शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर वाघ मृत्यू प्रकरण; निर्णयावर एकमत न झाल्यानेच गेले वाघाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 11:12 IST

शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय प्राधिकरण प्रतिनिधींनी वेगवेगळे निर्णय घेतले. मात्र तिघांचेही कोणत्याच निर्णयावर एकमत होऊ शकले नाही.

ठळक मुद्देविचार करण्यातच गेला बराच कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कविनायक येसेकरचंद्रपूर : चारगाव खुल्या कोळसा खाणीलगत शिरणा नदीच्या पुलाखाली जखमी असलेल्या वाघाला वाचविण्यासाठी घटनास्थळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व राष्ट्रीय प्राधिकरण प्रतिनिधींनी वेगवेगळे निर्णय घेतले. मात्र तिघांचेही कोणत्याच निर्णयावर एकमत होऊ शकले नाही. यात बराच कालावधी निघून गेला आणि यातच जखमी वाघाचा मृत्यू झाल्याचे आता बोलले जात आहे.शिरणा नदीच्या पात्रात पट्टेदार वाघ जखमी अवस्थेत असल्याची माहिती वन विभागाला कळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर, विभागीय वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे यांच्या पाठोपाठ सीसीएफ रामाराव, पशु वैद्यकीय अधिकारी रविकांत खोबरागडे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे घटनास्थळी उपस्थित झाले. सकाळी ८ वाजतापासून त्या जखमी वाघाला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू असताना वरिष्ठ वनाधिकारी हे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेत होते. त्या सल्ल्यानुसार रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला असता यात राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी अडथळा निर्माण करीत होते. या तीनही चमूचे कोणत्याच निर्णयावर एकमत होत नव्हते. यात वेळ निघून गेली आणि रात्री १ वाजता जखमी वाघाचा मृत्यू झाला. आता प्रत्येकजण एकमेकांकडे बोटे दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.पट्टेदार वाघ शिरणा नदीच्या पात्रात पडल्याने त्या पात्रात पाणी अधिक होते. त्या पात्रात उतरण्यासाठी रस्ता उपलब्ध नव्हता. त्यामुळे जेसीबीद्वारे रस्ता तयार करण्यात आला. त्या वाघाला जिवंत बाहेर काढण्यासाठी त्याला बेशुद्ध करणे, पिंजऱ्यात अडविणे व जाळ टाकून बाहेर काढणे या तीन सुविधा उपलब्ध होत्या. परंतु तो वाघ जखमी अवस्थेत पाण्यात असल्याने बेशुद्ध करणे, जाळ्यात अडकवणे रेस्क्यू ऑपरेशनमधील काही जणांना शक्य वाटले नाही. त्यामुळे वाघाला पिंजऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वाघ गंभीर जखमी असल्याने हा प्रयत्नही विफल झाला. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी वाघाला वाचविण्यासाठी फारसे प्रयत्न चालविले नाही.राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधींचा अडथळाया घटनेबाबत एका वन अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की जखमी झालेल्या त्या पट्टेदार वाघाला आम्ही बाहेर काढण्यास अनुभवानुसार समर्थ होतो. आम्ही रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतु आम्ही केलेले ऑपरेशन राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधीनी योग्य नसल्याचे सांगून आमच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.मानवी सानिध्यातच होता वाघया पट्टेदार वाघाचा जन्म २०१५ मध्ये जेना पहाडीवर झाला. वाघिणीने नर व मादी अशा दोन बछड्यांना जन्म दिला. पुढे मादी ही पावणा जंगल शिवारात गेली तर नर वाघ भद्रावती वनपरिक्षेत्र सोडून मानवाच्या सान्निध्यात राहिला. तो सुरुवातीला पद्मावार वाडी, गोरजा, चारगाव, तेलवासा, ढोरवासा, कुनाडा, देऊरवाडा अशा गावालगतच त्याचे वास्तव्य होते. अनेक पाळीव प्राण्यांवर त्याने हल्लेही केले.

टॅग्स :Tigerवाघ