शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मूल-मारोडा रस्त्यावर दोन वाघांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

वन्यजीवाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील गावागावात वाघ व बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. नॉन बफरमध्ये दोन इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा रस्त्यावरील वर्दळीच्या मार्गावर दोन वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यातून वनविभाग मार्ग कसा काढेल, याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत : वनविभागाने लक्ष द्यावे

राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यात वनविभागाचे पाच कार्यालय असून वृक्ष संवर्धनासोबतच वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहेत. मात्र वन्यजीवाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यातील गावागावात वाघ व बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. नॉन बफरमध्ये दोन इसमाला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा रस्त्यावरील वर्दळीच्या मार्गावर दोन वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यातून वनविभाग मार्ग कसा काढेल, याकडे लक्ष लागले आहे.मूल तालुक्यात पाच वनविभागाचे कार्यालय असून यात वनपरिक्षेत्र बफर, नॉन बफर, सामाजिक वनीकरण, एफ. डी. सी. एम. कार्यालय व विशेष व्याघ्र संरक्षण दल आदींचा समावेश आहे. वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी सदर कार्यालय प्रयत्नशील आहेत. मात्र वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वाघासाठी क्षेत्र कमी पडायला लागले आहे. त्यामुळे वाघाने आता शेतकरी बांधवांच्या शेतात आपले बस्तान ठोकले असल्याचे दिसून येते. मूल नॉन बफरमधील चिचाळा बिटात शेतात गवत कापण्याचे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून शंकर किसन दुधबळे या इसमाला ठार केले. हाकेच्या अंतरावर मृतकाचा मुलगा व सून काम करीत असताना त्याच्या डोळ्यादेखत वाघाने शंकरचा बळी घेतला. ही घटना ताजी असताना पुन्हा त्याच्या विरूद्ध दिशेला असलेल्या बफर परिक्षेत्रातील मूल-मारोडा या वर्दळीच्या रस्त्यावर दोन वाघ दिसल्याने लोकांमध्ये भीती पसरली आहे.कोसंबी गावातील शेतात वासुदेव लोनबले यांंना या वाघाचे दर्शन झाले. मानवी वस्तीकडे वाघाने धाव घेतल्याने मानव प्राणी संघर्ष होणे स्वाभाविक आहे. वन्यजीवाचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. मात्र मानवाचे काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष घालून पर्याय शोधणे काळाची गरज आहे.

टॅग्स :Tigerवाघ