शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अल्ट्राटेकने सिमेंटची उत्पादकता वाढविली; मात्र कामगारांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2022 3:21 PM

कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत.

ठळक मुद्देसिमेंटच्या धुळीमुळे कामाच्या ठिकाणी गुदमरतोय कामगारांचा श्वास

राजेश भोजेकर/आशिष देरकर

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : अल्ट्राटेक सिमेंट कंपनी माणिकगड युनिटमधील कामगारांना प्रशिक्षित करून उत्पादन क्षमतेत वाढ घडवून आणण्यात यशस्वी झाली; मात्र प्रचंड धुळीमुळे कामाच्या ठिकाणी कामगारांचा श्वास गुदमरत असल्याने कामगारांच्या आरोग्याचे काय, हा प्रश्न कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांना पडला आहे.

कामगारांना कामाचा मोबदला आर्थिक स्वरूपात मिळत असला तरी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी सिमेंट कंपनीची आहे; मात्र शासनाने ठरवून दिलेल्या प्रदूषणविषयक कोणत्याही अटी- शर्तींचे पालन कंपनीच्या माणिकगड युनिटकडून होताना दिसत नाही. आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याची जाणीव कामगारांना असूनही त्यांच्यात कंपनीविरोधात आवाज उठविण्याची क्षमता नाही. कामगार संघटनाही याबाबत ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. कामगारांच्या भरवशावर कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या कंपनीकडून कामगारांच्या आरोग्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे कामगार खासगीत सांगत आहेत.

कामगारांच्या आरोग्याचे सर्वेक्षणच नाही?

कारखाने अधिनियम १९४८, महाराष्ट्र कारखाने अधिनियम १९६३ नुसार धोकादायक धुळीच्या कणांमुळे कामगारांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असते. कर्कश आवाजामुळे कामगारांना कर्णबधिरतेचा त्रास आहे की काय? याबाबत सुद्धा सर्वेक्षण करणे आवश्यक असते; मात्र ते केले जात नाही. अशा आवाजाची तीव्रता मोजून त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असते; मात्र उपाययोजना न करता सतत वायू व ध्वनिप्रदूषण सुरूच असते.

धूळ नियंत्रण यंत्र लावण्यात अडचण काय?

अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर व अंबुजा सिमेंट उपरवाही या शेजारच्या कंपन्यांमध्ये अत्याधुनिक धूळ नियंत्रण संयंत्र बसविण्यात आल्याने वायू प्रदूषणाबाबतच्या तक्रारी कमी आहेत; मात्र अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माणिकगड युनिटबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. प्रदूषण नियंत्रित करण्याचा उपाय कंपनीजवळ असताना धूळ नियंत्रण संयंत्र बसविण्यात अडचण काय, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.

कामगार व नागरिकांच्या सरासरी आयुर्मानात घट

सिमेंटची धूळ गडचांदूर व परिसरातील वस्तीत पसरल्यामुळे गडचांदूरमध्ये अनेक नागरिक व कामगारांमध्ये श्वसन विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, फुफ्फुस निकामी होणे, ब्राँकाइटिस, एलर्जी, ॲलर्जिक खोकला, त्वचेचे रोग व केसांवर विपरित परिणाम होऊन केस गळतीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वेळीच या प्रदूषणाची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. नाही तर भविष्यात आरोग्याची स्थिती भयावह असेल.

डॉ. कुलभूषण मोरे, संचालक, अर्थ फाउंडेशन, गडचांदूर.

टॅग्स :pollutionप्रदूषणchandrapur-acचंद्रपूर