शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

पकडीगुडमचे कालवे पुनर्जीवित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:27 IST

कोरपना : तालुक्यातील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाचे कालवे तुटले व बुजले असल्याने, शेकडो हेक्टरवरील शेती सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे या ...

कोरपना : तालुक्यातील पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाचे कालवे तुटले व बुजले असल्याने, शेकडो हेक्टरवरील शेती सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे या कालव्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पातून ३० वर्षांपूर्वी परिसरातील शेती सिंचनासाठी कालवे तयार करण्यात आले. मात्र, सदर कालव्यांचे काम पूर्णपणे योग्यरीत्या न झाल्याने आजही येथील शेती सिंचनापासून वंचित आहे. त्यामुळे धरण उशाला अन् कोरड घशाला अशी स्थिती येथील झाली आहे. प्रकल्पातून एका खासगी सिमेंट उद्योगाला नियमित मुबलक पाणीपुरवठा होत आहे. मात्र, शेतीला एक थेंबही पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रमुख उद्देश दूर सारला गेला आहे. या ठिकाणचे कालवे सुस्थितीत असते, तर शेतकऱ्यांना बारमाही पिके घेता आली असती. त्यामुळे शेती उत्पादनातही वाढ झाली असती. यावर आता तरी सिंचन विभागाने लक्ष देऊन कालव्याचे पुनर्जीवन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.