शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 23:51 IST

दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे.

ठळक मुद्देरूपेश घागी यांचे प्रतिपादन : माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : दिवसेंदिवस पाण्याच्याा पातळीत घट होत आहे. निती आयोगाच्या अहवालानुसार २०३० पर्यंत भारतातील २१ प्रमुख शहरातील पाणीसाठे संपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यापुढील काळात पाणी टंचाईत आणखी भर पडणार आहे. त्यामुळे वेळीच हा धोका ओळखून पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन करून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. रूपेश घागी यांनी केले.तालुक्यातील माढेळी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी पाणी व्यवस्थापन या विषयावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीहरी काळे होते. तर प्रमुक्ष अतिथी म्हणून रमेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी आर. आर. चौधरी, प्राचार्य एम. एस. शेख, केंद्रप्रमुख किशोर कामडी, अनिल काळे, पर्यवेक्षक दडमल उपस्थित होते.किसन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय माढेळीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात बोलतना प्रा. घागी पुढे म्हणाले, फुकट मिळणाºया वस्तुंची माणसाल किंमत नसते. आज पाणी फुकटात मिळत असल्याने त्याचा गैरवापर आणि अपव्यवय सुरू आहे. हे थांबले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षकांमध्ये देशाला बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. एकीकडे पाणीसाठा कमी होत असताना लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पृथ्वीचा सर्वाधिक भाग पाण्याने व्यापला असतानाही पाणी अपुरे पडत आहे, ही अडचण दूर करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरेल, अशा उपाययोजना करणे, धरणासारख्या जलाशयातील गाळ काढून पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून गटशिक्षणाधिकारी चौधरी यांनी पाण्याचा अपव्यव टाळण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

टॅग्स :Waterपाणी