शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोसेखुर्दचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:31 IST

पावसामुळे सर्वच नदी-नाल्यांच्या जलपातळीत वाढ

चंद्रपूर : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची झळ सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदी फुगली. बॅकवॉटर नाल्या काठावरील शेतात शिरल्याने काही गावांची पिके पाण्याखाली आली. पावसाचा जोर वाढल्यास मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अजूनही पावसाचा जोर नाही. मात्र, शनिवारपासून नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात पावसाने जोर पकडला. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. नागभीड तालुक्यातील बाह्मणी, बोथली, कोटगाव, पेंढरी, मांगली, देवपायली, बोंड, राजुली, बाळापूर, पारडी या गावांत शनिवारी पाणी शिरले. नागभीड-उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बामणी पुलावर पाणी चढल्याने पहाटेपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. चिमूर तालुक्यातील पांजरेपार गावही पाण्याखाली आले होते. संततधार पावसाने वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोसेखुर्दचे सर्व दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. पावसाचा जोर राहिला तर सर्वच नदी नाल्यांना पूर येऊ शकतो.

गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ३७३४.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

महसूल पथकाकडून पाहणी

रविवारी चिमूर, नागभीड, सिंदेवाही तालुक्यांतील पुराने काही गावांचे नुकसान झाले. शंकरपूर-येथून जवळच असलेल्या पांजरेपार गावाला शनिवारच्या रात्री आलेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. २० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. पांजरेपार हे सहाशे लोक वस्तीचे गाव असून गावाजवळूनच नाला वाहतो. शनिवारी रात्री नाल्याला पूर आला. सोमवारी महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.

उमा नदीपुलावरून पाणी

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज-जुनगाव येथील नदीच्या पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. मात्र काही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्याने मूलचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पथक दाखल होऊन या मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज नागभीड तालुक्यात सर्वाधिक ४२. ६ मिमी तर जिल्ह्यात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली.

गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. घोडाझरी धरणाच्या केवळ सांडव्यातून पाणी सोडणे सुरू आहे.

- श्याम काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंद्रपूर

टॅग्स :RainपाऊसfloodपूरriverनदीGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पDamधरण