शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कामगार मजुरीविनाच

By admin | Updated: December 20, 2015 00:48 IST

येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील ३०० मजुरांनी सतत सात दिवस पांदण रस्त्यांचे नियमित मातीकाम केले.

पांदण रस्त्याचे काम : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रारतळोधी (बा.) : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील ३०० मजुरांनी सतत सात दिवस पांदण रस्त्यांचे नियमित मातीकाम केले. परंतु या कामाला अडीच वर्षापेक्षा अधिक कालावधी पूर्ण होवूनही मजुरांना मजुरी प्राप्त झाली नाही. त्यामुळे सदर मजुरांची मजुरी त्वरित मिळावी व या दिरंगाईबद्दल जबाबदार असलेले तत्कालिन ग्रामेसवक पिल्लेवार यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी नागभीड तालुका भाजपाध्यक्ष तसेच जिल्हा दक्षता समिती सदस्य होमदेव मेश्राम यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.१८ मार्च २०१३ ते २४ मार्च २०१३ या कालावधीत सावरगाव येथील माणिक कुंभरे यांच्या शेतापासून पांदण रस्त्याचे मातीकाम मग्रारोहयो या योजनेतून ३०० मजुरांनी केले. आणि काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मजुरी वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीपण आज अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही मजुरांना मजुरी मिळाली नाही. या संदर्भात संबंधित मजुरांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन दक्षता समिती सदस्य तसेच नागभीड तालुका भाजपाध्यक्ष होमदेव मेश्राम यांनी २८ सप्टेंबर २०१५ रोजी दक्षता समितीच्या बैठकीत विषय उपस्थित करुन शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यावेळी गटविकास अधिकारी पंचायत समिती नागभीड यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले होते व चौकशी अहवालानुसार १८ मार्च २०१३ ते २५ मार्च २०१३ या कालावधीतील मॅन्युअल मस्टर तथा ई- मस्टर काढल्याचे दिसून येत नाही. तसेच याबाबत रोजगार मागणीचे अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही तर सरपंच प्रविण खोब्रागडे यांनी मजुरी काढून देण्याचे तोंडी आश्वासन दिले. परंतु आजतागायत मजुरांची मजुरी दिली नाही. सदर कालावधीत मजूर कामावर असल्याचे मस्टर किंंवा कोणताही पुरावा ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध नाही. परंतु शाखा अभियंता तथा तांत्रिक अधिकारी मरेगा पंचायत समिती नागभीड यांनी मोजमाप पुस्तिका क्र. ०५ वर सदहू कामाचे मूल्यांकन करुन दिले आहेत.शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०११/प्र.क्र. ४०/रोहयो १० अ दिनांक २ मे २०११ व शासन निर्णय क्र. मग्रारोहयो २०११/प्र.क्र. ५४-७/रोहयो १० अ १७ मे २०१२ अन्वये सर्वप्रथम नोंदणीकृत मजुरांची मागणी उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायत पातळीवर सर्व प्रकारचे अभिलेख तयार करणे व जतन करणे, ग्रामसेवक रोजगार सेवकाने ग्रामसेवकाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारच्या नोंदी व अभिलेख योग्य प्रकारे सांभाळण्याचे काम रोजगार सेवकाने करावे, मजुरांचे हजेरी फलक तयार करणे, भरणे व सांभळणे व इतरही अनेक जबाबदारी पार पाडणे आदी कामे रोजगार सेवकाची आहे. मात्र प्रति स्वाक्षरीबाबत ग्रामपंचायत यंत्रणा, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक व यंत्रणाचे तांत्रिक अधिकारी यांची आहे. परंतु सदर कामे सुरू असताना रोजगार सेवक व ग्रामसेवकांनी आपल्या कर्तव्यास कसूर केल्याचे चौकशी अहलवातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र मग्रारोहयो अधिनियम २००५ अन्वये रोजगार सेवक तसेह महाराष्ट्र शासन जिल्हासेवा (शिस्त व अपिल) १९६४ च्या नियम ३ व ४ नुसार ग्रामसेवक कारवाईही पात्र असल्याचे दिसून येत आहे. या चौकशी अहवालाच्या आधारे १८ ते २३ मार्च २०१३ या कालावधीतील ३०० मजुरांची मजुरी त्वरित देण्याची मागणी मेश्राम यांनी केली. (वार्ताहर)