शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीमुळे बैलजोडीच्या किंमती वधारल्या

By admin | Updated: February 5, 2015 23:07 IST

भारतीय संस्कृतीतील गायीला मातेचे स्थान दिले जाते. परंतु काही दलालांमार्फत या गो-मातेला कसायाच्या हाती सोपविले जाते. परिणामी गोवंशाच्या होणाऱ्या बेसूमार कत्तलीमुळे बैलांची संख्यावाढ घटली आहे.

कोरपना: भारतीय संस्कृतीतील गायीला मातेचे स्थान दिले जाते. परंतु काही दलालांमार्फत या गो-मातेला कसायाच्या हाती सोपविले जाते. परिणामी गोवंशाच्या होणाऱ्या बेसूमार कत्तलीमुळे बैलांची संख्यावाढ घटली आहे. त्यामुळे बैलजोडीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुरांच्या बाजारात आता बैल जोडीच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गोवंशाची कत्तल करणारे किंवा अवैधरित्या विक्री करणारे दलाल विविध भागात सक्रीय आहेत. परंतु त्याहच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने गोवंश संपविण्याचे काम बेधडकपणे सुरू आहे. बाजारामध्ये १२ ते १८ हजार रुपये किंमत होती. मात्र ती आता ५० ते ६० हजारांच्या घरात पोहचली आहे. चांगल्या प्रतिच्या बैलजोडीची किंमत ७० हजारांपर्यंत तर पटाच्या बैलाची किंमत लाखाच्या घरात गेली आहे. आर्थिक आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला बैलाच्या वाढत्या किंमतीमुळे जबरदस्त फटका बसत आहे. शेतकऱ्याचे जिवन ज्या गोमातेवर चालते, त्या गोमातेला अशा प्रकारे कत्तलखान्यात पाठविण्यापेक्षा घरातील वृद्धाप्रमाणे त्याचेही पालन पोषण शेतकऱ्यांनी केले पाहिजे. मात्र तसे होत नाही. गावरान गाईपासून तयार झालेल्या बैलजोड्यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असताना अशा बैलजोडींची टंचाई निर्माण झाली असून बाजारात विक्रीस येणाऱ्या तरुण बैलजोडीची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोठी अडचण येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. विज्ञानाने कृषी क्षेत्रात जरी प्रगती केली असली तरी अद्यापही बहुतांश शेतकरी बैलाद्वारेच शेती करतात. वाढत्या किंमतीमुळे शेतीसाठी चांगले बैल आणावे कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. गोवंशाची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल याला कारणीभूत असून गोहत्तेवर केवळ कायद्याने बंदी न आणता प्रत्यक्षात गोहत्या थांबविण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)