शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 19:36 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल.

छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी क्रांतीचौकात उपोषण करीत असलेल्या राजश्री उंबरे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या उपोषणाचा बुधवारी १० दिवस होता. त्यांची राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून पाणी देत उपोषण सोडण्याचे विनंती केली.

यावेळी सावे म्हणाले की,लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत या संदर्भात बैठक घेऊ, तसेच चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. यासाठी शिष्टमंडळाने मुंबईमध्ये बैठकीसाठी येण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल.

मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करावे, मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे, या व इतर २१ मागण्यांसाठी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेशाध्यक्ष राजश्री उंबरे पाटील यांनी २ तारखेपासून क्रांतीचौक येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा १० दिवस होता. यावेळी मंत्री सावे यांच्यासह किशोर चव्हाण, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष काळे, शैलेश भिसे यांच्यासह प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावे