शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
2
रविवारी की सोमवारी, केव्हा सादर होणार देशाचा अर्थसंकल्प; तारखेवर शिक्कामोर्तब, जाणून घ्या
3
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानची झोप उडाली; युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेत ओतले कोट्यवधी रुपये!
4
"बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार
5
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
6
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
8
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
9
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
10
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
11
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
12
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
13
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
14
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
15
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
16
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
17
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
18
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
19
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
20
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
Daily Top 2Weekly Top 5

काहीही झाले की घे अँटिबायोटिक ! चुकीचा वापर ठरतोय जीवाणूंना ताकद देणारा; दुष्परिणाम वाढले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:29 IST

Chandrapur : सर्दी, ताप, खोकला झाला की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक्स घेतात. मात्र याच सवयीनुसार होणारा वापर आज गंभीर आरोग्यसंकट ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्दी, ताप, खोकला झाला की अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता अँटिबायोटिक्स घेतात. मात्र याच सवयीनुसार होणारा वापर आज गंभीर आरोग्यसंकट ठरत आहे. देशात बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू झपाट्याने वाढत आहेत. वेळीच सावध न झाल्यास साधे संसर्गही जीवघेणे ठरू शकतात, असा सल्ला जनरल फिजिशन डॉ. विनोद नगराळे यांनी दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून अँटिबायोटिक रेझिस्टन्स म्हणजेच प्रतिजैविक प्रतिरोधाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळावे, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. दरम्यान, एका अहवालानुसार भारतातील तब्बल ८३ टक्के रुग्णांमध्ये मल्टिड्रग रेझिस्टन्स ऑरगॅनिझम (एमडीआरओ) म्हणजेच बहुऔषध प्रतिरोधक जिवाणू आढळून आल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

काहीही झाले की घे अँटिबायोटिक !

ताप, सर्दी, खोकला किंवा अंगदुखी झाली की अनेकजण थेट अँटिबायोटिक घेतात. मात्र बहुतेक वेळा हे आजार व्हायरल असतात आणि त्यात अँटिबायोटिकची गरज नसते.

जीवाणूंमध्ये आला तगडा प्रतिरोध

वारंवार अँटिबायोटिक वापरामुळे जीवाणू अधिक शक्तिशाली होते. त्यामुळे एकाच औषधाचा परिणाम पुन्हा होत नाही.

औषधांची मात्रा वाढवण्याची वेळ

जुनी औषधे परिणामकारक न ठरल्याने डॉक्टरांना जास्त डोस किंवा महागडी औषधे द्यावी लागत आहेत.

दहापैकी सहा रुग्णांवर परिणाम होईना

अनेक रुग्णांमध्ये सामान्य अँटिबायोटिक निष्प्रभ ठरत आहेत. दहापैकी सहा रुग्णांना अपेक्षित फरक जाणवत नाही, असे अहवालात आहे.

निमोनिया, मूत्रमार्ग संसर्गावर औषधे निकामी

निमोनिया व मूत्रमार्ग संसर्गासारख्या गंभीर आजारांमध्येही काही वेळा अँटिबायोटिक उपयोगी पडत नाही.

मनानेच औषधे न घेण्याचे मोदींचे आवाहन

'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अँटिबायोटिक घेऊ नका. आजचा चुकीचा वापर उद्याचे मोठे संकट ठरू शकतो."

अँटिबायोटिक वापराचे दुष्परिणाम काय ?

औषधांवर जीवाणूंचा प्रतिकार वाढतो, भविष्यात गंभीर संसर्गावर उपचार कठीण होतात, पोटाचे विकार, अॅलर्जीचा धोका वाढण्याची शक्यता असते.

अँटिबायोटिक कधी वापरावे, कधी नव्हे

जीवाणूजन्य संसर्गात डॉक्टर सांगतील तेव्हाच अँटिबायोटिक वापरावे. तर व्हायरल ताप, सर्दी, फ्लूमध्ये वापरू नये. डॉक्टरांनी सांगितलेली मात्रा व कालावधी पूर्ण करणे आवश्यक असते. कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांकडून तपासणी करुनच उपचार घ्यावा. सतत अँटिबायोटिक घेतल्याने त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

"अँटिबायोटिक म्हणजे सर्व आजारांवरची जादूची गोळी नाही. गरज नसताना घेतलेली अँटिबायोटिक औषधे जीवाणूंना अधिक ताकद देतात. यामुळे पुढे गंभीर संसर्ग झाला, तर प्रभावी औषध उपलब्ध राहत नाही. आज सर्दी-तापासाठी घेतलेली चुकीची गोळी उद्या रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. त्यामुळे अँटिबायोटिक केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच, योग्य मात्रेत घेणे हाच सुरक्षित मार्ग आहे."- डॉ. विनोद नगराळे, जनरल फिजिशन, चंद्रपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Antibiotic overuse strengthens bacteria, increases side effects: A warning.

Web Summary : Overuse of antibiotics for minor ailments is creating drug-resistant bacteria. Doctors warn against self-medication; ineffective antibiotics pose serious health risks. Take antibiotics only when prescribed.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स