शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

दलित वस्ती सुधार योजनेतील ११९ विजेचे खांब गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:07 PM

दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या  तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

औरंगाबाद : दलित वस्ती सुधार योजनेतील तब्बल ११९ विजेचे खांब गायब असल्याची तक्रार महावितरणकडे करण्यात  आली आहे. महावितरणच्या  अधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

भीमनगर, वॉर्ड क्रमांक-१३ या परिसरात निसर्ग कॉलनी, राजनगर, ग्रीनसिटी, लालमाती, सम्राट अशोक सोसायटी, जेतवन हाऊसिंग सोसायटी  आदी भागांत १५ हजारांवर नागरिक राहतात. येथे दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून २१९ खांब बसविण्याचे काम हाती घेण्यात आले  होते. परंतु त्यानंतरही परिसरात खांबांसाठी अर्ज आले. यावरून सतीश शेगावकर यांनी यासंदर्भात महावितरणकडे तक्रार केली. काम पूर्ण न करताच बिल उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरून महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ यांच्यासह  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली.

वीज खांबांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून आलेला पैसा कामे न करताच हडप करण्यात आल्याचा आरोप होत आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत २१९ पैकी ११९ खांब गायब आहे. याप्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केल्याचे सतीश शेगावकर म्हणाले.  याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार परिसरात पाहणी केली असून खांब टाकल्याचे कंत्राटदाराचे  म्हणणे आहे. त्यामुळे समिती स्थापन करून परिसरात पाहणी करून प्रत्येक खांबाची मोजणी केली जाणार आहे. कुठे खांब टाकले, हे समितीला  कंत्राटदाराला दाखवावे लागणार आहे, असे महावितरणचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ म्हणाले.

 

टॅग्स :electricityवीजAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा