शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

१६५ प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:46 PM

औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी (दि.२) सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. ...

ठळक मुद्देगो एअरचे पाटणा-मुंबई विमान : इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, एसीही पडला बंद, चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

औरंगाबाद : पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी (दि.२) सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावली होती. त्यात विमानातील एसीही बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास गुदमरत होता. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला आणि १६५ प्रवासी बालंबाल बचावले.गो एअरच्या पाटणा- मुंबई विमानाने रविवारी नेहमीप्रमाणे उड्डाण घेतले. या विमानाने १६५ प्रवासी मुंबईला जात होते. पाटण्याहून टेकआॅफ झाल्यानंतर काहीतरी घडेल, अशी कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती. प्रवासाच्या अर्ध्या मार्गात विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती कमी-अधिक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यातून विमानात काहीसा कंपही होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता. अशा परिस्थितीत विमानातील एसीही बंद पडला. त्यामुळे प्रवाशांना श्वास घेण्यास अधिक त्रास होऊ लागला. विमानातील प्रत्येक प्रवाशाच्या काळजाचा ठोका चुकला होता. अशा सगळ्या परिस्थितीत वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला. पाटणा-मुंबई हवाई मार्गात औरंगाबाद आहे. त्यामुळे या विमानाचे औरंगाबादेत आपत्कालीन लँडिंग क रण्याचा निर्णय घेण्यात आला.चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला सायंकाळी ५ वाजेच्या सुमाराला गो एअरचे पाटणा- मुंबई विमानाचे आपत्कालीन लँडिंग होणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच विमानतळ प्राधिक रणाने रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन विभागाला सतर्क केले. अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिकांचा ताफा विमानतळावर दाखल झाला. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली होती. वैमानिकाने सुरक्षितरीत्या विमान धावपट्टीवर उतरविले आणि विमानतळावरील प्रत्येकाचा जीव भांड्यात पडला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर प्रवासी विमानातच बसून होते. बºयाच वेळेनंतर प्रवासी विमानातून बाहेर उतरले. विमानतळावरील सुरक्षा हॉलमध्ये प्रवाशांना थांबविण्यात आले.दोन्ही इंजिनांची गती मंदावलीगो एअरच्या पाटणा-मुंबई विमानाच्या दोन्ही इंजिनांची गती मंदावल्याने विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विमानाचे लँडिंग सुरक्षितरीत्या झाले, अशी माहिती चिकलठाणा विमानतळाचे संचालक डी.जी. साळवे यांनी दिली.प्रवाशांना उलट्याविमानातील एसी बंद पडल्यामुळे दोन ते तीन प्रवाशांना उटल्या झाल्या. कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली नाही. रात्री ८ वाजेपर्यंत प्रवासी विमानतळावरच होते. गो एअरचे पथक औरंगाबादला येऊन विमान दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याबरोबरच अन्य विमान बोलावून प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळairplaneविमान