शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’, चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका, विद्यार्थिनीची मुख्यमंत्र्यांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:24 IST

Chandrapur : दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चंद्रपूर : ‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’ अशी विचारणा करीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेऊ नका, अशी भावनिक साद ब्रह्मपुरी तालुक्यातील आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घातली आहे.२०१५ मध्ये राज्यात भाजपचे सरकार असताना औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली. या बंदीचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी निर्णय चुकीचा असल्याचे मत नोंदविले. दरम्यान, सरकार बदलताच दारुबंदी उठवण्याबाबतच्या चर्चांना वेग आला. अनेकांना दारू सुरु होण्याचे वेध लागले आहेत.दारूबंदी झाल्यानंतर समर्थक आणि विरोधक असे चित्र बघायला मिळाले. अनेक वेळा संघर्षही उद्भवतो. सरकार बदलल्यानंतर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी मागे घेण्याबाबत अनेक घडामोडी घडल्या. यामुळे जिल्ह्यात खरेच दारू सुरू होईल, अशी भीती या विद्यार्थिनीला आहे. त्यामुळे तिने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवले. दारूच्या विपरीत परिणामांची अनेक उदाहरणे तिने पत्रात दिली आहेत.दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गडचिरोलीची दारूबंदी कायम ठेवा, कलावंत-विचारवंत सरसावले

-  गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवावी, असे आवाहन राज्यातील ४० प्रमुख साहित्यिक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केले असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी दिली.

-  गडचिरोली दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. तिला ग्रामसभा व स्त्रियांच्या चळवळीचे समर्थन प्राप्त आहे. 

-  दारूबंदी उठविण्यासंदर्भात सुरू असलेला समितीचा विचार रद्द करावा आणि दारूबंदी अधिक प्रभावी करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली असल्याचे ‘सर्च’च्या वतीने कळविण्यात आले.

- आवाहन करणाऱ्यांमध्ये साहित्यिक अनिल अवचट, सतीश आळेकर, मिलिंद बोकील, रामदास भटकळ व प्रमोद मुनघाटे, कलावंतांमध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, वैज्ञानिक-प्रशासक अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल महाराज, ‘अंनिस’चे अविनाश पाटील, वनराईचे गिरीश गांधी, मेधा कुलकर्णी, मेळघाटचे डॉ. सातव, मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर, अंजली दमानिया, दिल्लीहून खासदार विनय सहस्रबुद्धे, गडचिरोली जिल्ह्यातून आदिवासी नेते देवाजी तोफा व हिरामण वरखेडे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सतीश गोगुलवार, राळेगणसिद्धीवरून अण्णा हजारे आदींनी दारूबंदीचे समर्थन केले असल्याचे डॉ. बंग यांनी कळविले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAbhay Bangअभय बंग