शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

एलईडी पथदिव्यांचे ११२ कोटींचे कंत्राट रद्द

By admin | Updated: October 15, 2014 00:47 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेने नुकतेच दिलेले ११२ कोटी रुपयांचे एलईडी पथदिवे बसविण्याचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांनी दिले.

औरंगाबाद : महानगरपालिकेने नुकतेच दिलेले ११२ कोटी रुपयांचे एलईडी पथदिवे बसविण्याचे कंत्राट रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांनी दिले.शहरातील जुने पथदिवे बदलून नामांकित कंपन्यांचे एलईडी पथदिवे बसविणे, तसेच गंज लागलेले खांब काढून त्या जागेवर नवीन खांब बसविणे आणि पुढील आठ वर्षे शहरातील पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासंदर्भात महानगरपालिकेने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर कंत्राट देण्यासाठी १ आॅगस्ट २०१४ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पात्र कंपनीकडून निविदा मागविल्या होत्या. दिल्ली येथील मे. इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम प्रा. लि., पॉलिकॅप प्रा.लि. आणि शहा इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या. पॉलिकॅप आणि शहा इन्व्हेस्टमेंट कंपन्यांना महानगरपालिकेने तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरविले होते. हे कंत्राट दिल्ली येथील मे. इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टीम कंपनीला देण्यात आले. महानगरपालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात दोन्ही स्पर्धक कंपन्यांनी औरंगाबाद खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल करून आव्हान दिले. या याचिकांवर एकत्रित सुनावणी न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही.के. जाधव यांच्यासमोर झाली. त्यावेळी हे कंत्राट ११२ कोटी रुपयांचे असले तरी आठ वर्षांत संबंधित कंपनीला तब्बल २६२ कोटी रुपये मनपाकडून मिळणार आहेत. याचिकाकर्त्यांनी न्यायालयास सांगितले की, ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले ती कंपनीही तांत्रिकदृष्ट्या अपात्र आहे. शिवाय स्पर्धक कंपनीची उत्पादनेही बांधकाम विभागाच्या लिस्टवर नाहीत. आपणास मुद्दाम डावलले आहे. त्यामुळे त्यांचे कंत्राट रद्द करावे आणि आम्हाला पात्र ठरविण्यात यावे, अशी विनंती केली. यावेळी उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ११२ कोटी २१ लाख ६८ हजार ८० रुपयांचे हे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच हे कंत्राट देण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी मुदत द्यावी, अशी विनंती प्रतिवादी कंपनीकडून करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ती विनंती मान्य केली नाही. इलेक्ट्रॉन कंपनीकडून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. आर.एन. धोर्डे, याचिकाकर्त्या पॉलिकॅप कंपनीकडून अ‍ॅड. रामेश्वर तोतला, अ‍ॅड. अमित व्यास, अ‍ॅड. सुदर्शना निरबाण, शहा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस.यू. कामदार, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. पी.एम. शहा, अ‍ॅड. तांदळे, अ‍ॅड. नोहूश शहा, अ‍ॅड. यशशीस कामदार, मनपाकडून अ‍ॅड. नंदकुमार खंदारे, अ‍ॅड. अतुल कराड, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विजय थोरात यांनी बाजू मांडली.कंत्राटदार काय करणार होता?पथदिव्यांचे कंत्राट घेतलेली कंपनी वीज बचत करणार आहे. पथदिव्यांचे वीज बिल ३८ लाखांच्या वर गेल्यास कंत्राटदार स्वत: रक्कम भरील. दरमहा २ कोटी ७२ लाख रुपये कंत्राटदाराला पालिका अदा करील. जुनी यंत्रणा अपडेट करील. सध्या १ कोटी रुपये वीज बिल मनपा भरते. रोज पथदिवे सुरू व बंद करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे असेल. खांबावरील जाहिरातींचे उत्पन्न कंत्राटदाराला मिळेल. शहरातील मुख्य रस्त्यावरील खांब बदलणे, स्वीच बॉक्स, केबल टाकण्याचे काम १ वर्षात कंत्राटदार करील. त्यानंतर वॉर्डातील इन्फ्रा बदलण्याचे काम सुरू होईल, असे शहर अभियंता पानझडे यांनी सांगितले होते.