शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 12:31 IST

पावसामुळे सर्वच नदी-नाल्यांच्या जलपातळीत वाढ

चंद्रपूर : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची झळ सुरू आहे. त्यातच गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदी फुगली. बॅकवॉटर नाल्या काठावरील शेतात शिरल्याने काही गावांची पिके पाण्याखाली आली. पावसाचा जोर वाढल्यास मोठा पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अजूनही पावसाचा जोर नाही. मात्र, शनिवारपासून नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यात पावसाने जोर पकडला. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. नागभीड तालुक्यातील बाह्मणी, बोथली, कोटगाव, पेंढरी, मांगली, देवपायली, बोंड, राजुली, बाळापूर, पारडी या गावांत शनिवारी पाणी शिरले. नागभीड-उमरेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बामणी पुलावर पाणी चढल्याने पहाटेपासूनच हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. चिमूर तालुक्यातील पांजरेपार गावही पाण्याखाली आले होते. संततधार पावसाने वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने गोसेखुर्दचे सर्व दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. पावसाचा जोर राहिला तर सर्वच नदी नाल्यांना पूर येऊ शकतो.

गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे अर्धा मीटरने उघडले; ३७३४.४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

महसूल पथकाकडून पाहणी

रविवारी चिमूर, नागभीड, सिंदेवाही तालुक्यांतील पुराने काही गावांचे नुकसान झाले. शंकरपूर-येथून जवळच असलेल्या पांजरेपार गावाला शनिवारच्या रात्री आलेल्या मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली. २० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. पांजरेपार हे सहाशे लोक वस्तीचे गाव असून गावाजवळूनच नाला वाहतो. शनिवारी रात्री नाल्याला पूर आला. सोमवारी महसूल विभागाच्या पथकाने नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली.

उमा नदीपुलावरून पाणी

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज-जुनगाव येथील नदीच्या पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद आहे. मात्र काही नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्याने मूलचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात पथक दाखल होऊन या मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला आहे. आज नागभीड तालुक्यात सर्वाधिक ४२. ६ मिमी तर जिल्ह्यात २०१.५ मिमी पावसाची नोंद झाली.

गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्याही धरणाचे दरवाजे उघडण्यात आले नाही. घोडाझरी धरणाच्या केवळ सांडव्यातून पाणी सोडणे सुरू आहे.

- श्याम काळे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, चंद्रपूर

टॅग्स :RainपाऊसfloodपूरriverनदीGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पDamधरण