शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

१२९ आजारांच्या समावेशाला मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:28 AM

महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या नामांतरास ११ महिन्यांचा कालावधी उलटूनही आरोग्य विभागाने नव्याने समाविष्ट केलेल्या १२९ आजारांची नोंदच शासनाने अधिकृतरित्या कागदोपत्री केली नसल्याने या संदर्भातील रुग्णांना शासनाच्या सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या नामांतरास ११ महिन्यांचा कालावधी उलटूनही आरोग्य विभागाने नव्याने समाविष्ट केलेल्या १२९ आजारांची नोंदच शासनाने अधिकृतरित्या कागदोपत्री केली नसल्याने या संदर्भातील रुग्णांना शासनाच्या सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे़दारिद्र्य रेषेखालील आणि १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी २०१३ पासून राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली़ होती़ या योजनेत ९७१ आजारांवर विनाशुल्क उपचार केले जात होते़ या योजनेंतर्गत प्रती लाभार्थी दीड लाख रुपयांपर्यंत तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांंपर्यंतचा खर्च शासनाकडून केला जात होता़ तसेच पांढरे रेशन कार्ड वगळता इतर रेशनकार्ड धारक व १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी या योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा देण्यात आली होती़याशिवाय दोन वर्षांपूर्वी राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडला होता़ शेतकºयांना संसाराचा राहाटगाडा चालविणेही कठीण बनले होते़ त्यामुळे शेतकरी हा आत्महत्येसारखे शेवटच्या टोकाचे पाऊल उचलू लागला़ ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने राज्यातील शेतकरी वर्गांनाही या योजनेंतर्गत समाविष्ट करून घेतले़ या योजनेला राज्यामध्ये रुग्णांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने २ आॅक्टोबर २०१६ पासून या योजनेचे नामांतर ‘महात्मा ज्योतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ असे करण्यात आले़ त्यानंतर या योजनेची खर्च मर्यादा दीड लाखांवरून दोन लाख करण्यात आली़ तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाखावरून खर्च मर्यादा ३ लाखांपर्यंत करण्यात आली़ पूर्वीच्या योजनेतील ९७१ आजारांसह नवीन १२९ आजारांचा समावेश करण्यात आला़ त्यामध्ये कर्करोग, बालके व वृद्धांवरील उपचार, सिकलसेल, अ‍ॅनिमीया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदी आजारांचा समावेश करण्यात आला़ तसे त्यावेळी जाहीरही करण्यात आले़ परंतु, या संदर्भातील लेखी आदेश मात्र काढले गेले नाहीत़ शासनाच्या या निर्णयाला ११ महिन्यांचा कालावधी लोटला आहे़ परंतु, अद्यापही याबाबत निर्णय झाला नसल्याने संबंधित रुग्णांना आर्थिक झळ सहन करून उपचार घ्यावे लागत आहेत़ शासनाचा निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सध्या तरी तो तकलादू ठरला आहे़