शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळा व्यवस्थापन समित्यांना लागले राजकारणाचे ग्रहण

By admin | Updated: February 7, 2015 00:36 IST

गाव तिथे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याने ते राबविण्यासाठी ग्रामशिक्षक समितीची निर्मिती करण्यात आली.

कोरपना: गाव तिथे प्राथमिक शाळा आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे केल्याने ते राबविण्यासाठी ग्रामशिक्षक समितीची निर्मिती करण्यात आली. कोरपना तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र स्थापनेच्यावेळी गाव पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपात समितीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे या समितीमध्ये काम कमी आणि राजकारण जास्त केले जात असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ठासळत चालली आहे.शाळेचा परिसर राजकारण विरहित असावा, शिक्षणाच्या विकासात लोकसहभाग असावा, या हेतुने ग्रामशिक्षण समितीचे रुपांतर शाळा व्यवस्थापन समितीत करण्यात आले. मात्र तरीही गावपुढाऱ्यांचा हस्तक्षेप आणि मत्केदारी संपुष्टात आली नसल्याने चित्र संपूर्ण कोरपना तालुक्यात दिसत आहे. प्रत्येक गावातील पुढाऱ्याला शाळा व्यवस्थापन समितीत आपल्या गटाचे किंवा राजकीय पक्षाचे लोक कसे निवडले जातील, या दृष्टीने प्रयत्न झाल्याचे पहावयास मिळते. प्रत्येक गावातील एकही बालक शाळाबाह्य राहू नये, अपंग मुलांची १०० टक्के पटनोंदणी करणे, मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, शिक्षकांची अनियमितता आणि गैरवर्तनावर अंकुश निर्माण व्हावा म्हणून सूचना देणे, शालेय विकासासाठी आराखडा तयार करणे तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यावर भर, शिक्षकांची हजेरी अशा विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या शाळा व्यवस्थापन समित्यावर असणाऱ्या अध्यक्ष व सदस्यांची आहे. या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष न देता प्रत्येक गावातील पुढाऱ्यांचा या समित्यांमध्ये अवाजवी हस्तक्षेप वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या मूळ उद्देशालाच बगल दिला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कुणाचेही लक्ष नाही. याउलट शाळेच्या विकासामध्ये हस्तक्षेप करुन मलिदा कसा लाटता येईल, याची जणू तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांत स्पर्धा लागली की काय, अशी स्थिती आहे. प्रत्येक प्राथमिक हायस्कूल शाळेला येणाऱ्या वेगवेगळ्या फंडातून शाळांमध्ये अधिक वर्ग खोल्यांचे बांधकाम वार्षिक डागडुजी सर्व शिक्षा अभियानातून रुपये किंमतीचे स्वच्छतागृह बांधण्यात येते. या कामात शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य किंवा अध्यक्ष हेच या सर्व कामावर नियंत्रण ठेवतात, अशाअडचणी प्रत्येक शाळांमध्ये आहे. या अडचणी सोडवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचे सोडून पुढारी राजकारणात देशाचे भविष्य ठरविणाऱ्या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे. (शहर प्रतिनिधी)