शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

सौरऊर्जा पंप भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:01 AM

कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात.

ठळक मुद्देवीजभाराचा खर्च शून्यावर : जिल्ह्यातील ३०८ गावांना शाश्वत पाणी पुरवठा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात. २००९-१० मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमअंतर्गत जिल्ह्यात ३०८ सौर दुहेरी पंप लघुनळ पाणी पुरवठा योजना सुरू झाली होती. यातील बहुतेक पंप सुरळीत असून वीज भाराचा खर्चही निरंक आहे. भीषण टंचाईच्या काळात तहान भागविणारे हे सौरऊर्जा पंप शेकडो कुटुंबांना शाश्वत पुरवठा करीत आहे. त्यामुळे अशा पंपांची संख्या का वाढवू नये, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा योजना व वीजेची समस्या आहे. त्यामुळे नागरिकांना विजेवर आधारित पंपाद्वारे पिण्याच्या पाण्याची गरज भागविताना अडचणींचा सामना करावा लागतो. जिवती, कोरपना, राजुरा या तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये दरवर्षी पाणी टंचाईने नागरिकांचे हाल होतात. राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना सुरू झाली. बºयाच ग्रामपंचायतींनी स्वत:च्या उत्पन्नातील महत्त्वाचा वाटा या योजनेसाठी खर्ची घालत आहेत. मात्र दीर्घकालीन योजनेचा अभाव व वर्षभर विजेची समस्या असणाºया गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २००९-१० पासून जिल्हा परिषदच्या यांत्रिकी उपविभागाच्या अखत्यारित सौर दुहेरी पंप लघुनळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यात ३०८ सौर दुहेरी पंप सुरू आहेत. यासाठी ५ लाखांची मर्यादा आहे. सौरउर्जा पंपांची देखरेख करण्याची जबाबदारी जि.प. यांत्रिकी उपविभागाकडे देण्यात आली. आर्थिक खर्चाविना ग्रामस्थांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत असल्याने योजनेची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा लाभार्थी गावातील सरपंचांनी व्यक्त केली आहे.अशी होते पाणी साठवणसौर ऊर्जा योजनेमध्ये विंधन विहिरींवर हात पंपासोबत सौर पंपाची उभारणी केली जाते. सौर ऊर्जा पंपाचा उपसर्ग साठवण टाकीत साठविल्यानंतर पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. हातपंप व सौर पंपाची उभारणी स्वतंत्ररीत्या विंधन विहिरीत करण्यात आली आहे. त्यामुळे हातपंप बिघडल्यास झाल्यास सौरपंप किंवा सौरपंप नादुरूस्त झाल्यास हातपंपाद्वारे नियमितपणे पाणी पुरवठा सुरू राहतो. हा पंप सौरऊर्जेवर चालत असल्याने विद्युतभाराचा खर्च शून्यावर आला आहे. ग्रामस्थांनी या पंपाची काळजीपूर्वक हाताळणी केल्यास जलसंकट दूर होईल.