शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मागील दोन महिन्यांपासून महिलांची पाण्यासाठी होत आहे वणवण भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:48 IST

३० गावांचा पाणीपुरवठा ठप्प : वीज देयके थकित असल्याने वीज पुरवठा केला होता खंडित

धनराज रामटेके लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील ३० गावांचा मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने महिलांना ऐन उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, संबधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.

मूल तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शासनाने मूल २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना, बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व बोरचांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. या योजनेची वीज देयके भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची असतानाही सदर योजना पंचायत समिती स्तरावर चालवावी, असा आदेश पारित केला. ग्रा.प. कडेही स्वउत्पन्न पुरेसे नाही. 

२४ गावग्रीड योजनेचे ४० लाख ४३ हजार ९४० रुपये, बेंबाळ प्रादेशिक योजना १३ लाख २५ हजार ७५० रुपये, बोरचांदली प्रादेशिक योजना १२ लाख ३ हजार सहाशे व टेकाडी प्रादेशिक योजना ५ लक्ष रुपये थकीत आहे.

वीज पुरवठा खंडितदेयके थकित असल्याने महावितरणने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला होता. आता महिलांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सरपंचांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

"मागील दोन महिन्यांपासून २४ गाव ग्रीड योजनेचा पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जि. प. प्रशासनाने सहकार्य करून तोडगा काढावा व पाणीपुरवठा योजना सुरू करावी."- दर्शना किन्नाके, सरपंच, ग्रामपंचायत, जानाळा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात