शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:51 IST

दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे.

ठळक मुद्देरूपेश घागी यांचे प्रतिपादन : माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे वेळीच हा धोका ओळखून पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन करून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. रूपेश घागी यांनी केले.तालुक्यातील माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी पाणी व्यवस्थापन या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीहरी काळे होते. तर प्रमुक्ष अतिथी म्हणून रमेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी आर. आर. चौधरी, प्राचार्य एम. एस. शेख, केंद्रप्रमुख किशोर कामडी, अनिल काळे, पर्यवेक्षक दडमल उपस्थित होते.किसन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माढेळीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात बोलतना प्रा. घागी पुढे म्हणाले, फुकट मिळणाºया वस्तुंची माणसाल किंमत नसते. आज पाणी फुकटात मिळत असल्याने त्याचा गैरवापर आणि अपव्यवय सुरू आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षकांमध्ये देशाला बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. एकीकडे पाणीसाठा कमी होत असताना लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पृथ्वीचा सर्वाधिक भाग पाण्याने व्यापला असतानाही पाणी अपुरे पडत आहे, ही अडचण दूर करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरेल, अशा उपाययोजना करणे, धरणासारख्या जलाशयातील गाळ काढून पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी पाण्याचा अपव्यव टाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

टॅग्स :Waterपाणी