शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’, चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका, विद्यार्थिनीची मुख्यमंत्र्यांना साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 06:24 IST

Chandrapur : दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चंद्रपूर : ‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’ अशी विचारणा करीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेऊ नका, अशी भावनिक साद ब्रह्मपुरी तालुक्यातील आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घातली आहे.२०१५ मध्ये राज्यात भाजपचे सरकार असताना औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली. या बंदीचे काहींनी स्वागत केले, तर काहींनी निर्णय चुकीचा असल्याचे मत नोंदविले. दरम्यान, सरकार बदलताच दारुबंदी उठवण्याबाबतच्या चर्चांना वेग आला. अनेकांना दारू सुरु होण्याचे वेध लागले आहेत.दारूबंदी झाल्यानंतर समर्थक आणि विरोधक असे चित्र बघायला मिळाले. अनेक वेळा संघर्षही उद्भवतो. सरकार बदलल्यानंतर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी मागे घेण्याबाबत अनेक घडामोडी घडल्या. यामुळे जिल्ह्यात खरेच दारू सुरू होईल, अशी भीती या विद्यार्थिनीला आहे. त्यामुळे तिने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवले. दारूच्या विपरीत परिणामांची अनेक उदाहरणे तिने पत्रात दिली आहेत.दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.  त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गडचिरोलीची दारूबंदी कायम ठेवा, कलावंत-विचारवंत सरसावले

-  गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवावी, असे आवाहन राज्यातील ४० प्रमुख साहित्यिक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केले असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी दिली.

-  गडचिरोली दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. तिला ग्रामसभा व स्त्रियांच्या चळवळीचे समर्थन प्राप्त आहे. 

-  दारूबंदी उठविण्यासंदर्भात सुरू असलेला समितीचा विचार रद्द करावा आणि दारूबंदी अधिक प्रभावी करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली असल्याचे ‘सर्च’च्या वतीने कळविण्यात आले.

- आवाहन करणाऱ्यांमध्ये साहित्यिक अनिल अवचट, सतीश आळेकर, मिलिंद बोकील, रामदास भटकळ व प्रमोद मुनघाटे, कलावंतांमध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, वैज्ञानिक-प्रशासक अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल महाराज, ‘अंनिस’चे अविनाश पाटील, वनराईचे गिरीश गांधी, मेधा कुलकर्णी, मेळघाटचे डॉ. सातव, मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर, अंजली दमानिया, दिल्लीहून खासदार विनय सहस्रबुद्धे, गडचिरोली जिल्ह्यातून आदिवासी नेते देवाजी तोफा व हिरामण वरखेडे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सतीश गोगुलवार, राळेगणसिद्धीवरून अण्णा हजारे आदींनी दारूबंदीचे समर्थन केले असल्याचे डॉ. बंग यांनी कळविले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAbhay Bangअभय बंग