शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Vidhan Sabha Election 2019; चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुक कार्यकर्त्यांच्या गावभेटी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:39 IST

चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा, चंद्रपूर, चिमूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी व राजुरा असे सहा विधानसभा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील ग्रामीण भागात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काही उमेदवारांचे नाव निश्चित असल्याने त्यांनी आपले कार्यकर्ते कामाला लावले आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागात रणधुमाळी आतापासून कार्यकर्ते निघाले डोअर टु डोअर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्रासाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा ज्वर आता सर्वप्रथम ग्रामीण भागात चढू लागला आहे. काही उमेदवारांच्या तिकीट निश्चित असल्याने त्यांचे कुटुंबीय, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावागावात नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचा कल जाणून घेत आहे. त्यांच्या समस्या समजून इच्छुक उमेदवारांकरवी त्या सोडविण्याचे आश्वासन देत आहे. काही कार्यकर्त्यांनी तर डोअर टू डोअर जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा, चंद्रपूर, चिमूर, बल्लारपूर, ब्रह्मपुरी व राजुरा असे सहा विधानसभा क्षेत्र आहे. या क्षेत्रातील ग्रामीण भागात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काही उमेदवारांचे नाव निश्चित असल्याने त्यांनी आपले कार्यकर्ते कामाला लावले आहेत. इच्छुक उमेदवारांचे निकटवर्तीय, त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आता गावभेटीवर भर देत आहेत. गावागावात कार्नर सभा घेऊन गावकऱ्यांशी, महिलावर्गाशी संवाद साधताना दिसत आहे.यावेळी आवर्जुन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे. त्या सोडविण्याचे आश्वासनही दिले जात आहे. आपला उमेदवार कसा चांगला, विद्यमान असेल तर त्यांनी केलेले विकासकामे याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला जात आहे.

सहाही विधानसभेसाठी ३९० नामांकन अर्ज गेलेविधानसभा निवडणुकीची प्रक्रिया २७ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. या दिवसापासून नामांकन अर्ज नेणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातून एकूण ८० नामांकन इच्छुक उमेदवारांनी नेले होते. आज सोमवारी सहाही विधानसभा क्षेत्रातून एकूण १११ व्यक्तींनी २५१ नामांकन अर्ज नेले आहेत. आता एकूण ३९० नामांकन अर्ज नेण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. प्रत्येक राजकीय कार्यकर्ता निवडणुकीच्या कामात व्यस्थ झाला आहे. काही जणांच्या तिकीटा फायनल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मतदार संघात कामाला लागले आहेत. दुसरीकडे शासकीय अधिकारी व कर्मचारीदेखील याच कामात गुंतले आहे. २७ सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातून एकूण ८० नामांकन अर्ज गेले. यातून विधानसभा निवडणुकीबाबतचा उत्साह दिसून येतो. दरम्यान, आज सोमवारी सहाही विधानसभा क्षेत्रातून १११ व्यक्तींनी २५१ नामांकन अर्ज नेले आहेत. म्हणजे आतापर्यंत एकूण १८२ व्यक्तींनी ३९० नामांकन अर्ज नेले आहेत.

विधानसभा क्षेत्रनिहाय आकडेवारीराजुरा विधानसभा क्षेत्रातून आतापर्यंत २६ व्यक्तींनी ६० नामांकन अर्ज नेले आहेत. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून २६ व्यक्तींनी ६४ नामांकन, बल्लारपूर क्षेत्रातून १६ व्यक्तींनी ४५ नामांकन, ब्रह्मपुरी क्षेत्रातून २८ व्यक्तींनी ८१ नामांकन अर्ज, चिमूर विधानसभा क्षेत्रातून ४५ व्यक्तींनी ५६ नामांकन अर्ज आणि वरोरा विधानसभा क्षेत्रातून ४१ व्यक्तींनी ८४ नामांकन अर्ज नेले आहेत.

राजुरा क्षेत्रासाठी एक अर्ज दाखलराजुरा विधानसभा क्षेत्रातून एका उमेदवाराने आपला नामांकन अर्ज सोमवारी दाखल केला. सुरेश जयराम चरडे रा. गोंडपिपरी असे सदर उमेदवाराचे नाव असून त्यांनी अपक्ष म्हणून आपले नामांकन दाखल केले आहे. तब्बल दहा व्यक्ती त्यांचे सूचक आहेत.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019