शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

बरांज येथील प्रकल्पग्रस्तांची पायी वारी

By admin | Updated: October 28, 2015 01:16 IST

तालुक्यातील बरांज स्थित खुल्या कोळसा खाणीच्या चार प्रकल्पग्रस्तांनी भद्रावती ते चंद्रपूर २५ कि.मी. पायीवारी करून केपीसीएल मध्येच कोलवेजसह ...

भद्रावती ते चंद्रपूर प्रवास : स्थायी नोकरीची मागणीभद्रावती : तालुक्यातील बरांज स्थित खुल्या कोळसा खाणीच्या चार प्रकल्पग्रस्तांनी भद्रावती ते चंद्रपूर २५ कि.मी. पायीवारी करून केपीसीएल मध्येच कोलवेजसह स्थायी नोकरी देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. पहाटे आठ वाजताच्या सुमारास बरांज गावातून प्रकल्पग्रस्त राजेंद्र डोंगे, दिनेश वानखेडे, रामदास मत्ते, अरविंद देवगडे हे पायी वारी करत दुपारी ३.३० वाजता चंद्रपुरात पोहचले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन देण्यात आले. मागील सहा महिन्यापासून कामगारांना वेतन नाही, खाण बंद अवस्थेत आहे. त्यामुळे येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. येथील खाण कोळसा घोटाळ्यात सापडल्यानंतर केपीसीएल याच कंपनीला ब्लॉक देण्यात आले. त्यामुळे कंपनी जुन्या कामागरांना स्थायी नोकरी देण्यास तयार नाही. कामगारांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनी या खाण प्रकल्पाला देवून आपली उपजिवीका गमावून बसले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना कंपनीने स्थायी नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीला धरून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)