शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

बल्लारपुरातील वस्ती विभागाला मिळणार २४ तास पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST

शहरवासीयांना २४ तास पाणी देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत वाढीव पाणी पुवठा योजना मंजूर करण्यात आली. जीवन ...

शहरवासीयांना २४ तास पाणी देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत वाढीव पाणी पुवठा योजना मंजूर करण्यात आली. जीवन प्राधिकरण द्वारे मागील एक वर्षांपासून शहरातील ३२ वार्डात नवीन जलवाहिन्या टाकणे व जोडणे सुरु आहे. हे काम पूर्णत्वास आले आहे. कोरोना संकटात डेपो विभागात नगर परिषद जवळून तर बीटीएस प्लॉटपर्यंत पाईप लाईन टाकण्याच्या कामाला विलंब झाला. बांधकाम विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे पेंडिंग पडले आहे. तेही लवकरच पूर्ण होणार, अशी माहिती नगर परिषद पाणी पुरवठा विभागाचे सुजित खामनकर यांनी दिली. वर्धा नदी काठावर जीवन प्राधिकरणाची पाणी उपसा करण्याची यंत्रणा बसविण्यात आली. मागील दहा दिवसांपासून पंपाची दुरूस्ती नागपूर येथील पथक करीत आहे. त्यामुळे वस्ती व टेकडी विभागात एक दिवसाआड वेळेपेक्षा जास्त पाणी पुरवठा सुरु राहणार असल्याची सूचना नळधारकांना देण्यात आली.

कोट

वस्ती विभागातील लोकसंख्या साधारण ५० हजारांच्या घरात आहे, याचा फायदा वस्ती विभागातील ४ प्रभागातील भगतसिंग वार्ड,टिळक वार्ड,सुभाष नगर,सरदार पटेल, डॉ.आंबेडकर वार्ड, राणी लक्ष्मीबाई नगर,किल्ला वार्ड, श्रीराम वार्ड व सिद्धार्थ वार्डातील नळ ग्राहकांना होणार आहे.

-गणेश बहुरिया, नगरसेवक,बल्लारपूर.