठण : अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून गुरुवारी रात्री २५ हजार क्युसेक असा विसर्ग वाढविण्यात आला आहे. हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत असताना दुसरीकडे  जायकवाडी धरणाच्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस  झाला. यामुळे रात्री अचानक धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांवर गेल्याने जायकवाडी प्रशासनाची मोठी धावपळ उडाली.

गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. आवक वाढत असल्याने विसर्गात वाढ केल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया रात्री सुरूच होती. धरणाचे सर्व १८ दरवाजे जवळपास ४ फुटाने उचलण्यात आले आहेत.

गुरूवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान धरणाचा जल साठा ९९.२८% होता अचानक एका तासात जलसाठ्याने शंभरी ओलांडल्याने धरणातून विसर्ग १८००० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया सुरू असताना मुळा धरणातून २५ हजाराचा विसर्ग वाढविण्यात आल्याचा संदेश धरण नियंत्रण कक्षात येऊन धडकला. अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे तातडीने धरणावर हजर झाले. धरणातून ७५,४५६ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचे आदेश काळे यांनी दिले. धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे, संदिप राठोड, बंडू आंधारे व तांत्रिक पथकाने धरणातून विसर्ग वाढविण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरू केली रात्री १० वाजेपर्यंत ४०, हजारा पर्यंत विसर्ग वाढविण्यात आला होता,तर रात्री उशिरा तो वाढवून ७५,४५६ करण्यात आला.

मुळाचे पाणी २२ तासात होते दाखल...मुळा धरणातून रात्री आठ वाजेच्या दरम्यान २५ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता.  विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नगर पाटबंधारे विभागाने वर्तविली असल्याने जायकवाडी प्रशासन सतर्क झाले आहे. मुळा ते पैठण १०१ किलोमीटर अंतर असून  मुळाचे पाणी जायकवाडी धरणात २२ तासात दाखल होते. परंतु सध्या नदी भरलेली असल्याने १५ तासाच्या आत हे पाणी जायकवाडी धरणात येईल अशी शक्यता बुद्धभूषण दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.

पैठण तालुक्यातील १४ गावांना इशारा

जायकवाडी धरणातून मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असताना पैठण तालुक्यातील पैठण कावसान, तेलवाडी चनकवाडी पाटेगाव दादेगाव, वडवाळी, नायगाव, मायगाव, आपेगाव, नवगाव, आवडे उंचेगाव, टाकळी अंबड व हिरडपुरी या गावातील नागरिकांना  सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी नदीकाठावरील मालमत्ता गुरे ढोरे दुर घेऊन जावेत असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादgodavariगोदावरी